शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

"महिला पोलिसांची जास्त पदे भरावीत!"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 01:00 IST

भाजपची मागणी; आयुक्तांची भेट घेणार

वसई : वसई-विरार परिसरातील महिलांवरील वाढते अत्याचार व विनयभंगांच्या प्रकरणी योग्य तपास करण्यासाठी यापुढे वसई-विरार, मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयात महिला पोलीस अधिकाऱ्यांची जास्त पदे भरावीत, अशी मागणी भाजपने केली आहे. भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ या मागणीसाठी लवकरच नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. सदानंद दाते यांची भेट घेणार आहेत.नालासोपारा येथे १९ वर्षीय तरुणीने केलेल्या आत्महत्येच्या घटनेनंतर तिच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी चित्रा वाघ या नालासोपारा येथे आल्या होत्या. वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांची त्यांनी भेट घेतली. या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात नेमके काय झाले, त्याच्या चौकशीसाठी चित्रा वाघ नालासोपारा येथे आत्महत्या केलेल्या मुलीच्या कुटुंबाला भेटल्या आणि घडलेल्या घटनेची माहिती घेतली. या प्रकरणात आमचे बारीक लक्ष आहे, दोषी पोलीस अधिकाºयावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी या वेळी पत्रकारांशी बोलताना केली.चित्रा वाघ यांनी या वेळी राज्य शासनावरही जोरदार टीका केली. महिनाभरात वसई-विरारमध्ये १०० पेक्षा जास्त बलात्कार, २०० पेक्षा जास्त विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत, अशी माहिती त्यांना पोलिसांनी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन पोलीस आयुक्तांपुढे या घटना थांबवण्याचे आव्हान असणार असल्याचेही वाघ यांनी सांगितले.दरम्यान, दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियंका गांधी यांना धक्काबुक्की तसेच त्यांच्या कपड्यांना हात लावला असल्याचे समोर आले. त्याबद्दल बोलतानाही वाघ यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, आपल्या संस्कृतीत महिलांचा सन्मान केला जातो. त्यामुळे असा प्रकार खपवून घेता कामा नये. राजकारणापलीकडे जाऊन कोणत्याही महिलेचा आत्मसन्मान राखला गेला पाहिजे, असे चित्रा वाघ यांनी सांगितले.