शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
4
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
5
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
7
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
9
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
10
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
11
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
12
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
13
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
14
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
15
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
16
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
17
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
18
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
19
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
20
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

यंदा तरी श्रावणात देवळात प्रवेश मिळणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : मार्च २०२० पासून भारतात कोरोना महामारीमुळे सर्वत्र धार्मिक स्थळे बंद ठेवली आहेत. गेल्यावर्षी श्रावण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : मार्च २०२० पासून भारतात कोरोना महामारीमुळे सर्वत्र धार्मिक स्थळे बंद ठेवली आहेत. गेल्यावर्षी श्रावण महिना शिवभक्तांना घरातच बसून पूजाअर्चना करून घालवावा लागला. यंदाही राज्य शासनाची निर्बंध मागे घेण्याची तयारी नसल्याने समस्या कायम असून यंदा तरी देवळात जाऊन देवाचे मनसोक्त दर्शन होणार का? असा सवाल शहरातील विविध देवी-देवतांचे उपासक, भक्त विचारत आहेत.

श्रावण महिना २५ जुलैपासून सुरू होत आहे. २२ ऑगस्टपर्यंत तो असेल. कोरोनामुळे यंदा तरी मंदिरात प्रवेश मिळणार का? असा सवाल भक्त मंदिर प्रशासनाला विचारत आहेत. त्या अनुषंगाने अभिषेक नोंदणी सुरू झाली असून मंदिरे उघडली नाहीत तरीही इच्छित देवतांवर अभिषेक व्हायला हवा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

------------

यंदा श्रावण २९ दिवसांचा असून २६ जुलै, २ ऑगस्ट, ९ ऑगस्ट, १६ ऑगस्ट अशा श्रावणी सोमवारच्या तारखा आहेत.

------------

२५ जुलैपासून श्रावण महिना सुरू होत आहे. महिनाभर बहुतांशी मंदिरांमध्ये पूर्जाअर्चना होत असते. या काळात मंदिर परिसरात आर्थिक उलाढाल वाढत असते. याच काळात भक्त विविध संकल्प सोडतात, काही जण दानधर्म करतात, तर काही जण मंदिरात दुधाचा अभिषेक, रुद्र पठण, श्री सुक्ताचे पठण करतात. काही उपास, उपासना करतात. या काळात खजूर, उपवासाचे खाद्यपदार्थ, फळे, वस्त्र, हार, फुले आदींना खूप मागणी असते. यंदाही त्याचा व्यवसाय करणारे व्यावसायिक निर्बंध शिथिल होतील, या आशेवर आहेत.

----------

डोंबिवलीत अनेक भक्त श्रावणात विशिष्ट संकल्प करतात, त्या भक्तांना यंदा देवळात येऊन इच्छित देवतेसमोर संकल्प सांगायचा आहे, अभिषेक पूजा करण्याची इच्छा आहे. मात्र, अद्यापही राज्य शासनाने मंदिरांबाबत निर्णय घेतलेला नाही. तो निर्णय झाला, तर भक्तांच्या आनंदाला पारावार राहणार नाही. मंदिरांची तसेच त्याअनुषंगाने अन्य व्यावसायिकांची आर्थिक विस्कटलेली घडी बसण्यास साहाय्य होईल. दीड वर्षात व्यक्तिगत आणि सामाजिक नुकसान खूप झाले आहे. आता श्रावणावरच व्यावसायिकांचे बरेच काही गणित अवलंबून आहे.

- ओमकार परूळकर, गुरुजी

-----------

गुरुपौर्णिमा तोंडावर आली असून राज्यात निर्बंध कायम आहेत, म्हणजे त्यानिमित्ताने होणारा व्यवसाय होणार नाही हे स्पष्ट आहे. श्रावणात तरी ती संधी मिळावी आणि हार, फुलांना मागणी मिळावी. गुढीपाडव्याचे दोन सण पाण्यात गेले. कुटुंबाची होणारी आर्थिक घुसमट सहन होत नाही. मंदिरे उघडायला हवीत. व्यवसायाला तेजी मिळावी.

- हार, फुले विक्रेता.

---------