शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

‘विचारे’ मना का अफवा सोडूनि आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 03:20 IST

ठाण्यासाठी २१ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेले पासपोर्ट कार्यालय बंद करून येत्या २१ आॅगस्टपासून ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे स्थलांतरित होणार

ठाणे : ठाण्यासाठी २१ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेले पासपोर्ट कार्यालय बंद करून येत्या २१ आॅगस्टपासून ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे स्थलांतरित होणार, अशी अफवा खासदार राजन विचारे यांनी परराष्ट्र मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रामुळे पसरली. वस्तुत: पासपोर्ट सेवा देण्याचे कार्यालय ठाण्यातच सुरू राहणार आहे. केवळ प्रशासकीय कार्यालय बीकेसीत हलवण्यात येणार आहे. ऐकीव माहितीच्या आधारे विचारे यांनी हे पत्र लिहिल्याचे उघड झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.पूर्वी केवळ ठाणे जिल्ह्यापुरते मर्यादित असलेल्या पासपोर्ट कार्यालयाशी ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव असे ८ जिल्हे जोडले गेले. दिवसाला सुमारे दोन हजारांहून अधिक पासपोर्टचे वितरण ठाणे कार्यालयाकडून केले जाते. वर्षाला साडेतीन लाखांपेक्षा अधिक पासपोर्ट अर्ज स्वीकारले जातात. आता ठाणे येथील कार्यालय बंद करून मुंबई पासपोर्ट कार्यालयांतर्गत जोडण्याचा निर्णय परराष्ट्र मंत्रालयाने घेतला आहे, असे पत्र विचारे यांनी सर्व कार्यालयांना पाठवून दिल्याने धक्काच बसला.बीकेसीमधील विदेश भवन या नवीन इमारतीत २१ आॅगस्टपासून ठाणे पासपोर्ट कार्यालय स्थलांतरित करण्यात येणार आहे. यामुळे ठाण्यातील नागरिकांना आता पासपोर्टसंदर्भात काहीही कामासाठी ३० किमी दूर बीकेसीला जावे लागेल, असा दावा विचारे यांनी केला.दरम्यान, यासंदर्भात ठाणे पासपोर्ट कार्यालयातील एका उच्चपदस्थ अधिकाºयाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पासपोर्ट कार्यालय बंद होणार नाही. परंतु, कार्यालयीन कामकाज मुंबईला जाणार आहे. ठाण्यासह अन्य आठ जिल्ह्यांतून येणाºया नागरिकांना याच कार्यालयाच्या माध्यमातून पासपोर्ट वितरित होणार आहेत. परंतु, ज्यांच्यावर ‘पासपोर्ट अ‍ॅक्ट’ लागू होत असेल, म्हणजेच गुन्हेविषयक काही प्रकरणे असतील. अर्जात काही त्रुटी असतील तर त्यांना मात्र मुंबईत जावे लागणार आहे. हे प्रमाण दिवसाकाठी ३० ते ४० एवढेच आहे. शिवाय, डोंबिवली आणि नवी मुंबई येथेदेखील पासपोर्ट कार्यालयाचे सबडिव्हीजन सुरू होणार आहे.मुंबईत हे कार्यालय गेल्यास सगळ्यांनाच त्याचा त्रास होणार असल्याचे विचारे यांनी नमूद केले. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना पत्र लिहून ठाणे पासपोर्ट कार्यालय सुरू ठेवा, अशी विनंती केल्याचे विचारे यांनी स्पष्ट केले.