शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

पालघरपाठोपाठ कोकण जिंकू या - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 01:36 IST

ठाणे, कोकण एकेकाळी भाजपाचे गड होते. परंतु, भाजपाने मैत्री जपण्याकरिता मित्रपक्षाला एकेक गड सोडले आणि भाजपा दुसऱ्या क्रमांकावर आला. परंतु, भाजपाला पुन्हा संधी मिळाली, तेव्हा आपण येथील जनतेचा विश्वास जिंकला.

ठाणे : ठाणे, कोकण एकेकाळी भाजपाचे गड होते. परंतु, भाजपाने मैत्री जपण्याकरिता मित्रपक्षाला एकेक गड सोडले आणि भाजपा दुसऱ्या क्रमांकावर आला. परंतु, भाजपाला पुन्हा संधी मिळाली, तेव्हा आपण येथील जनतेचा विश्वास जिंकला. काही दिवसांपूर्वी भाजपाने पालघर जिंकले. आता पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या माध्यमातून कोकण जिंकायचे आहे, असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. फडणवीसांनी थेट शिवसेनेचा उल्लेख केला नसला, तरी त्यांच्या टीकेचा रोख त्याच पक्षाकडे होता.भाजपाचे कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ भाजपा पदाधिकाºयांची खासगी बैठक टीपटॉप प्लाझामध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी खासदार, आमदार, नगरसेवक तसेच पदाधिकाºयांना निवडणूक जिंकण्याबाबत कानमंत्र दिला. फडणवीस म्हणाले, पालघर निवडणुकीच्या वेळेस आपण गाफील राहिल्याने आपल्या मित्रपक्षाने आपलाच उमेदवार पळवला. त्यामुळे त्यांनी आपल्यासमोर मोठे आव्हान निर्माण केले होते. आपल्याला प्रचाराकरिता जेमतेम १० दिवस मिळाले. परंतु, कार्यकर्ते जोमाने कामाला लागल्याने ही लढाई जिंकून दाखवली. आता या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला कोकणातील गतवैभव पुन्हा प्राप्त करायचे आहे. मागील वेळी निरंजन यांनी योग्य रचना आखल्याने ते निवडून आले. आता तेच आपल्या पक्षात आल्याने आपल्याला विजय प्राप्त करण्याची संधी मिळाली आहे.मित्रपक्षाला आपण लोकसभा, विधानसभा दिली. परंतु, भाजपाला संधी मिळाली, तेव्हा आपली ताकद सिद्ध केली, असे नमूद करून फडणवीस म्हणाले, कल्याण, मीरा-भार्इंदर, उल्हासनगर आदी ठिकाणी भाजपाने कार्यकर्त्यांच्या जोरावर आणि मतदारांनी दाखवलेल्या विश्वासावर चांगले यश मिळवले. पनवेलमध्ये युती करून निवडणूक लढण्याचे जाहीर झाले. परंतु, ऐन वेळेस पुन्हा मित्राने युतीस नकार दिला. तेथे मोठ्या हिमतीने लढलो आणि एकतर्फी विजय खेचून आणला. शिवसेनेला या ठिकाणी एकही जागा जिंकता आली नाही. भाजपाचा ११ पोटनिवडणुकांमधील पराभव विरोधकांना दिसतो. परंतु, २१ राज्ये काबीज केली, हे त्यांना दिसत नाही का, असा सवाल त्यांनी केला. स्वातंत्र्यानंतर इतकीराज्ये जिंकणारा भाजपा हा एकमेव पक्ष असल्याचेही फडणवीसांनी सांगितले. कर्नाटकमध्ये टीका झाली, परंतु मोदींनी आठ दिवस प्रचार केला आणि चित्र पालटले. २१ मतदारसंघांत नोटापेक्षा कमी मतांनी भाजपाच्या उमेदवारांनी मात खाल्ली. काँग्रेसने या ठिकाणी ६० हजारांचे बोगस मतदान केले. परंतु, आम्ही त्याबद्दल काही बोललो नाही. मोदींबाबत लोकांच्या मनात आदर आहे, हा देश मोदीच बदलू शकतात, असा लोकांच्या मनात विश्वास आहे.काँग्रेसने सत्तेचा वापर स्वत:च्या परिवर्तनासाठी केला. आपल्याला जनतेच्या परिवर्तनासाठी करायचा आहे. मागील साडेतीन वर्षांत सर्व निवडणुकांमध्ये भाजपा प्रथम क्रमांकाचा पक्ष राहिला आहे. आपण यशस्वी वाटचाल करीत आहोत, असे ते म्हणाले.कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक फार वेगळी आहे. येथे जमिनीवर राहून काम करावे लागणार आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. येथे सुईप्रमाणे मतदार शोधावा लागतो, असे फडणवीस यांनी सांगितले.एकेकाळी मुंबईत स.का. पाटील यांना हरवणे कठीण होते, परंतु जॉर्ज फर्नांडिस यांनी तो करिष्मा केला होता. आता तसाच करिष्मा करून दाखवायचा आहे. या निवडणुकीत प्रचाराकरिता कार्यकर्त्यांनी वेळ देणे गरजेचे आहे. मेहनत घ्यावी लागणार आहे. १० मतदारांमागे एक कार्यकर्ता अशी रचना करावी लागेल. पालघरची निवडणूक जिंकल्यामुळे गाफील राहू नका. तुमच्या मनात जी खदखद आहे, ती या निवडणुकीतून बाहेर पडू द्या, असे सांगत फडणवीस यांनी अप्रत्यक्षरीत्या शिवसेनेविरोधात दोन हात करण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला. कोकण पदवीधरमध्ये आपल्याला केवळ विजय मिळवायचा नसून एकूण मतदानापैकी ६० टक्के मते घेऊन विजय संपादित करायचा असल्याचे त्यांनी शेवटी स्पष्ट केले...........................नेहमी आक्रमक शैलीत भाषण करणाºया मुख्यमंत्र्यांनी अत्यंत शांतपणे आपले विचार मांडले. ही बैठक पत्रकारांना खुली नव्हती.....................शिवसैनिक आत कसे?भाजपाच्या या खासगी बैठकीत मागच्या दाराने काही शिवसैनिक उपस्थित असल्याचे समजते. मुख्यमंत्री काय टीका करतात, निवडणूक जिंकण्याबाबत कोणता मंत्र देतात, हे जाणून घेण्याकरिता ते आले होते. त्यामुळे पत्रकारांना बाहेर ठेवून भाजपाने काय साधले, असा प्रश्न उपस्थित झाला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस