शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

जीवानिशी गेल्यावर जाग येणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:27 IST

प्रशांत माने लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : ठाणे महापालिकेतील महिला अधिकाऱ्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातून फेरीवाल्यांमधील गुन्हेगारी प्रवृत्तीचे दर्शन घडले ...

प्रशांत माने

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : ठाणे महापालिकेतील महिला अधिकाऱ्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातून फेरीवाल्यांमधील गुन्हेगारी प्रवृत्तीचे दर्शन घडले असताना कल्याण-डोंबिवलीतही फारशी वेगळी परिस्थिती नाही. जागा मिळवण्यावरून फेरीवाल्यांमध्ये तुंबळ हाणामारी तसेच कारवाईसाठी आलेल्या पथकांवर हल्ले झाल्याच्या घटना येथेही घडल्या आहेत. यात मुंब्रा व अन्य भागांतून येणाऱ्या फेरीवाल्यांचा सहभाग प्रामुख्याने दिसून आला आहे. स्थानिक फेरीवाल्यांना त्यांचा होणारा त्रास पाहता तातडीने कारवाई होणे, तसेच फेरीवाला पुनर्वसन धोरण राबविणे गरजेचे आहे, अन्यथा ठाण्यातील घटनेची पुनरावृत्ती इथेही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रेल्वेस्थानक परिसरात १५० मीटर अंतरापर्यंत व्यवसाय करण्यास फेरीवाल्यांना मनाई आहे. परंतु, कल्याण-डोंबिवली रेल्वेस्थानकांबाहेरचा परिसर याला अपवाद ठरत आहे. केडीएमसीच्या कुचकामी ठरलेल्या फेरीवाला अतिक्रमणविरोधी पथकांमुळे मनाई क्षेत्रात बिनदिक्कतपणे फेरीवाल्यांकडून व्यवसाय थाटले जात आहेत. त्यात शहराबाहेरच्या गुंडांच्या आश्रयाने व्यवसाय जोमात सुरू असताना फेरीवाल्यांमध्ये हाणामारीचे प्रसंग सातत्याने घडले आहेत. यात आपापसात प्राणघातक हल्लेही झाले आहेत.

केडीएमसीच्या महासभेत वेळोवेळी अशा गुंड प्रवृत्तीच्या फेरीवाल्यांबाबत चर्चा घडल्या आहेत. तसेच वाढत्या अतिक्रमणाबाबत ठोस कारवाईचे आदेशही दिले असून कर्तव्यात कसुरता करणाऱ्यांचे निलंबन करा, असे ठरावही मंजूर झाले आहेत. पण आजही परिस्थितीत कोणताही फरक पडलेला नाही. फेरीवाल्यांची मुजोरी इतकी वाढली आहे की, फेरीवाला पथकांवर हल्ले करण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दमदाटी व धक्काबुक्की करण्याच्या घटनाही वारंवार घडल्या आहेत. ऑक्टोबर २०१९ मध्ये डोंबिवलीत घडलेल्या फेरीवाल्यांमधील हाणामारीच्या घटनेवर आमदार रवींद्र चव्हाण यांनीही तीव्र नाराजी व्यक्त करीत तत्कालीन आयुक्त गोविंद बोडके यांना खरमरीत पत्र लिहून जमत नसेल तर बदली करून घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतरही अद्याप कोणतीही सुधारणा झालेली नाही.

फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही रखडला

फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही रखडला आहे. त्यामुळे तातडीने तो मुद्दा मार्गी लावून स्थानिक फेरीवाल्यांना न्याय द्यावा, जेणेकरून मुजोर फेरीवाल्यांची दादागिरी आणि दहशत सुंपष्टात येईल, याकडे लक्ष वेधले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे फेरीवाला पथकांना महापालिकेचा पोलीस बंदोबस्त मिळत होता, पण सध्या मिळत नाही. केवळ बेकायदा बांधकाम कारवाईच्या वेळी दिला जातो. विनापोलीस बंदोबस्त कारवाईची पथके दहशतीखाली असल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे.

---------------------