शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

जीव गेल्यावरच जाग येणार का?; केडीएमसीच्या सफाई कामगारांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 00:27 IST

जीर्ण बांधकामामुळे कोसळतेय प्लास्टर

कल्याण : केडीएमसी हद्दीतील अतिधोकादायक बांधकामांचा प्रश्न गंभीर बनला असताना महापालिकेच्या स्वत:च्या वास्तू सुस्थितीत नाहीत. शहरातील बांधकाम धोकादायक आणि अतिधोकादायक म्हणून जाहीर करताना आपल्या सफाई कामगारांच्या जीर्ण झालेल्या वसाहतींची डागडुजी करायला प्रशासनाला मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे धोकादायक अवस्थेतील या वसाहतींमध्ये छताचे प्लास्टर कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. दोन दिवसांपूर्वीच पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड परिसरातील भवानी निवास येथे प्लास्टर पडल्याची घटना घडली आहे. वारंवार लक्ष वेधूनही याकडे होत असलेला कानाडोळा पाहता जीव गेल्यावरच जाग येणार का, असा संतप्त सवाल रहिवाशांकडून होत आहे.महापालिकेची स्थापना १९८३ मध्ये झाली. पण, नगरपालिकेच्या आधीपासूनच सफाई कामगारांच्या वसाहती कल्याण-डोंबिवलीत आहेत. सफाईचे काम करणारे हे प्रामुख्याने आदी द्रविड, रूखी, मेहतर आणि वाल्मीकी समाजाचे आहेत. हा समाज कल्याणमध्ये अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. सध्या पाच ते सहा सफाई कामगारांच्या वसाहती महापालिका हद्दीत आहेत. परंतु, ज्यांच्यावर शहराच्या स्वच्छतेची भिस्त आहे, अशा सफाई कामगारांच्या वसाहतींकडे मात्र प्रशासनाचे पुरते दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.सध्या बहुतांश वसाहतींची बांधकामे जीर्ण अवस्थेत आहेत. १९७५ मध्ये उभ्या राहिलेल्या भवानी निवास या इमारतीची अवस्था अधिकच बिकट आहे. तळ अधिक दुमजली असलेल्या या इमारतीत सफाई कामगारांची १५ कुटुंबे वास्तव्याला आहेत. याठिकाणी छताला असलेले प्लास्टर कोसळण्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. गेल्या वर्षी छताचे प्लास्टर कोसळून हझुबाई परमार (७०) या निवृत्त सफाई कामगार जखमी झाल्या होत्या. यानंतरही ठोस उपाययोजना केली न गेल्याने प्लास्टर कोसळण्याच्या घटना आजही सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वीच या इमारतीच्या छताचे प्लास्टर बाजूकडील घरावर कोसळले. त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, घराचे नुकसान झाले. पावसात भिंतींना ओल धरली आहे. त्यात बहुतांश ठिकाणी प्लास्टर निघाल्याने भिंतीमधील सळया बाहेर आल्या आहेत. यात धोकादायक इमारतीचा भाग शेजारच्या चाळींवर तसेच घरांवर कधी कोसळेल, याचा नेम नसल्याने या धोकादायक इमारतीसह आजूबाजूच्या घरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. यासंदर्भात वारंवार ‘क’ प्रभाग कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. पण, कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली नाही. दरम्यान, यासंदर्भात महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.मोफत घरांचे काय झालेकेंद्र असो अथवा राज्य सरकारने अनेक योजना जाहीर केल्या. यात पंतप्रधान आवास योजना, श्रमसाफल्य आवास योजना तसेच बीएसयूपीचा समावेश आहे. पण, सफाई कामगारांना या योजनेत सामावून घेतलेले नाही.ठाणे, उल्हासनगर, सोलापूर, अलिबाग, अकोले याठिकाणच्या महापालिका प्रशासनाने सफाई कर्मचाऱ्यांच्या नावे घरे केलेली आहेत, पण आपल्याकडे याची अंमलबजावणी का नाही, असा सवाल महाराष्ट्र रूखी ज्ञाती समाज या संघटनेचे पदाधिकारी दीपक चव्हाण, वसंत सोलंकी आणि विनोद चव्हाण यांनी केला आहे.ज्या सफाई कामगारांनी २५ वर्षे सलग सेवा बजावली, त्यांना मोफत घरे देण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. पण, त्याकडेही केडीएमसीचे दुर्लक्ष झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.स्ट्रक्चरल आॅडिट तुम्हीच करासंबंधित वसाहत केडीएमसीची असताना स्ट्रक्चरल आॅडिट तुम्हीच करा, असे रहिवाशांना सांगण्यात आले आहे. नोटीस बजावण्यापुरतीच प्रशासनाची कार्यवाही मर्यादित आहे. पर्यायी व्यवस्था करून या इमारतीच्या वास्तूची डागडुजी करण्याचा कोणताही प्रयत्न प्रशासनाकडून केला जात नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.‘ते’ आश्वासनही बासनातकामगारांच्या हक्कांसाठी तसेच मागण्यांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग नेमण्यात आला आहे. परंतु, या आयोगाचे काम आजवर केवळ बैठका घेण्यापुरतेच मर्यादित आहे. मागील वर्षी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष मनोहर झाला आणि राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामोजी पवार यांनी केडीएमसी हद्दीतील वसाहतींची पाहणी केली होती. त्यावेळी घर मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण, आजतागायत ठोस कार्यवाही झालेली नाही.