शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
4
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
5
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
6
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
7
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
8
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
9
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
10
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
11
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
12
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
13
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
14
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
15
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
16
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
17
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
20
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू

पाच वर्षांतच गडगंज

By admin | Updated: February 16, 2017 02:06 IST

मागील पाच वर्षांत काही नगरसेवकांच्या मालमत्तेत तीन ते पाचपट अशी घसघशीत वाढ झाल्याचे त्यांच्याच प्रतिज्ञापत्रांतून स्पष्ट झाले आहे.

ठाणे : मागील पाच वर्षांत काही नगरसेवकांच्या मालमत्तेत तीन ते पाचपट अशी घसघशीत वाढ झाल्याचे त्यांच्याच प्रतिज्ञापत्रांतून स्पष्ट झाले आहे. मागील कित्येक वर्षे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेले-आता शिवसेनेत दाखल झालेले नाना ऊर्फ देवराम भोईर, नजीब मुल्ला आणि माजी महापौर एच.एस. पाटील यांच्यासह काही कोट्यधीश नगरसेवकांची नावे अग्रक्रमाने घ्यावी लागणार आहेत. ज्येष्ठ नेते देवराम भोईर यांनी २०१६ मध्ये बाळकुम येथील ५१ अ या जागेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरला, तेव्हा सात कोटींची मालमत्ता दाखवली होती. अवघ्या एक वर्षात ती १२ कोटी झाली आहे. माजी महापौर एच.एस. पाटील यांची २०१२ मध्ये ३ कोटी असलेली मालमत्ता आता २०१७ मध्ये १७ कोटी इतकी झाली आहे. अपक्ष म्हणून स्वतंत्रपणे उभे राहिलेले व बिल्डर परमार आत्महत्येप्रकरणात तुुरुंगवारी करून आलेले उमेदवार सुधाकर चव्हाण यांच्याही संपत्तीत पाच वर्षांमध्ये लक्षणीय वाढ होऊन ती ३६ कोटी म्हणजेच चारपट वाढली आहे. त्यांनी ठाणे शहर आणि परिसरात १३ कोटींची स्थावर मालमत्ता दाखवली असून त्यांच्या गाड्यांची किंमत २ कोटी आहे. तर, कुटुंबांकडील दागदागिने ७ लाखांचे आहेत. भाजपाचे नेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष संजय वाघुले यांच्या संपत्तीमध्येही लक्षणीय वाढ दिसून येते आहे. त्यांची पाच वर्षांपूर्वी ६७ लाखांची मालमत्ता आज जवळजवळ दुप्पट झालेली आहे. तर, हल्लीच भाजपामध्ये दाखल झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांची संपत्ती तब्बल ६.७४ कोटी इतकी झाली आहे. त्यांच्या गुंतवणुकीमध्ये मुरबाड येथील जमीन आणि दागदागिने आणि शहरातील काही व्यापारी जागांचा समावेश होतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व परमार आत्महत्येप्रकरणात तुुरुंगवारी करून आलेले दुसरे नगरसेवक नजीब मुल्ला यांच्याकडे काही जमिनी, व्यावसायिक जागा आणि घरे असून त्यांची संपत्ती २०१२ मध्ये रु पये ३ कोटी होती. आता २०१७ मध्ये थेट २३ कोटी इतकी झालेली आहे. टोनी रेसिडेन्सीमधील त्यांच्या आलिशान घराचीदेखील किंमत फारच वाढली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, मागील तीन वर्षांमध्ये घरांच्या किमतीत झालेल्या लक्षणीय वाढीमुळेच त्यांच्या संपत्तीचा आकडा फुगला आहे. (प्रतिनिधी)