शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
6
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
7
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
8
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
9
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
10
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
11
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
12
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
13
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
14
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
15
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
16
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
17
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
18
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
19
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!

ठाण्यात पुढील तीन दिवस ५० टक्के पाणी कपातच पंपिंग स्टेशनमध्ये गाळ, कचरा, झाडाच्या फांद्या पडल्या

By अजित मांडके | Updated: July 8, 2024 16:01 IST

ठाणे शहरात आधीच मुंबई महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात आली आहे. त्यात आता ठाणेकरांना पुढील तीन दिवस ५० टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे.

ठाणे : ठाणे शहरात आधीच मुंबई महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात आली आहे. त्यात आता ठाणेकरांना पुढील तीन दिवस ५० टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन तसेच स्टेम प्राधिकरणाच्या शहाड पंपिंग स्टेशन येथील नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पंपिंग होत नसून शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्राला होणारा पाणीपुरवठा कमी झाला असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

ठाणे शहराला आजच्या घडीला ५८५ दशलक्ष पाणी पुरवठा होत आहे. यात महापालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतून २५० दशलक्ष, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ एमएलडी, स्टेम ११५ एमएलडी आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु मागील महिन्यापासून मुंबई महापालिकेकडून होणाºया पाणी पुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात आली आहे. ती अद्यापही बंद करण्यात आलेली नाही. त्यात आता पुन्हा ठाणेकरांवर पाणी संकट कोसळले आहे. मागील काही दिवसापासून पावसाची रिपरिप सुरु होती. परंतु मागील दोन ते तीन दिवसापासून ठाण्यासह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

धरण क्षेत्रातही पाऊस चांगला बरसला आहे. परंतु या दमदार पावसामुळे ठाणे शहराला होणाºया पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन तसेच स्टेम प्राधिकरणाच्या शहाड पंपिंग स्टेशन येथील नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पंपिंग होत नसून शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत आहे. दोन्ही पंपिंग स्टेशनमध्ये पंपाच्या स्टेनरमधील गाळ काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पाणीपुरवठा कमी होत असल्याने महापालिका क्षेत्रातील जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरण्यात समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे, ठाणे महापालिका क्षेत्रात पुढील तीन दिवस (०९, १० आणि ११ जुलै, २०२४) अपुºया प्रमाणात व अनियमित पाणीपुरवठा होईल याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी. तसेच पाण्याचा वापर जपून करावा व महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

परंतु हे काम होईपर्यंत ठाणे शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे दिसत आहे. सोमवारी सकाळीच अनेक भागात पाणी पुरवठा बंद होता, घोडबंदरमध्ये काही भागांचा पाणी पुरवठा कमी दाबाने तर काही ठिकाणी पाणी पुरवठा कमी कालावधीसाठीच सुरु असल्याचे चित्र दिसून आले. त्यातही पुढील तीन दिवस ५० टक्के पाणी कपात असणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.