शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
15
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
16
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
17
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
18
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
19
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
20
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…

धिम्या मार्गावरील बोगद्यानजीकचे खांब हटवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 14:43 IST

मुंब्य्राहून ठाण्याच्या दिशेने जाणार्‍या धिम्या मार्गावरील बोगद्यानजीक असलेल्या खांबांमुळे अपघातांची संख्या वाढत असल्याने हे खांब हटवून दूर लावण्यात येणार असल्याचे आश्वासन रेल्वेचे विभागिय अभियंते एच.एस. चतुर्वेदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिले.

ठाणे : मुंब्य्राहून ठाण्याच्या दिशेने जाणार्‍या धिम्या मार्गावरील बोगद्यानजीक असलेल्या खांबांमुळे अपघातांची संख्या वाढत असल्याने हे खांब हटवून दूर लावण्यात येणार असल्याचे आश्वासन रेल्वेचे विभागिय अभियंते एच.एस. चतुर्वेदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिले. दरम्यान, मुंब्रा स्टेशन येथील नव्याने होत असलेल्या तीन व चार क्रमांकांच्या फलाटांना जोडणार्‍या पुलाचे काम 31 मार्चपर्यंत पूर्ण करुन हा पुल जनतेसाठी खुला करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.गेल्या आठवडाभरात धिम्या मार्गावरील दुसर्‍या बोगद्यानजीक असलेल्या खांबांना धडक लागून 4 तरुण आणि एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्लॉक अध्यक्ष बबलू शेमणा यांच्या नेतृत्वाखाली सलीम खान, रियाझ खान, इक्बाल घाणीवाला, शकील अन्सारी, सय्यद सलीम, रशीद काद्री या शिष्टमंडळाने रेल्वेचे  विभागिय अभियंते एच.एस. चतुर्वेदी आणि कार्यकारी अभियंते रिझवान अहमद यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अपघात रोखण्यासाठी सदरचे खाब हटवण्याची मागणी केली. “सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी जर एखादी गाडी रद्द झाली तर चाकरमानी मिळेल त्या गाडीने प्रवास करीत असतात. यामुळे दरवाजात लटकल्याने खांबावर आदळून अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे,” असे शेमणा यांनी निदर्शनास आणून दिले.   त्यावर अहमद यांनी हे खांब हटवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. जे ते शक्य झाले नाही तर  रेल्वे रुळांपासून ते दूर उभारण्यात येतील, असे आश्वासन दिले. तसेच, जो पर्यंत हे खांब हटटवण्यात येत नाहीत; तोपर्यंत या खांबानजीकच्या वळणावर ही गाडी हळू चालवण्याच्या सूचना मोटटरमेनला देण्यात येतील, असे सांगितले.दरम्यान. 3 आणि चार क्रमांकाच्या फलाटांचे काम, रेल्वे पुलाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. तर, सरकत्या जिन्यांची निविदाप्रक्रियाही सुरु करण्यात आली असल्याचेही अहमद आणि चतुर्वेदी यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे