शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीला मनासारखे कॉलेज मिळेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क / स्नेेहा पावसकर ठाणे - अकरावी प्रवेशासाठी होणारी सीईटी परीक्षा रद्द करण्यात आली आहे; त्यामुळे आता ...

लोकमत न्यूज नेटवर्क / स्नेेहा पावसकर

ठाणे - अकरावी प्रवेशासाठी होणारी सीईटी परीक्षा रद्द करण्यात आली आहे; त्यामुळे आता अकरावी प्रवेशासाठी तेच दहावीतील टक्केवारीचे निकष लावणार आणि त्यातून आपल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार का, याकडे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे लक्ष लागले आहे. यंदा कोरोनामुळे परीक्षा रद्द झाल्या; त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल लावले. बहुतांश शाळांचे निकाल १०० टक्के आणि मुलांचेही गुण ९० टक्क्यांच्या पुढे आहेत. अनुत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी झाले. साहजिकच यामुळे अकरावी प्रवेशाची चुरस वाढणार हे नक्की होतं; पण शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्याचे जाहीर केले होते. मात्र हायकोर्टाने तो निर्णय रद्द ठरविला. त्यामुळे आता पु्न्हा अकरावीचे प्रवेश होताना आपल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल की नाही, अशी चिंता विद्यार्थ्यांना आहे.

ठाणे जिल्ह्यात दहावी परीक्षेसाठी १ लाख २४ हजार ९१ विद्यार्थी होेते. त्यांपैकी १ लाख २३ हजार २०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांत ६६८४५ मुले, तर ५७२४६ मुली आहेत.

---------

महाविद्यालयांचा कटऑफ वाढणार

आधीच कोरोनामुळे निकषांच्या आधारे लागलेल्या निकालात नापास होणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. अनेक विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले. १०० टक्के गुणही अनेकांना मिळाले. त्याच गुणांच्या आधारे आता प्रवेश होणार असतील तर त्यामुळे महाविद्यालयांचे कटऑफ वाढणार आणि प्रवेशाची चुरस अधिक वाढणार हे नक्की.

---------

आधी आम्ही परीक्षेच्या अनुषंगाने अभ्यास केला. मात्र नंतर अंतर्गत मूल्यमापन करून दिले. नंतर सीईटीच्या दृष्टीने अभ्यास केला; तर आता त्याच गुणांच्या आधारे प्रवेश देणार असे स्पष्ट केले. शासनाने योग्य वेळी एकच ठाम निर्णय घेतला नाही. त्यात आमचे नुकसान झाले. आता आम्हाला मिळेल त्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागेल.

- राखी बांडे, विद्यार्थिनी

----------

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीची परीक्षा रद्द केली योग्य; पण आता सीईटी ऑनलाईन घेता आली असती. आम्हाला यंदा अभ्यास करून निकालासाठी उपयोग झाला नाही. गेल्या वर्षी थोडा कमी अभ्यास झाला होता; पण तेच गुण ग्राह्य धरल्याने त्याचा परिणाम आता आमच्या महाविद्यालयीन प्रवेशावर होईल.

- सोहम महाडेश्वर, विद्यार्थी

--------

आता १४ ऑगस्टपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे; पण अनेक विद्यार्थी चांगले कॉलेज मिळेल की नाही या भीतीत आहेत. राज्य सरकार सीईटीच्या तयारीत होते; मात्र हायकोर्टाने निर्णय रद्द केल्याने तशा पद्धतीने नियोजित प्रवेश प्रक्रिया बारगळली, असे मत एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी व्यक्त केले.