शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
2
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
3
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
4
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
5
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
6
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
7
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
8
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
9
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
10
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
11
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
12
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
13
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
14
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
15
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
16
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
17
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
18
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
19
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
20
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS

‘विचारे’ मना का अफवा सोडूनि आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 03:20 IST

ठाण्यासाठी २१ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेले पासपोर्ट कार्यालय बंद करून येत्या २१ आॅगस्टपासून ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे स्थलांतरित होणार

ठाणे : ठाण्यासाठी २१ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेले पासपोर्ट कार्यालय बंद करून येत्या २१ आॅगस्टपासून ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे स्थलांतरित होणार, अशी अफवा खासदार राजन विचारे यांनी परराष्ट्र मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रामुळे पसरली. वस्तुत: पासपोर्ट सेवा देण्याचे कार्यालय ठाण्यातच सुरू राहणार आहे. केवळ प्रशासकीय कार्यालय बीकेसीत हलवण्यात येणार आहे. ऐकीव माहितीच्या आधारे विचारे यांनी हे पत्र लिहिल्याचे उघड झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.पूर्वी केवळ ठाणे जिल्ह्यापुरते मर्यादित असलेल्या पासपोर्ट कार्यालयाशी ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव असे ८ जिल्हे जोडले गेले. दिवसाला सुमारे दोन हजारांहून अधिक पासपोर्टचे वितरण ठाणे कार्यालयाकडून केले जाते. वर्षाला साडेतीन लाखांपेक्षा अधिक पासपोर्ट अर्ज स्वीकारले जातात. आता ठाणे येथील कार्यालय बंद करून मुंबई पासपोर्ट कार्यालयांतर्गत जोडण्याचा निर्णय परराष्ट्र मंत्रालयाने घेतला आहे, असे पत्र विचारे यांनी सर्व कार्यालयांना पाठवून दिल्याने धक्काच बसला.बीकेसीमधील विदेश भवन या नवीन इमारतीत २१ आॅगस्टपासून ठाणे पासपोर्ट कार्यालय स्थलांतरित करण्यात येणार आहे. यामुळे ठाण्यातील नागरिकांना आता पासपोर्टसंदर्भात काहीही कामासाठी ३० किमी दूर बीकेसीला जावे लागेल, असा दावा विचारे यांनी केला.दरम्यान, यासंदर्भात ठाणे पासपोर्ट कार्यालयातील एका उच्चपदस्थ अधिकाºयाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पासपोर्ट कार्यालय बंद होणार नाही. परंतु, कार्यालयीन कामकाज मुंबईला जाणार आहे. ठाण्यासह अन्य आठ जिल्ह्यांतून येणाºया नागरिकांना याच कार्यालयाच्या माध्यमातून पासपोर्ट वितरित होणार आहेत. परंतु, ज्यांच्यावर ‘पासपोर्ट अ‍ॅक्ट’ लागू होत असेल, म्हणजेच गुन्हेविषयक काही प्रकरणे असतील. अर्जात काही त्रुटी असतील तर त्यांना मात्र मुंबईत जावे लागणार आहे. हे प्रमाण दिवसाकाठी ३० ते ४० एवढेच आहे. शिवाय, डोंबिवली आणि नवी मुंबई येथेदेखील पासपोर्ट कार्यालयाचे सबडिव्हीजन सुरू होणार आहे.मुंबईत हे कार्यालय गेल्यास सगळ्यांनाच त्याचा त्रास होणार असल्याचे विचारे यांनी नमूद केले. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना पत्र लिहून ठाणे पासपोर्ट कार्यालय सुरू ठेवा, अशी विनंती केल्याचे विचारे यांनी स्पष्ट केले.