शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
5
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
6
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
7
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
8
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
9
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
10
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
11
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
12
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
13
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
14
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
15
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
16
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
17
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
18
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
20
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?

पोलिसांसाठीच्या योजनांची आर्थिक तरतूद वाढवणार

By admin | Updated: January 14, 2016 00:38 IST

राज्य शासनाकडून पोलिसांना मिळणारा निधी अपुरा पडतो. त्यामुळे पोलिसांसाठीच्या विविध योजना राबविण्यासाठी आर्थिक तरतुदींमध्ये वाढ करण्याचा मानस ठाण्याचे मावळते सहपोलीस

ठाणे : राज्य शासनाकडून पोलिसांना मिळणारा निधी अपुरा पडतो. त्यामुळे पोलिसांसाठीच्या विविध योजना राबविण्यासाठी आर्थिक तरतुदींमध्ये वाढ करण्याचा मानस ठाण्याचे मावळते सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी व्यक्त केला. अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून मुंबईत प्रशासन विभागाची जबाबदारी लक्ष्मीनारायण यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पदभार सोडण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली. ‘पोलिसांची वाहने, शस्त्रे, निवासस्थाने तसेच इतर सर्व सामग्रीच्या खरेदीसाठी राज्य शासनाच्या अर्थसंकल्पातील तरतूद वाढविल्यास अनेक गोष्टी शक्य होणार आहेत, याशिवाय, राज्यभरातील पोलिसांना मुंबईत औषधोपचार घ्यायचे झाल्यास तांत्रिक अडचणी येत आहेत. त्या दूर करण्याचा प्रयत्न होईल, असे ते म्हणाले. पोलिसांच्या बदल्या तसेच बढत्या आणि त्यांच्या कारभारात पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला जाईल,’ असे त्यांनी सांगितले.ठाण्यातील आपल्या कारकिर्दीबद्दल ते म्हणाले, ‘ठाणेकरांनी कोणत्याही चांगल्या निर्णयाला उत्स्फूर्तपणे साथ दिली. डान्स बार किंवा खासगी बसेसवरील कारवाईच्या वेळी हा अनुभव आला. तपासामध्ये अधिकाऱ्याला वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळावे, म्हणून वापरलेल्या ‘सतर्क’ या सॉफ्टवेअरचा फायदा झाला. आता हीच यंत्रणा राज्यभर राबविण्यासाठी महासंचालक पातळीवर विचार सुरू आहे. सोनसाखळी चोरी तसेच महिलांच्या संदर्भातील गुन्ह्णांवर बऱ्यापैकी अंकुश मिळविला. त्यासाठी वेगळी पेट्रोलिंग योजना राबविली. आंबिवलीच्या इराणी वस्तीवर कोम्बिंग आॅपरेशन आणि प्रबोधनही केले.’ कामाचा आढावा घेताना ते म्हणाले, ‘वर्तकनगर येथील पोलीस वसाहतीचा म्हाडाकडून पुनर्विकास केला जाणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी अल्प दरात घरेही उपलब्ध व्हावीत, यासाठी प्रयत्न केला.’ (प्रतिनिधी)नियंत्रण कक्षात लखनौ पॅटर्नठाण्यातील नियंत्रण कक्षात लखनौच्या धर्तीवर मोबाइल डाटा ट्रान्समीटर बसविले आहेत. त्यामुळे रस्त्यावरचा राडा थेट नियंत्रण कक्षात दिसणार आहे. ५० लाखांच्या खर्चातून नियंत्रण कक्षात कमांड सेंटर सुरू होणार आहे. याशिवाय, ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या नियंत्रण कक्षाचाही कायापालट करून आधुनिक सुविधांसह सीसीटीव्हींनी जोडला आहे. आधुनिकीकरणावर जोर देत लोकाभिमुख पोलिसिंगवर भर दिला, याकडे त्यांनी लक्ष वेधले.