शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

‘डाव’ खरे होणार?

By admin | Updated: March 26, 2016 02:45 IST

दोन महिन्यांवर आलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत डावखरे यांनी पाचव्यांदा निवडून येण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली असली, तरी स्थानिक स्वराज्य

- अजित मांडके,  ठाणेदोन महिन्यांवर आलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत डावखरे यांनी पाचव्यांदा निवडून येण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली असली, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांत वाढलेल्या बळामुळे यंदा त्यांना शिवसेनेचे कडवे आव्हान पेलावे लागणार आहे. त्याचवेळी विविध पक्षांत मैत्रीचे संबंध राखून असलेल्या डावखरे यांना कडवी लढत देण्यासाठी शिवसेनेलाही अनेक अर्थांनी तगडा उमेदवार द्यावा लागणार आहे. पुढच्या वर्षी पालिका निवडणूक असल्याने नाराजीला तोंड फुटणार नाही, याची काळजी घेत शिवसेनेला उमेदवार द्यावा लागणार आहे. सध्या तिघांची नावे पुढे येत असली तरी निवडून येण्याच्या क्षमतेवर उपऱ्याला संधी की निष्ठावंताला अशी चर्चा रंगली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेवर निवडून देण्याची ठाण्याची जागा आता ठाणे-पालघर अशी विस्तारली आहे. त्यावर आजवर डावखरे यांचे निर्विवाद वर्चस्व असल्याने राष्ट्रवादीकडून स्वाभाविकपणे त्यांचेच नाव निश्चित झाले. काँग्रेसने यापूर्वीच डावखरे यांना पाठींबा दर्शविला आहे. शिवसेनेच्या मदतीसाठी डावखरे यांनी ‘मातोश्री’वर जाऊन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेटही. पण ‘बघू, विचार करु,’ असे उत्तर त्यांना मिळाल्याचे बोलले जाते. शिवसेनेने आपल्या वाढत्या बळाचा विचार करून तगडा उमेदवार दिला, तर मात्र यंदाच्या निवडणुकीत ‘डाव’ खरे होणार का, हाच प्रश्न राजकीय वर्तुळात आहे. सध्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या महापालिका शिवसेना-भाजपाच्या ताब्यात आहेत. नवी मुंबईतही शिवसेनेची ताकद वाढली आहे. अंबरनाथ, बदलापुर नगरपालिकेवरही शिवसेना-भाजपाचा वरचष्मा आहे. त्यामुळे डावखरेंना दीर्घकाळानंतर पहिल्यांदाच या निवडणुकीत कडवे आव्हान पेलावे लागणार असल्याची चिन्हे आहेत. १९९२ आणि १९९८ मध्ये डावखरे यांनी कॉंग्रेसच्या तिकीटावर ही निवडणुक लढविली आहे. त्यानंतर २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांना शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी आव्हान दिले होते. २०१० मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने रमेश म्हात्रे यांना संधी दिली होती. परंतु ऐन वेळेस शिवसेनेने म्हात्रे यांना माघार घेण्यास भाग पाडल्याने डावखरे बिनविरोध निवडुन आले होते.शिवसेनेने जरी या निवडणुकीची तयारी केली असली तरी, त्या पक्षात तिघे मातब्बर इच्छुक झाल्याने पक्षाची कोणावर कृपादृष्टी होणार, याकडेही लक्ष लागले आहे. आधीचा त्याग लक्षात घेता शिवसेनेतून ज्येष्ठ नेते अनंत तरे यांचे नाव आघाडीवर आहे. त्या खालोखाल रवींद्र फाटक आणि एच. एस. पाटील यांच्या नावांचीही चर्चा आहे. ज्याची आर्थिक बाजू भक्कम असेल तोच वरचढ ठरतो हे या निवडणुकीत यापूर्वीही स्पष्ट झाले आहे. या तिघांमध्ये फाटक यांची हीच जमेची बाजू आहे. त्यांना २००४ मधील ही निवडणूक लढवण्याचा अनुभव आहे. मात्र फाटक यांना विधानसभेला संधी दिली होती, तर एच. एस. पाटील यांना महापौरपद दिल्याने त्यांना पुन्हा संधी दिली जाईल का? याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहे. शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांनी या जागेसाठी थेट वरिष्ठांकडून मोर्चेबांधणी केली आहे. विधानसभा निवडणुकीवेळी ते इच्छुक होते, परंतु त्यांना डावलून फाटक यांना संधी देण्यात आल्याने त्यांनी बंडखोरी करुन थेट एकनाथ शिंदे यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यापूर्वीही डावलण्यात आल्याने आता ही संधी सोडण्याची त्यांची मन:स्थिती नाही.बविआकडे १०७ नगरसेवकांचा गटबहुजन विकास आघाडीकडे १०७ नगरसेवकांचा मजबूत गट आहे. सध्या ते राष्ट्रवादीच्या बाजुने असल्याचे चित्र असले तरी यापूर्वीचा इतिहास पाहिल्यास केंद्रात आणि राज्यात ज्या पक्षांची सत्ता आहे त्याच बाजुने त्यांचा कल असतो. त्यामुळे ऐनवेळी शिट्टी कोणाच्या बाजूने वाजणार, हेही निर्णायक ठरेल.त्या चार मतांचा फटका? : सध्या परमार प्रकरणात जामिनावर बाहेर आलेले हणमंत जगदाळे, नजीब मुल्ला, विक्रांत चव्हाण आणि सुधाकर चव्हाण यांचे नगरसेवकपद रद्द करण्यासाठी राज्य शासनाकडून हालचाली सुरु आहेत. त्यांचे पद रद्द झाले तर त्याचा फटका राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता आहे.