शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

अकरावीला मनासारखे कॉलेज मिळेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क / स्नेेहा पावसकर ठाणे - अकरावी प्रवेशासाठी होणारी सीईटी परीक्षा रद्द करण्यात आली आहे; त्यामुळे आता ...

लोकमत न्यूज नेटवर्क / स्नेेहा पावसकर

ठाणे - अकरावी प्रवेशासाठी होणारी सीईटी परीक्षा रद्द करण्यात आली आहे; त्यामुळे आता अकरावी प्रवेशासाठी तेच दहावीतील टक्केवारीचे निकष लावणार आणि त्यातून आपल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार का, याकडे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे लक्ष लागले आहे. यंदा कोरोनामुळे परीक्षा रद्द झाल्या; त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल लावले. बहुतांश शाळांचे निकाल १०० टक्के आणि मुलांचेही गुण ९० टक्क्यांच्या पुढे आहेत. अनुत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी झाले. साहजिकच यामुळे अकरावी प्रवेशाची चुरस वाढणार हे नक्की होतं; पण शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्याचे जाहीर केले होते. मात्र हायकोर्टाने तो निर्णय रद्द ठरविला. त्यामुळे आता पु्न्हा अकरावीचे प्रवेश होताना आपल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल की नाही, अशी चिंता विद्यार्थ्यांना आहे.

ठाणे जिल्ह्यात दहावी परीक्षेसाठी १ लाख २४ हजार ९१ विद्यार्थी होेते. त्यांपैकी १ लाख २३ हजार २०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांत ६६८४५ मुले, तर ५७२४६ मुली आहेत.

---------

महाविद्यालयांचा कटऑफ वाढणार

आधीच कोरोनामुळे निकषांच्या आधारे लागलेल्या निकालात नापास होणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. अनेक विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले. १०० टक्के गुणही अनेकांना मिळाले. त्याच गुणांच्या आधारे आता प्रवेश होणार असतील तर त्यामुळे महाविद्यालयांचे कटऑफ वाढणार आणि प्रवेशाची चुरस अधिक वाढणार हे नक्की.

---------

आधी आम्ही परीक्षेच्या अनुषंगाने अभ्यास केला. मात्र नंतर अंतर्गत मूल्यमापन करून दिले. नंतर सीईटीच्या दृष्टीने अभ्यास केला; तर आता त्याच गुणांच्या आधारे प्रवेश देणार असे स्पष्ट केले. शासनाने योग्य वेळी एकच ठाम निर्णय घेतला नाही. त्यात आमचे नुकसान झाले. आता आम्हाला मिळेल त्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागेल.

- राखी बांडे, विद्यार्थिनी

----------

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीची परीक्षा रद्द केली योग्य; पण आता सीईटी ऑनलाईन घेता आली असती. आम्हाला यंदा अभ्यास करून निकालासाठी उपयोग झाला नाही. गेल्या वर्षी थोडा कमी अभ्यास झाला होता; पण तेच गुण ग्राह्य धरल्याने त्याचा परिणाम आता आमच्या महाविद्यालयीन प्रवेशावर होईल.

- सोहम महाडेश्वर, विद्यार्थी

--------

आता १४ ऑगस्टपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे; पण अनेक विद्यार्थी चांगले कॉलेज मिळेल की नाही या भीतीत आहेत. राज्य सरकार सीईटीच्या तयारीत होते; मात्र हायकोर्टाने निर्णय रद्द केल्याने तशा पद्धतीने नियोजित प्रवेश प्रक्रिया बारगळली, असे मत एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी व्यक्त केले.