शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

"महिला पोलिसांची जास्त पदे भरावीत!"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 01:00 IST

भाजपची मागणी; आयुक्तांची भेट घेणार

वसई : वसई-विरार परिसरातील महिलांवरील वाढते अत्याचार व विनयभंगांच्या प्रकरणी योग्य तपास करण्यासाठी यापुढे वसई-विरार, मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयात महिला पोलीस अधिकाऱ्यांची जास्त पदे भरावीत, अशी मागणी भाजपने केली आहे. भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ या मागणीसाठी लवकरच नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. सदानंद दाते यांची भेट घेणार आहेत.नालासोपारा येथे १९ वर्षीय तरुणीने केलेल्या आत्महत्येच्या घटनेनंतर तिच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी चित्रा वाघ या नालासोपारा येथे आल्या होत्या. वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांची त्यांनी भेट घेतली. या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात नेमके काय झाले, त्याच्या चौकशीसाठी चित्रा वाघ नालासोपारा येथे आत्महत्या केलेल्या मुलीच्या कुटुंबाला भेटल्या आणि घडलेल्या घटनेची माहिती घेतली. या प्रकरणात आमचे बारीक लक्ष आहे, दोषी पोलीस अधिकाºयावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी या वेळी पत्रकारांशी बोलताना केली.चित्रा वाघ यांनी या वेळी राज्य शासनावरही जोरदार टीका केली. महिनाभरात वसई-विरारमध्ये १०० पेक्षा जास्त बलात्कार, २०० पेक्षा जास्त विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत, अशी माहिती त्यांना पोलिसांनी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन पोलीस आयुक्तांपुढे या घटना थांबवण्याचे आव्हान असणार असल्याचेही वाघ यांनी सांगितले.दरम्यान, दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियंका गांधी यांना धक्काबुक्की तसेच त्यांच्या कपड्यांना हात लावला असल्याचे समोर आले. त्याबद्दल बोलतानाही वाघ यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, आपल्या संस्कृतीत महिलांचा सन्मान केला जातो. त्यामुळे असा प्रकार खपवून घेता कामा नये. राजकारणापलीकडे जाऊन कोणत्याही महिलेचा आत्मसन्मान राखला गेला पाहिजे, असे चित्रा वाघ यांनी सांगितले.