शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने मिराज, जेएफ-१७ सह ५ पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली; ऑपरेशन सिंदूरबाबत खुलासा
2
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
3
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
4
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
5
नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, श्रीकांत शिंदे करणार दौरा
6
Gold Rates 16 May : काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
7
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
8
आमिरची विमानतळावर वाट बघत होती गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट, कारमध्ये येताच दोघांनी एकमेकांना...
9
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
10
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
12
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
13
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
14
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
15
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
16
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
17
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
18
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
19
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
20
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा

जीवानिशी गेल्यावर जाग येणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:27 IST

प्रशांत माने लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : ठाणे महापालिकेतील महिला अधिकाऱ्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातून फेरीवाल्यांमधील गुन्हेगारी प्रवृत्तीचे दर्शन घडले ...

प्रशांत माने

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : ठाणे महापालिकेतील महिला अधिकाऱ्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातून फेरीवाल्यांमधील गुन्हेगारी प्रवृत्तीचे दर्शन घडले असताना कल्याण-डोंबिवलीतही फारशी वेगळी परिस्थिती नाही. जागा मिळवण्यावरून फेरीवाल्यांमध्ये तुंबळ हाणामारी तसेच कारवाईसाठी आलेल्या पथकांवर हल्ले झाल्याच्या घटना येथेही घडल्या आहेत. यात मुंब्रा व अन्य भागांतून येणाऱ्या फेरीवाल्यांचा सहभाग प्रामुख्याने दिसून आला आहे. स्थानिक फेरीवाल्यांना त्यांचा होणारा त्रास पाहता तातडीने कारवाई होणे, तसेच फेरीवाला पुनर्वसन धोरण राबविणे गरजेचे आहे, अन्यथा ठाण्यातील घटनेची पुनरावृत्ती इथेही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रेल्वेस्थानक परिसरात १५० मीटर अंतरापर्यंत व्यवसाय करण्यास फेरीवाल्यांना मनाई आहे. परंतु, कल्याण-डोंबिवली रेल्वेस्थानकांबाहेरचा परिसर याला अपवाद ठरत आहे. केडीएमसीच्या कुचकामी ठरलेल्या फेरीवाला अतिक्रमणविरोधी पथकांमुळे मनाई क्षेत्रात बिनदिक्कतपणे फेरीवाल्यांकडून व्यवसाय थाटले जात आहेत. त्यात शहराबाहेरच्या गुंडांच्या आश्रयाने व्यवसाय जोमात सुरू असताना फेरीवाल्यांमध्ये हाणामारीचे प्रसंग सातत्याने घडले आहेत. यात आपापसात प्राणघातक हल्लेही झाले आहेत.

केडीएमसीच्या महासभेत वेळोवेळी अशा गुंड प्रवृत्तीच्या फेरीवाल्यांबाबत चर्चा घडल्या आहेत. तसेच वाढत्या अतिक्रमणाबाबत ठोस कारवाईचे आदेशही दिले असून कर्तव्यात कसुरता करणाऱ्यांचे निलंबन करा, असे ठरावही मंजूर झाले आहेत. पण आजही परिस्थितीत कोणताही फरक पडलेला नाही. फेरीवाल्यांची मुजोरी इतकी वाढली आहे की, फेरीवाला पथकांवर हल्ले करण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दमदाटी व धक्काबुक्की करण्याच्या घटनाही वारंवार घडल्या आहेत. ऑक्टोबर २०१९ मध्ये डोंबिवलीत घडलेल्या फेरीवाल्यांमधील हाणामारीच्या घटनेवर आमदार रवींद्र चव्हाण यांनीही तीव्र नाराजी व्यक्त करीत तत्कालीन आयुक्त गोविंद बोडके यांना खरमरीत पत्र लिहून जमत नसेल तर बदली करून घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतरही अद्याप कोणतीही सुधारणा झालेली नाही.

फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही रखडला

फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही रखडला आहे. त्यामुळे तातडीने तो मुद्दा मार्गी लावून स्थानिक फेरीवाल्यांना न्याय द्यावा, जेणेकरून मुजोर फेरीवाल्यांची दादागिरी आणि दहशत सुंपष्टात येईल, याकडे लक्ष वेधले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे फेरीवाला पथकांना महापालिकेचा पोलीस बंदोबस्त मिळत होता, पण सध्या मिळत नाही. केवळ बेकायदा बांधकाम कारवाईच्या वेळी दिला जातो. विनापोलीस बंदोबस्त कारवाईची पथके दहशतीखाली असल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे.

---------------------