शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

मुंब्य्रात प्रथमच हिवाळी मॅरेथॉन स्पर्धा !

By admin | Updated: January 7, 2016 00:38 IST

पोलिसांच्या पुढाकाराने मुंब्य्रात आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या हिवाळी मॅरेथोन स्पर्धेतील ६ किलोमीटरचे अंतर पार करून आतिफ इफ्तेखार मोहमद

मुंब्रा : पोलिसांच्या पुढाकाराने मुंब्य्रात आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या हिवाळी मॅरेथोन स्पर्धेतील ६ किलोमीटरचे अंतर पार करून आतिफ इफ्तेखार मोहमद या विद्यार्थ्यांने,तर श्रद्धा पांडे या विद्यार्थिनीने विरल अंतर ३५ मिनिटे १२ सेकंदात पार करून स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. सहा,चार आणि दोन किलोमीटर अशा तीन गटांत विभागलेल्या या स्पर्धेतील १८ विजेत्यांना पोलीस आयुक्त परमवीर सिंह, पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार सुभाष भोईर आदीच्या हस्ते रोख पारितोषिके, प्रशस्तिपत्रके, आणि स्मृतिचिन्हे देण्यात आली.येथील विद्यार्थ्यांमधील विविध प्रकारचे सुप्त क्रीडा गुण विकसित व्हावेत, त्याच्यातून उदयोन्मुख खेळाडू निर्माण व्हावेत, तसेच इतर शहरातील नागरिकांचा मुंब्य्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, या प्रमुख हेतूने पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्या निर्देशानुसार ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.मुंब्रा-दिव्यातील ५१ शाळा आणि ५ मदरशांमधील २ हजार १४२ विद्यार्थी आणि १ हजार २२६ विद्यार्थिनी असे एकूण तीन हजार ३६८ स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते. स्पर्धा व्हावी , यासाठी येथील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, डॉक्टर्स, शाळांचे शिक्षक, लोकप्रतिनिधी, वाहतूक पोलीस आदींनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे यांनी मोलाचे सहकार्य केले. वरील सर्वाच्या सहकार्यामुळे स्पर्धा यशस्वी झाल्याचे प्रतिपादन तायडे यांनी त्यांच्या भाषणात केले.या स्पर्धेत सहभागी होता आले नाही, याची खंत वाटत असल्याचे आयुक्त सिंह त्यांच्या भाषणात म्हणाले. स्वर्गीय माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्याबरोबर काम केलेले सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायन यांनी मुंब्य्राला जागतिक पातळीवर नेण्यासाठी तसेच कलाम यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी या भागातील विद्यार्थ्यांनीही पुढे यावे, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाषणात दिली. मुंब्य्रामध्ये विविध प्रकारचे टॅलेंट असलेले तरु ण वास्तव्य करीत आहेत, त्यांना पुढे आणण्यासाठी, रस्ता हरवलेल्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे प्रतिपादन उपायुक्त सचिन पाटील यांनी त्यांच्या भाषणात केले.या स्पर्धेत सहभागी झालेल्यांनी आयुष्याच्या स्पर्धेतही यशस्वी व्हावे, असे प्रतिपादन अप्पर पोलीस आयुक्त प्रतापसिंह पाटणकर यांनी शायरीमधून व्यक्त केले. येथील नागरिकांमध्ये बंधुभाव वाढविणारी ही स्पर्धा होती. असे, पालकमंत्री शिंदे त्यांच्या भाषणात म्हणाले. या स्पर्धेमुळे परिसरातील नागरिकांची मने जुळली, तसेच या स्पर्धेने इतिहास घडवल्याचे आमदार भोईर म्हणाले.