शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

जीव गेल्यावरच जाग येणार का?; केडीएमसीच्या सफाई कामगारांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 00:27 IST

जीर्ण बांधकामामुळे कोसळतेय प्लास्टर

कल्याण : केडीएमसी हद्दीतील अतिधोकादायक बांधकामांचा प्रश्न गंभीर बनला असताना महापालिकेच्या स्वत:च्या वास्तू सुस्थितीत नाहीत. शहरातील बांधकाम धोकादायक आणि अतिधोकादायक म्हणून जाहीर करताना आपल्या सफाई कामगारांच्या जीर्ण झालेल्या वसाहतींची डागडुजी करायला प्रशासनाला मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे धोकादायक अवस्थेतील या वसाहतींमध्ये छताचे प्लास्टर कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. दोन दिवसांपूर्वीच पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड परिसरातील भवानी निवास येथे प्लास्टर पडल्याची घटना घडली आहे. वारंवार लक्ष वेधूनही याकडे होत असलेला कानाडोळा पाहता जीव गेल्यावरच जाग येणार का, असा संतप्त सवाल रहिवाशांकडून होत आहे.महापालिकेची स्थापना १९८३ मध्ये झाली. पण, नगरपालिकेच्या आधीपासूनच सफाई कामगारांच्या वसाहती कल्याण-डोंबिवलीत आहेत. सफाईचे काम करणारे हे प्रामुख्याने आदी द्रविड, रूखी, मेहतर आणि वाल्मीकी समाजाचे आहेत. हा समाज कल्याणमध्ये अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. सध्या पाच ते सहा सफाई कामगारांच्या वसाहती महापालिका हद्दीत आहेत. परंतु, ज्यांच्यावर शहराच्या स्वच्छतेची भिस्त आहे, अशा सफाई कामगारांच्या वसाहतींकडे मात्र प्रशासनाचे पुरते दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.सध्या बहुतांश वसाहतींची बांधकामे जीर्ण अवस्थेत आहेत. १९७५ मध्ये उभ्या राहिलेल्या भवानी निवास या इमारतीची अवस्था अधिकच बिकट आहे. तळ अधिक दुमजली असलेल्या या इमारतीत सफाई कामगारांची १५ कुटुंबे वास्तव्याला आहेत. याठिकाणी छताला असलेले प्लास्टर कोसळण्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. गेल्या वर्षी छताचे प्लास्टर कोसळून हझुबाई परमार (७०) या निवृत्त सफाई कामगार जखमी झाल्या होत्या. यानंतरही ठोस उपाययोजना केली न गेल्याने प्लास्टर कोसळण्याच्या घटना आजही सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वीच या इमारतीच्या छताचे प्लास्टर बाजूकडील घरावर कोसळले. त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, घराचे नुकसान झाले. पावसात भिंतींना ओल धरली आहे. त्यात बहुतांश ठिकाणी प्लास्टर निघाल्याने भिंतीमधील सळया बाहेर आल्या आहेत. यात धोकादायक इमारतीचा भाग शेजारच्या चाळींवर तसेच घरांवर कधी कोसळेल, याचा नेम नसल्याने या धोकादायक इमारतीसह आजूबाजूच्या घरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. यासंदर्भात वारंवार ‘क’ प्रभाग कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. पण, कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली नाही. दरम्यान, यासंदर्भात महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.मोफत घरांचे काय झालेकेंद्र असो अथवा राज्य सरकारने अनेक योजना जाहीर केल्या. यात पंतप्रधान आवास योजना, श्रमसाफल्य आवास योजना तसेच बीएसयूपीचा समावेश आहे. पण, सफाई कामगारांना या योजनेत सामावून घेतलेले नाही.ठाणे, उल्हासनगर, सोलापूर, अलिबाग, अकोले याठिकाणच्या महापालिका प्रशासनाने सफाई कर्मचाऱ्यांच्या नावे घरे केलेली आहेत, पण आपल्याकडे याची अंमलबजावणी का नाही, असा सवाल महाराष्ट्र रूखी ज्ञाती समाज या संघटनेचे पदाधिकारी दीपक चव्हाण, वसंत सोलंकी आणि विनोद चव्हाण यांनी केला आहे.ज्या सफाई कामगारांनी २५ वर्षे सलग सेवा बजावली, त्यांना मोफत घरे देण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. पण, त्याकडेही केडीएमसीचे दुर्लक्ष झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.स्ट्रक्चरल आॅडिट तुम्हीच करासंबंधित वसाहत केडीएमसीची असताना स्ट्रक्चरल आॅडिट तुम्हीच करा, असे रहिवाशांना सांगण्यात आले आहे. नोटीस बजावण्यापुरतीच प्रशासनाची कार्यवाही मर्यादित आहे. पर्यायी व्यवस्था करून या इमारतीच्या वास्तूची डागडुजी करण्याचा कोणताही प्रयत्न प्रशासनाकडून केला जात नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.‘ते’ आश्वासनही बासनातकामगारांच्या हक्कांसाठी तसेच मागण्यांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग नेमण्यात आला आहे. परंतु, या आयोगाचे काम आजवर केवळ बैठका घेण्यापुरतेच मर्यादित आहे. मागील वर्षी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष मनोहर झाला आणि राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामोजी पवार यांनी केडीएमसी हद्दीतील वसाहतींची पाहणी केली होती. त्यावेळी घर मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण, आजतागायत ठोस कार्यवाही झालेली नाही.