शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

जिल्हा परिषद चार हजार वनराई बंधारे बांधण्यास मुकणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 00:00 IST

आता गेल्या काही दिवसांपासून बंधारे बांधण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. मात्र, बहुतांशी ठिकाणच्या वाहत्या पाण्याचा प्रवाहच बंद झालेला आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : लांबलेला पावसाळा आणि त्यात अवकाळी पावसाची भर यामुळे आता वाहत्या पाण्याचे ओढे, नाले आणि ओहळ आदींची शोधाशोध जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांना करावी लागत आहे. बहुतांशी ठिकाणी आधीच पाण्याचा वाहता प्रवाह बंद झालेला आहे. यामुळे आता वनराई बंधारे बांधण्याचा सुमारे साडेचार हजारांचा लक्ष्यांक गाठणे ठाणे जिल्हा परिषदेला अवघड झाले आहे.जिल्ह्यातील गावखेड्यांमधील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासह रब्बीच्या पिकांना आवश्यक पाणीसाठा उपलब्ध व्हावा, त्याद्वारे शेतकऱ्यांना सहज जास्त उत्पन्न घेता यावे, याशिवाय माळरानात जनावरांसाठी, पशुपक्ष्यांकरितादेखील जंगलात पाणी उपलब्ध व्हावे, हे हेतू लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने यंदा साडेचार हजार वनराई बंधारे लोकसहभागातून बांधण्याचे काम हाती घेतले. मात्र, यंदा पावसाळाही लांबला. त्यापाठोपाठ अवकाळी पावसाचा तडाखा, यामुळे नदी, नाले ओढे दुथडी भरून वाहत असल्यामुळे वनराई बंधारे बांधण्याच्या कामात अडथळे निर्माण झाले. आता गेल्या काही दिवसांपासून बंधारे बांधण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. मात्र, बहुतांशी ठिकाणच्या वाहत्या पाण्याचा प्रवाहच बंद झालेला आहे. यामुळे त्या ठिकाणी तसाही बंधारा बांधण्याची गरज राहिली नाही. यामुळे आतापर्यंत जिल्हा परिषदेला अवघे ५०० बंधारे बांधणे शक्य झाले असून, आता अवघा एक महिना शिल्लक असल्याने त्यात टार्गेट पूर्ण होणे अशक्य दिसत आहे.आता नद्यांच्या प्रवाहात बंधाराजिल्ह्यात ठिकठिकाणी १५ डिसेंबरपर्यंत ओढे, नाले, ओहळांचे वाहते पाणी मिळण्याच्या अपेक्षेने ग्रामपंचायत यंत्रणेसह गावकरी बंधारे बांधण्याच्या ठिकाणांचा शोध घेत आहेत. त्यात फारसे यश येतनसल्याचे लक्षात आल्यामुळे आता त्यांनी नदीच्या प्रवाहात वनराई बंधारे बांधण्याच्या ठिकाणाचा शोध सुरू केला.

टॅग्स :thaneठाणे