शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कबरस्तानाच्या जागेचा प्रश्न निकाली निघणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:45 IST

महापौर व आयुक्तांनी कबरस्तानाचा प्रस्ताव १६ एप्रिलच्या महासभेत घेण्यात येईल, असे आश्वासन दिल्यावर

उल्हासनगर : महापौर व आयुक्तांनी कबरस्तानाचा प्रस्ताव १६ एप्रिलच्या महासभेत घेण्यात येईल, असे आश्वासन दिल्यावर मुस्लिमबांधवांनी आपले साखळी उपोषण मंगळवारी रात्री उशिरा मागे घेतले. दरम्यान, मुस्लिम संघटनांनी महासभेत प्रस्ताव मंजूर होत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.उल्हासनगरमध्ये ६० हजारांपेक्षा अधिक मुस्लिम समाजाची संख्या असून २५ ते ३० वर्षांपासून त्यांनी कबरस्तानाच्या मागणीसाठी अनेक आंदोलने केली. कॅम्प नं.-५ येथील हिंदू स्मशानभूमीजवळ व म्हारळ गावाशेजारील भूखंड कबरस्तानासाठी मिळाला आहे. म्हारळ येथील कबरस्तानाच्या भूखंडावर दोन मृतदेहांचे दफनही करण्यात आले. मात्र, ग्रामस्थांनी कबरस्तानाला विरोध करून न्यायालयात धाव घेतल्याने प्रश्नचिन्ह उभे ठाकले. तर, कैलास कॉलनीतील भूखंड तांत्रिक कारणात अडकला आहे. शहरात कबरस्तान नसल्याने दफनविधीसाठी जनाजा अंबरनाथ अथवा कल्याणमध्ये घेऊन जावा लागतो. मात्र, त्यांनी अपुरी जागा असल्याचे कारण दाखवून नकारघंटा दिली आहे.शहरात कबरस्तान नसल्याने दफनविधीसाठी जनाजा कुठे न्यायचा, असा प्रश्न मुस्लिम समाजासमोर उभा ठाकला. त्यांनी अखेर महापालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले. तत्कालीन, आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेऊन साखळी उपोषण सुरू ठेवले होते. एका आठवड्यात दोन वेळा महापालिका प्रवेशद्वारासमोर जनाजा आणून दफनविधीसाठी खड्डा खोदण्याचा प्रयत्न झाला. मंगळवारी तर महापालिकेचे प्रवेशद्वार बंद करण्याचा निर्णय घेतला. महासभा सुरू असताना पालिका प्रवेशद्वाराला टाळे ठोकून आंदोलन सुरू केले. तसेच महापौर मीना आयलानी व उपमहापौर जीवन इदनानी यांच्याविरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या पुतळ्याचे दहन केले.आंदोलनाची माहिती महासभेत नगरसेवकांना मिळाल्यावर त्यांनी नाराजी व्यक्त करत कायदा हातात घेणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी आयुक्त गणेश पाटील यांच्याकडे केली.घटनेचे गांभीर्य ओळखून पाटील व उपायुक्त संतोष देहरकर यांनी पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांच्याशी संपर्क साधून पोलिसांची जादा कुमक मागवली.