शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणच्या महापौरपदाचा दावा भाजपा सोडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 03:38 IST

उल्हासनगरच्या सत्तेसाठी तडजोड : ओमी टीम काकुळतीला, साई पक्ष नरमला, शिवसेनेला अचानक लागली सत्तेची लॉटरी

सदानंद नाईक।

उल्हासनगर : पक्षाचाच एक भाग असलेल्या ओमी टीमला काहीही झाले तरी सत्तेतील पदे मिळू द्यायची नाहीत, असा पण केलेल्या भाजपातील असंतुष्ट गटामुळे उल्हासनगरात शिवसेनेला सत्तेची लॉटरी लागली आहे. भाजपा-शिवसेना युतीच्या वाटाघाटी सुरू झाल्याने ओमी टीम काकुळतील आली असून मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाला काही किंमत आहे की नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. मूठभर सदस्यांच्या बळावर भाजपाला हवे तसे वाकवण्याचा प्रयत्न करणारा साई पक्षही नरमला आहे. उल्हासनगरमधील भाजपाचे सध्याचे महापौरपद अबाधित रहावे अशी शहारध्यक्ष कुमार आयलानी यांची इच्छा असल्याने त्या बदल्यात भाजपा कल्याण-डोंबिवलीचे महापौर सोडण्यास राजी झाल्याचे सांगण्यात येते.कल्याण-डोंबिवलीत शिवसेना-भाजपाच्या सत्तावाटपाच्या करारानुसार मे महिन्यात शिवसेनेकडून वर्षभरासाठी भाजपाला महापौरपद मिळणार होते. त्यासाठी फिल्डिंग लावलेल्या इछुकांची निराशा होण्याची शक्यता आहे.उल्हासनगरच्या राजकारणातील माजी आमदार कुमार आयलानी आणि पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी यांच्या टीममधील शीतयुद्ध भडकल्याने हातची सत्ता जाऊ नये यासाठी भाजपाने शिवसेनेसोबत युतीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पक्षातील एमी टीमचे महत्त्व संपेल. शिवाय साई पक्षाची गरज उरणार नाही. तेथे सतेत शिवसेनेला वाटा दिला जाईल. शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करून ओमी कलानी गटाची कोंडी केली, तर तो गट फुटून बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपाच्या जागा शिवसेनेपेक्षा कमी होतील. तरीही तेथील महापौरपद भाजपाला टिकवायचे आहे. सध्या कुमार आयलानी यांची पत्नी मीना या महापौर आहेत आणि त्यांना त्यांच्या महापौरपदाची अडीच वर्षे पूर्ण करायची असल्याने शिवसेनेला सध्या तरी त्या पदासाठी संधी मिळणार नाही. त्यामुळे त्या बदल्यात स्थायीसह काही समित्या वाटून घेण्याचा पर्याय आहे. पण उल्हासनगरचे महापौरपद लगेच मिळणार नसेल, तर त्या बदल्यात भाजपाने कल्याण-डोंबिवलीचे वर्षभरासाठी मिळणारे महापौरपद सोडण्याची तयारी दाखवल्याचे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले. त्याऐवजी कल्याण-डोंबिवलीत अन्य पदे भाजपाला मिळतील, अशी ही तडजोड आहे. त्यावर वाटाघाटी सुरू आहेत.ंओमी कलानी यांना विधानसभा निवडणूक लढवायची असल्याने भाजपातून फुटून जर ते बाहेर पडले तर सतत वेगवेगळ््या मुद्द्यांवरून पक्षाला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडणार नाहीत. अजूनही भाजपाशी जुळवून घेण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पण त्यात यश आले नाही, तर पालिकेत बाजपाची कोंडी करून विधानसभेची तयारी करण्याचा एकमेव पर्याय त्यांच्यापुढे आहे.साई पक्षाने गेले दशकभर उल्हासनगरच्या सत्तेच्या, पदांच्या नाड्या आपल्या हाती ठेवल्या होत्या. आता भाजपा-शिवसेना सत्तेसाठी एकत्र आल्यावर संख्याबळासाठीही त्यांना साई पक्षाची आवश्यकता नाही. पदांच्या वाटपात वाटेकरी वाढला, तर बंडाळी माजेल. त्यामुळे साई पक्षालाही सत्तेपासून दूर ठेवून ती पदे शिवसेनेच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. पालिका निवडणुकीत शिवसेनेच्या तोंडचा घास साई पक्षाने हिरावून घेतल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे नाराज होते. ते उट्टे काढण्याची आयती संधी त्यांना चालून आली आहे.भाजपाची सारी गणिते विधानसभेची, तर शिवसेनेची लोकसभेचीविधानसभा निवडणुकीत जरी शिवसेना-भाजपाची युती झाली नाही, तरी त्या काळात महापौरपद आपल्या पक्षाकडे असणे भाजपाला फायद्याचे ठरेल. शिवाय शिवसेनेचा विरोधही मवाळा असेल. त्यामुळे या दोन्ही शहरात या निवडणुकीचा विचार करून पदांचे वाटप केले जाईल. पालकमंत्री एकनाथ शिंदे कल्याण लोकसभेतून मुलगा डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विजयाच्या मार्गातील काटे दूर करण्यासाठी खूप अगोदरपासून प्रयत्नशील आहेत. उल्हासनगरमधील तडजोड ही लोकसभेसाठी त्यांच्या फायद्याची ठरणार आहे.मतदारांचा कौल भाजपा-ओमी टीमला : उल्हासनगरच्या मतदारांनी भाजपाला एकट्याला नव्हे, तर भाजपा-ओमी टीमला एकत्र कौल दिल्याचा दावा ओमी टीमने केला आहे. भाजपासोबत आम्ही पाच वर्षे सत्तेत राहणार असल्याचा दावा ओमी टीमचे प्रमुख ओमी कलानी यांनी व्यक्त केला. उल्हासनगरच्या महापौरपदाचा शब्द आम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे तो पाळला जाईल आणि मे महिन्यात आम्हाला महापौरपद मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Electionनिवडणूक