शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

उल्हासनदी किनारीच्या आने गावाचे सुरक्षित स्थळी पुनर्वसन करणार- आमदार किसन कथोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 22:46 IST

कल्याण तालुक्यातील उल्हासनदीच्या किनारी असलेले आने गावात पावसाळ्यात नदीला येणाऱ्या पुरामुळे पूराचे पाणी गावात शिरून मोठ्या प्रमाणात गावाचे नुकसान होत असते.

टिटवाळा : कल्याण तालुक्यातील उल्हासनदीच्या किनारी असलेले आने गावात पावसाळ्यात नदीला येणाऱ्या पुरामुळे पूराचे पाणी गावात शिरून मोठ्या प्रमाणात गावाचे नुकसान होत असते. या गावाचे लगतच्याच परिसरात योग्य जागी स्थलांतर करून पुनर्वसन करणार असल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली.

उल्हासनदी ही कल्याण तालुक्यातील कल्याण नगर या महामार्गावरील रायते, आने, कांबा, वरप व म्हारळ या गावा जवळून वाहत आहे. यामुळे या गावांना मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन पूराचा फटका सहन करावा लागतो.  उल्हासनदीला थोडासा पूर आला तरी नदीचे पाणी आने गावात शिरते. यामुळे या गावातील शेतीचे, घरांचे व लोकांच्या इतर सामानाचे दरवर्षी अतोनात नुकसान होत असते. आने गावाची लोकवस्ती जवळ जवळ तीनशेहून अधिक आहे. या गावात ४५  ते ५० घरे आहेत.यावर्षी २६ ,  २७ व २८ जुलै  तसेच ३ ते ५ ऑगस्ट दरम्यान उल्हास नदीला पूर आल्याने गावात पूराचे पाणी शिरले होते. वारंवार पावसाळ्यात पूराचे पाणी येत असल्याने नागरिक कमालीचे हतबल झाले आहेत. यंदाच्या पूर स्थितीची पाहणी करत असतांना आमदार किसन कथोरे यांनी या गावाची व्यवस्थीत पाहणी केली. त्यावेळी ग्रामस्थांनी गावच्या स्थलांतराची मागणी कथोरे यांच्याकडे केली होती.त्यानुसार या गावाचे  स्थलांतर करण्यासाठी  किसन कथोरे यांनी महसूल प्रशासनास सूचना केल्या आहेत.  लवकरच या बाबतच्या हालचालींना वेग येणार असलयाचे समजते. पूढल्या वर्षीच्या पूराचा सामना न करावा लागणार असल्याने आने गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. 

टॅग्स :thaneठाणे