शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

पाणीटंचाई विरोधात नांदिवलीतील महिला रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : पूर्वेतील नांदिवली टेकडी परिसरात महिनाभरापासून तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्याविना हाल होत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : पूर्वेतील नांदिवली टेकडी परिसरात महिनाभरापासून तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्याविना हाल होत असल्याने त्रस्त झालेल्या परिसरातील महिलांनी मंगळवारी रस्त्यावर उतरून केडीएमसी आणि एमआयडीसीचा निषेध केला. यानंतरही पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास केडीएमसीवर हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा महिलांनी यावेळी दिला.

या संदर्भात रहिवासी सुप्रिया कुलकर्णी यांनी सांगितले की, महिनाभरापासून पाणी समस्या भेडसावत आहे. त्याबाबत आयुक्त विजय सूर्यवंशी यांना देखील माहिती दिली, पण समस्या सुटलेली नाही. बहुतांशी सोसायट्या पाणी येत नसल्याने टँकर मागवत आहेत. त्यातही नांदिवली टेकडी परिसरातील शांताराम दर्शन, श्री संकल्प, अंबर तीर्थ सोसायटी, यशश्री अपार्टमेंट, महाकाली आर्केड या इमारतींना जास्त पाणीटंचाई भेडसावत आहे. महिना झाला टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे, पण तो पुरत नाही. त्यामुळे नागरिक हैराण आहेत. अखेर त्रस्त महिलांनी पाणी मिळायलाच हवे, यासाठी एकत्र येत आवाज उठवला.

पाणी समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींचे प्रयत्नही कमी पडत आहेत. त्यामुळे महिलांना रस्त्यावर उतरावे लागले. पाणी समस्या न सुटल्यास आगामी काळात जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी परिसरातील नागरिकांनी दिला.

----------------------