शहरं
Join us  
Trending Stories
1
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
2
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
3
टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
4
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
5
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
6
"चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
7
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
8
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
9
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
10
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
11
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
12
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
13
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
14
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
15
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
16
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
17
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
18
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
19
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
20
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई

महिलांचा मोर्चा अफवाच ठरली

By admin | Updated: June 30, 2017 02:44 IST

नेवाळीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर पोलीस विरुद्ध शेतकरी असा संघर्ष उभा राहिला आहे. अशा वातावरणात गुरुवारी सकाळपासून नेवाळी

लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : नेवाळीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर पोलीस विरुद्ध शेतकरी असा संघर्ष उभा राहिला आहे. अशा वातावरणात गुरुवारी सकाळपासून नेवाळी आणि परिसरातील महिला अंबरनाथ तहसीलदार कार्यालयावर गुरुवारी मोर्चा काढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच तहसीलदार कार्यालयाला छावणीचे स्वरूप आले होते. नेवाळीत शेतकऱ्यांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्यावर पोलीस आणि शेतकरी यांच्यातील तणाव आणखीनच वाढला आहे. त्यातच सरकारची भूमिका शेतकऱ्यांच्या बाजूने दिसत नसल्याने आता येथील ग्रामस्थ आणखी अस्वस्थ झाले आहेत. त्यातच, आपल्या मागण्या सरकारदरबारी पोहोचवण्यासाठी नेवाळी आणि परिसरातील सर्व गावांतील महिला या तहसीलदार कार्यालयावर दुपारी ३ वाजता मोर्चा काढणार आहेत, असा मेसेज सर्वत्र फिरला होता. अनेक सोशल ग्रुपवरही हा मेसेज आला होता. यासंदर्भात तहसीलदार प्रशांत जोशी यांना विचारले असता त्यांनी अशा प्रकारच्या मोर्चाचे कोणतीही पूर्वकल्पना मिळाली नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, अचानक मोर्चा धडकलाच, तर गोंधळ होऊ नये, यासाठी या मोर्चाची कल्पना पोलिसांना देण्यात आली. मोर्चासाठी कोणतीही परवानगी घेतलेली नसली, तरी तणावाचे वातावरण पाहता वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण वाघ यांनीदेखील पोलिसांचा मोठा ताफा तहसीलदार कार्यालयात बंदोबस्तासाठी पाठवला. दुपारी ३ वाजता मोर्चा येणार, असा संदेश असल्याने पोलिसांनी खबरदारी घेतली होती. सुरक्षेचे सर्व उपाय योजले होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोलिसांनी या मोर्चाची वाट पाहिली. मात्र, महिलांचा मोर्चा न आल्याने पोलीस बंदोबस्त कमी करण्यात आला. अखेर, महिलांचा मोर्चा ही एक अफवा असल्याचे समोर आले.