शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

ठाणे परिवहनचे तिकीट वाढणार की कमी होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 23:48 IST

चेंडू सत्ताधाऱ्यांच्या कोर्टात : २० टक्के दरवाढीचा प्रस्ताव

ठाणे : ठाणे परिवहन प्रशासनाने गेल्या वर्षी प्रस्तावित केलेला २० टक्के तिकीटदरवाढीचा प्रस्ताव यंदाच्या अंदाजपत्रकात पुन्हा आणण्याचा विचार सुरू केला आहे. परंतु, आधीच बेस्ट उपक्रमाने कमी केलेले तिकीटदर, मेट्रोची सुरू असलेली कामे, यांमुळे ३० टक्के उत्पन्नावर झालेला परिणाम आणि इतर प्राधिकरणांचा बसलेला फटका यामुळे टीएमटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. तिकीटदरवाढ केली, तर प्रवासीसंख्या कमी होऊन उत्पन्नावरही परिणाम होणार आहे. यामुळे बेस्टच्या धर्तीवर सत्ताधारी शिवसेना परिवहनचे तिकीट वाढू देणार की कमी करणार, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून गेल्या वर्षी सत्ताधारी शिवसेनेने ही दरवाढ फेटाळली होती. पण, उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ बसत नसल्याने परिवहन प्रशासन यंदा भाडेवाढीचा प्रस्ताव पुन्हा अंदाजपत्रकात घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

परिवहनकडे आजघडीला ३५० च्या आसपास बस आहेत. तरीही परिवहनच्या उत्पन्नावर काही महिन्यांत चांगलाच परिणाम झाला आहे. एकीकडे प्रशासन तिकीटदरवाढ करण्याचे प्रस्तावित करीत असताना दुसरीकडे बेस्ट उपक्रमाने त्यांच्या तिकीटदरात घट केली. त्यामुळे परिवहनच्या उत्पन्नावर परिणाम झाला. दीड वर्षांपासून ठाण्यात मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे परिवहनच्या ३० टक्के बस कमी झाल्या आहेत. याशिवाय, विविध प्राधिकरणाच्या तसेच खाजगी बस या परिवहनचे प्रवासी पळवत असल्याने त्याचाही परिणाम उत्पन्नावर होऊन ते ३० लाखांवरून २७ लाखांच्या आसपास आले आहे. असे असतानाही चालू आर्थिक वर्षात डिझेल व सीएनजी दरातील लक्षणीय वाढ, परिवहनच्या जुन्या बस यामुळे डिझेलचा होणारा जास्त वापर तसेच जीएसटीमुळे वाहनांचे सुटे भाग खरेदी किमतीत झालेली दरवाढ यामुळे प्रशासनाने भाडेवाढीचा विचार सुरूकेला आहे.बेस्टचे अनुकरण करणार का ?परिवहनने भाडेवाढ केल्यास प्रवाशांची संख्या घटून उत्पन्नावरदेखील याचा परिणाम होणार आहे. आधीच ते घटले आहे. त्यात आणखी घट होणार आहे. त्यामुळे तिकीटदरात वाढ करण्यापेक्षा ते स्थिर ठेवून किंवा बेस्टने ज्यापद्धतीने तिकीटदर कमी केले, त्यानुसार दर कमी करून बसची संख्या वाढवून प्रवाशांना चांगली सुविधा दिल्यास परिवहनचे उत्पन्न वाढणार आहे. परंतु, टीएमटी बेस्टचे अनुकरण करणार काय, याकडे लक्ष लागले आहे.सेनेच्या भूमिकेकडे लक्ष : मुंबईत ज्या पद्धतीने बेस्टचे तिकीटदर कमी झाले आहे, त्यानुसार सदस्यांनी परिवहन प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून तिकीटदरवाढ कमी करावी, असे सूचित केले आहे. मात्र, कागद पुढे कुठे गहाळ झाला, हे कळू शकलेले नाही. आता सत्ताधारी शिवसेना तिकीटदरवाढ लादू देणार की कमी करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.