शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘विचारे’ मना का अफवा सोडूनि आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 03:20 IST

ठाण्यासाठी २१ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेले पासपोर्ट कार्यालय बंद करून येत्या २१ आॅगस्टपासून ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे स्थलांतरित होणार

ठाणे : ठाण्यासाठी २१ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेले पासपोर्ट कार्यालय बंद करून येत्या २१ आॅगस्टपासून ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे स्थलांतरित होणार, अशी अफवा खासदार राजन विचारे यांनी परराष्ट्र मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रामुळे पसरली. वस्तुत: पासपोर्ट सेवा देण्याचे कार्यालय ठाण्यातच सुरू राहणार आहे. केवळ प्रशासकीय कार्यालय बीकेसीत हलवण्यात येणार आहे. ऐकीव माहितीच्या आधारे विचारे यांनी हे पत्र लिहिल्याचे उघड झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.पूर्वी केवळ ठाणे जिल्ह्यापुरते मर्यादित असलेल्या पासपोर्ट कार्यालयाशी ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव असे ८ जिल्हे जोडले गेले. दिवसाला सुमारे दोन हजारांहून अधिक पासपोर्टचे वितरण ठाणे कार्यालयाकडून केले जाते. वर्षाला साडेतीन लाखांपेक्षा अधिक पासपोर्ट अर्ज स्वीकारले जातात. आता ठाणे येथील कार्यालय बंद करून मुंबई पासपोर्ट कार्यालयांतर्गत जोडण्याचा निर्णय परराष्ट्र मंत्रालयाने घेतला आहे, असे पत्र विचारे यांनी सर्व कार्यालयांना पाठवून दिल्याने धक्काच बसला.बीकेसीमधील विदेश भवन या नवीन इमारतीत २१ आॅगस्टपासून ठाणे पासपोर्ट कार्यालय स्थलांतरित करण्यात येणार आहे. यामुळे ठाण्यातील नागरिकांना आता पासपोर्टसंदर्भात काहीही कामासाठी ३० किमी दूर बीकेसीला जावे लागेल, असा दावा विचारे यांनी केला.दरम्यान, यासंदर्भात ठाणे पासपोर्ट कार्यालयातील एका उच्चपदस्थ अधिकाºयाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पासपोर्ट कार्यालय बंद होणार नाही. परंतु, कार्यालयीन कामकाज मुंबईला जाणार आहे. ठाण्यासह अन्य आठ जिल्ह्यांतून येणाºया नागरिकांना याच कार्यालयाच्या माध्यमातून पासपोर्ट वितरित होणार आहेत. परंतु, ज्यांच्यावर ‘पासपोर्ट अ‍ॅक्ट’ लागू होत असेल, म्हणजेच गुन्हेविषयक काही प्रकरणे असतील. अर्जात काही त्रुटी असतील तर त्यांना मात्र मुंबईत जावे लागणार आहे. हे प्रमाण दिवसाकाठी ३० ते ४० एवढेच आहे. शिवाय, डोंबिवली आणि नवी मुंबई येथेदेखील पासपोर्ट कार्यालयाचे सबडिव्हीजन सुरू होणार आहे.मुंबईत हे कार्यालय गेल्यास सगळ्यांनाच त्याचा त्रास होणार असल्याचे विचारे यांनी नमूद केले. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना पत्र लिहून ठाणे पासपोर्ट कार्यालय सुरू ठेवा, अशी विनंती केल्याचे विचारे यांनी स्पष्ट केले.