शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

तपासाशिवायच तक्रार काढली निकाली

By admin | Updated: July 5, 2017 04:36 IST

उच्चशिक्षित मुलाच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलण्याऐवजी पोलिसांनी तपास न करताच आपली तक्रार निकाली काढल्याचा आरोप या

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : उच्चशिक्षित मुलाच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलण्याऐवजी पोलिसांनी तपास न करताच आपली तक्रार निकाली काढल्याचा आरोप या मुलाच्या वृद्ध पित्याने केला आहे. ठाण्यातील बाळकुम परिसरातील रिजन्सी सोसायटीचे रहिवासी विनायक लोंढे यांचा १५ एप्रिल रोजी रात्री उशिरा गूढ मृत्यू झाला. या प्रकरणामध्ये कापूरबावडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी विनायकच्या वडिलांनी त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे. घटनेच्या दिवशी विनायकचे पत्नीसोबत जोरदार भांडण झाले होते. त्यानंतर त्याने आत्महत्या केली. विनायकच्या मृत्यूचा तपास त्या अंगाने करण्याची मागणी त्याचे ७२ वर्षीय वडिल, विक्रोळी येथील रहिवासी सुग्रीव लोंढे यांनी पोलिसांकडे केली. कापूरबावडी पोलिसांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत वारंवार निवेदने देऊनही उपयोग न झाल्याने लोंढे यांनी आपले सरकार या शासनाच्या वेबसाईटवर २८ जून रोजी कैफियत मांडली. त्यानुसार कापूरबावडी पोलिसांनी १ जुलै रोजी लोंढे यांना समजपत्र पाठवून त्यांचा तक्रार अर्ज निकाली काढल्याची माहिती दिली. विनायक लोंढे यांचा खून झाल्याबाबत किंवा त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत कोणताही ठोस पुरावा मिळाला नसल्याचे पोलिसांनी या समजपत्रात स्पष्ट केले आहे.दरम्यान, यासंदर्भात कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.टी. बारावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आरोपांचे खंडण केले. मालमत्तेच्या वादातून हे आरोप केले जात असल्याचे बारावकर यांनी स्पष्ट केले.कारवाईची मागणी पोलिसांनी दिलेल्या समजपत्रास लोंढे यांनी प्रत्युत्तर देताना काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानुसार विनायकने आत्महत्या करण्याचे कारण काय?, घटनेच्या पंचनाम्यात पोलिसांना काय मिळाले?, त्यांचा मृत्यू घरी झाला कि हॉस्पिटलमध्ये?, या प्रकरणात पोलिसांनी कुणा-कुणाचे जबाब नोंदविले? अशा काही प्रश्नांवर पोलिसांना उत्तर मागितले आहे. या प्रकरणाच्या तपासाकडे पोलीस यंत्रणा दुर्लक्ष करीत असून, विनायकच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपींवर कारवाई करण्याची मागणी लोंढे यांनी केली आहे.