शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

ठाण्यात पुढील तीन दिवस ५० टक्के पाणी कपातच पंपिंग स्टेशनमध्ये गाळ, कचरा, झाडाच्या फांद्या पडल्या

By अजित मांडके | Updated: July 8, 2024 16:01 IST

ठाणे शहरात आधीच मुंबई महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात आली आहे. त्यात आता ठाणेकरांना पुढील तीन दिवस ५० टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे.

ठाणे : ठाणे शहरात आधीच मुंबई महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात आली आहे. त्यात आता ठाणेकरांना पुढील तीन दिवस ५० टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन तसेच स्टेम प्राधिकरणाच्या शहाड पंपिंग स्टेशन येथील नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पंपिंग होत नसून शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्राला होणारा पाणीपुरवठा कमी झाला असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

ठाणे शहराला आजच्या घडीला ५८५ दशलक्ष पाणी पुरवठा होत आहे. यात महापालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतून २५० दशलक्ष, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ एमएलडी, स्टेम ११५ एमएलडी आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु मागील महिन्यापासून मुंबई महापालिकेकडून होणाºया पाणी पुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात आली आहे. ती अद्यापही बंद करण्यात आलेली नाही. त्यात आता पुन्हा ठाणेकरांवर पाणी संकट कोसळले आहे. मागील काही दिवसापासून पावसाची रिपरिप सुरु होती. परंतु मागील दोन ते तीन दिवसापासून ठाण्यासह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

धरण क्षेत्रातही पाऊस चांगला बरसला आहे. परंतु या दमदार पावसामुळे ठाणे शहराला होणाºया पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन तसेच स्टेम प्राधिकरणाच्या शहाड पंपिंग स्टेशन येथील नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पंपिंग होत नसून शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत आहे. दोन्ही पंपिंग स्टेशनमध्ये पंपाच्या स्टेनरमधील गाळ काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पाणीपुरवठा कमी होत असल्याने महापालिका क्षेत्रातील जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरण्यात समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे, ठाणे महापालिका क्षेत्रात पुढील तीन दिवस (०९, १० आणि ११ जुलै, २०२४) अपुºया प्रमाणात व अनियमित पाणीपुरवठा होईल याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी. तसेच पाण्याचा वापर जपून करावा व महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

परंतु हे काम होईपर्यंत ठाणे शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे दिसत आहे. सोमवारी सकाळीच अनेक भागात पाणी पुरवठा बंद होता, घोडबंदरमध्ये काही भागांचा पाणी पुरवठा कमी दाबाने तर काही ठिकाणी पाणी पुरवठा कमी कालावधीसाठीच सुरु असल्याचे चित्र दिसून आले. त्यातही पुढील तीन दिवस ५० टक्के पाणी कपात असणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.