शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

मतदानाचा टक्का वाढणार का?

By admin | Updated: February 21, 2017 05:46 IST

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी महापालिकेबरोबर आता सर्वच पक्षांनी जबाबदारी उचलली आहे.

ठाणे : मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी महापालिकेबरोबर आता सर्वच पक्षांनी जबाबदारी उचलली आहे. पालिकेने विविध स्वरूपाच्या जाहिराती, बॅनर, पोस्टर आदींच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. विविध पक्षांनी आपल्या हक्काच्या मतदारांना बाहेर काढण्यासाठी कंबर कसली आहे. परंतु, एवढे करून मागील वेळी ज्या पद्धतीने मतदानाचा टक्का घसरला होता, तो वाढवला जाईल का, हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.ठाणे महापालिकेच्या सातव्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून आता मतदारराजा कोणाच्या झोळीत आपले मत टाकणार की, बाहेर निघणारच नाही, हे पाहणे रंजक ठरणार आहे. उल्हासनगर, मुंबईत काही हॉटेलवाल्यांनी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जेवणाच्या बिलात सवलती दिल्या आहेत. ठाण्यात तशी परिस्थिती नसली तरीदेखील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी महापालिकेने पथनाट्ये, फिरता रथ, बॅनर, जाहिराती आणि पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. त्यानुसार, यंदा मतदानाचा खालावलेला टक्का वाढेल, अशी आशा महापालिकेला आहे. दरम्यान, यंदा ३३ प्रभागांतून १३१ जागांसाठी ८०५ उमेदवार रिंगणात असून या वेळी १२ लाख २९ हजार २६६ मतदार मतदान करणार असून त्यामध्ये ६ लाख ६७ हजार ८६८ पुरुष आणि ५ लाख ६१ हजार ३८५ महिला मतदार आणि १५ इतर मतदार आहेत. परंतु, त्यातील किती मतदार आता मतदानाचा हक्क बजावणार, याकडे लक्ष लागले आहे. मागील म्हणजेच २०१२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा मागोवा घेतल्यास त्या वेळेस ५३.२५ टक्के मतदानाची नोंद झाली होती. यामध्ये एकूण ११ लाख ९४ हजार ८८६ मतदारांपैकी ६ लाख ३६ हजार २८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. परंतु, २००७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ५६.५७ टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यानुसार, २०१२ मधील मतदानाचा टक्का हा साडेतीन टक्कयांनी घटला होता. एकीकडे मतदाराला बाहेर काढण्यासाठी पालिकेने तयारी केली असली, तरी विविध पक्षांनीदेखील यासाठी विशेष अशा मोहिमा हाती घेतल्या आहेत. (प्रतिनिधी)