शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

जीवानिशी गेल्यावर जाग येणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:27 IST

प्रशांत माने लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : ठाणे महापालिकेतील महिला अधिकाऱ्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातून फेरीवाल्यांमधील गुन्हेगारी प्रवृत्तीचे दर्शन घडले ...

प्रशांत माने

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : ठाणे महापालिकेतील महिला अधिकाऱ्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातून फेरीवाल्यांमधील गुन्हेगारी प्रवृत्तीचे दर्शन घडले असताना कल्याण-डोंबिवलीतही फारशी वेगळी परिस्थिती नाही. जागा मिळवण्यावरून फेरीवाल्यांमध्ये तुंबळ हाणामारी तसेच कारवाईसाठी आलेल्या पथकांवर हल्ले झाल्याच्या घटना येथेही घडल्या आहेत. यात मुंब्रा व अन्य भागांतून येणाऱ्या फेरीवाल्यांचा सहभाग प्रामुख्याने दिसून आला आहे. स्थानिक फेरीवाल्यांना त्यांचा होणारा त्रास पाहता तातडीने कारवाई होणे, तसेच फेरीवाला पुनर्वसन धोरण राबविणे गरजेचे आहे, अन्यथा ठाण्यातील घटनेची पुनरावृत्ती इथेही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रेल्वेस्थानक परिसरात १५० मीटर अंतरापर्यंत व्यवसाय करण्यास फेरीवाल्यांना मनाई आहे. परंतु, कल्याण-डोंबिवली रेल्वेस्थानकांबाहेरचा परिसर याला अपवाद ठरत आहे. केडीएमसीच्या कुचकामी ठरलेल्या फेरीवाला अतिक्रमणविरोधी पथकांमुळे मनाई क्षेत्रात बिनदिक्कतपणे फेरीवाल्यांकडून व्यवसाय थाटले जात आहेत. त्यात शहराबाहेरच्या गुंडांच्या आश्रयाने व्यवसाय जोमात सुरू असताना फेरीवाल्यांमध्ये हाणामारीचे प्रसंग सातत्याने घडले आहेत. यात आपापसात प्राणघातक हल्लेही झाले आहेत.

केडीएमसीच्या महासभेत वेळोवेळी अशा गुंड प्रवृत्तीच्या फेरीवाल्यांबाबत चर्चा घडल्या आहेत. तसेच वाढत्या अतिक्रमणाबाबत ठोस कारवाईचे आदेशही दिले असून कर्तव्यात कसुरता करणाऱ्यांचे निलंबन करा, असे ठरावही मंजूर झाले आहेत. पण आजही परिस्थितीत कोणताही फरक पडलेला नाही. फेरीवाल्यांची मुजोरी इतकी वाढली आहे की, फेरीवाला पथकांवर हल्ले करण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दमदाटी व धक्काबुक्की करण्याच्या घटनाही वारंवार घडल्या आहेत. ऑक्टोबर २०१९ मध्ये डोंबिवलीत घडलेल्या फेरीवाल्यांमधील हाणामारीच्या घटनेवर आमदार रवींद्र चव्हाण यांनीही तीव्र नाराजी व्यक्त करीत तत्कालीन आयुक्त गोविंद बोडके यांना खरमरीत पत्र लिहून जमत नसेल तर बदली करून घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतरही अद्याप कोणतीही सुधारणा झालेली नाही.

फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही रखडला

फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही रखडला आहे. त्यामुळे तातडीने तो मुद्दा मार्गी लावून स्थानिक फेरीवाल्यांना न्याय द्यावा, जेणेकरून मुजोर फेरीवाल्यांची दादागिरी आणि दहशत सुंपष्टात येईल, याकडे लक्ष वेधले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे फेरीवाला पथकांना महापालिकेचा पोलीस बंदोबस्त मिळत होता, पण सध्या मिळत नाही. केवळ बेकायदा बांधकाम कारवाईच्या वेळी दिला जातो. विनापोलीस बंदोबस्त कारवाईची पथके दहशतीखाली असल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे.

---------------------