शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

कचरा शुल्क मागे घ्या अन्यथा भाजपचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात घरे व आस्थापनांमधून कचरा संकलन करण्यासाठी आकारण्यात येणारे उपयोगकर्ता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात घरे व आस्थापनांमधून कचरा संकलन करण्यासाठी आकारण्यात येणारे उपयोगकर्ता शुल्क तत्काळ दर रद्द करावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली. तसेच कोरोना महामारीच्या काळात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जी मनमानी केली आहे, त्याचा त्यांना जाब विचारावा, अशी मागणीही त्यांनी केली. आयुक्तांनी शुल्क आकारणीचा फेरविचार केला नाही तर भाजप आंदोलन करील, असा इशारा चव्हाण यांनी दिला आहे.

घनकचरा कर वाढवून सामान्य नागरिकांना प्रतिमहिना ५० रुपये आकारणी करण्याचा जो घाट महापालिकेने घातला आहे तो योग्य नाही, असे सोमवारी पत्रकार परिषदेत चव्हाण म्हणाले. हा कर लावण्यापूर्वी महापालिकेने काही तांत्रिक बाबींची पूर्तता करणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून १ जुलै २०१९ रोजी काढलेल्या अधिसूचनेचा दाखला दिला. तसेच महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ मधील कलम ४६४ अन्वये उपविधी निरसित करण्याची तरतूद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चव्हाण म्हणाले की, नवी मुंबई, वसई विरार, नाशिक व पिंपरी चिंचवड महापालिका या सर्व महापालिकांची आर्थिक स्थिती व स्वच्छ भारत अभियानातील सहभाग व परिणाम पाहता हा अधिभार तेथे लावणे उचित ठरले असते. स्वच्छ भारत अभियानात नवी मुंबई महापालिकेचा देशात दुसरा क्रमांक असून, वसई विरार, नाशिक व पिंपरी चिंचवड महापालिका यांनी स्वच्छतेसंदर्भात केलेले काम हे कल्याण - डोंबिवली महापालिकेपेक्षा चांगल्या दर्जाचे आहे. कल्याण - डोंबिवली महापालिकेकडून कचरा गोळा करणे तसेच कचरा विलगीकरणासंदर्भात मागील दोन वर्षांमध्ये कुठलीही सुविधा मिळत नसताना नागरिकांवर अधिभार लादणे अन्यायकारक आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात स्वच्छतेसंदर्भात चांगल्या सुविधा दिल्यानंतर हा अधिभार लावणे उचित ठरेल. या महापालिका क्षेत्रात मध्यमवर्गीय लोकवस्ती असून, त्यांना मागील एक वर्षापासून कोरोनामुळे आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत आहे.

पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्त काम करत आहेत. सध्या येथे नगरसेवक नाहीत. आयुक्त हेच प्रशासक आहेत. त्यामुळे त्यांनी नागरिकांच्या हिताचा विचार करून निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अन्यथा भाजप नागरिकांसाठी रस्त्यावर उतरेल, त्याची जबाबदारी आयुक्तांची असेल, असा इशारा चव्हाण यांनी दिला.

............

वाचली