शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

ठाण्यात पुढील तीन दिवस ५० टक्के पाणी कपातच पंपिंग स्टेशनमध्ये गाळ, कचरा, झाडाच्या फांद्या पडल्या

By अजित मांडके | Updated: July 8, 2024 16:01 IST

ठाणे शहरात आधीच मुंबई महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात आली आहे. त्यात आता ठाणेकरांना पुढील तीन दिवस ५० टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे.

ठाणे : ठाणे शहरात आधीच मुंबई महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात आली आहे. त्यात आता ठाणेकरांना पुढील तीन दिवस ५० टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन तसेच स्टेम प्राधिकरणाच्या शहाड पंपिंग स्टेशन येथील नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पंपिंग होत नसून शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्राला होणारा पाणीपुरवठा कमी झाला असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

ठाणे शहराला आजच्या घडीला ५८५ दशलक्ष पाणी पुरवठा होत आहे. यात महापालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतून २५० दशलक्ष, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ एमएलडी, स्टेम ११५ एमएलडी आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु मागील महिन्यापासून मुंबई महापालिकेकडून होणाºया पाणी पुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात आली आहे. ती अद्यापही बंद करण्यात आलेली नाही. त्यात आता पुन्हा ठाणेकरांवर पाणी संकट कोसळले आहे. मागील काही दिवसापासून पावसाची रिपरिप सुरु होती. परंतु मागील दोन ते तीन दिवसापासून ठाण्यासह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

धरण क्षेत्रातही पाऊस चांगला बरसला आहे. परंतु या दमदार पावसामुळे ठाणे शहराला होणाºया पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन तसेच स्टेम प्राधिकरणाच्या शहाड पंपिंग स्टेशन येथील नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पंपिंग होत नसून शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत आहे. दोन्ही पंपिंग स्टेशनमध्ये पंपाच्या स्टेनरमधील गाळ काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पाणीपुरवठा कमी होत असल्याने महापालिका क्षेत्रातील जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरण्यात समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे, ठाणे महापालिका क्षेत्रात पुढील तीन दिवस (०९, १० आणि ११ जुलै, २०२४) अपुºया प्रमाणात व अनियमित पाणीपुरवठा होईल याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी. तसेच पाण्याचा वापर जपून करावा व महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

परंतु हे काम होईपर्यंत ठाणे शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे दिसत आहे. सोमवारी सकाळीच अनेक भागात पाणी पुरवठा बंद होता, घोडबंदरमध्ये काही भागांचा पाणी पुरवठा कमी दाबाने तर काही ठिकाणी पाणी पुरवठा कमी कालावधीसाठीच सुरु असल्याचे चित्र दिसून आले. त्यातही पुढील तीन दिवस ५० टक्के पाणी कपात असणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.