शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

अकरावीला मनासारखे कॉलेज मिळेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क / स्नेेहा पावसकर ठाणे - अकरावी प्रवेशासाठी होणारी सीईटी परीक्षा रद्द करण्यात आली आहे; त्यामुळे आता ...

लोकमत न्यूज नेटवर्क / स्नेेहा पावसकर

ठाणे - अकरावी प्रवेशासाठी होणारी सीईटी परीक्षा रद्द करण्यात आली आहे; त्यामुळे आता अकरावी प्रवेशासाठी तेच दहावीतील टक्केवारीचे निकष लावणार आणि त्यातून आपल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार का, याकडे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे लक्ष लागले आहे. यंदा कोरोनामुळे परीक्षा रद्द झाल्या; त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल लावले. बहुतांश शाळांचे निकाल १०० टक्के आणि मुलांचेही गुण ९० टक्क्यांच्या पुढे आहेत. अनुत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी झाले. साहजिकच यामुळे अकरावी प्रवेशाची चुरस वाढणार हे नक्की होतं; पण शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्याचे जाहीर केले होते. मात्र हायकोर्टाने तो निर्णय रद्द ठरविला. त्यामुळे आता पु्न्हा अकरावीचे प्रवेश होताना आपल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल की नाही, अशी चिंता विद्यार्थ्यांना आहे.

ठाणे जिल्ह्यात दहावी परीक्षेसाठी १ लाख २४ हजार ९१ विद्यार्थी होेते. त्यांपैकी १ लाख २३ हजार २०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांत ६६८४५ मुले, तर ५७२४६ मुली आहेत.

---------

महाविद्यालयांचा कटऑफ वाढणार

आधीच कोरोनामुळे निकषांच्या आधारे लागलेल्या निकालात नापास होणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. अनेक विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले. १०० टक्के गुणही अनेकांना मिळाले. त्याच गुणांच्या आधारे आता प्रवेश होणार असतील तर त्यामुळे महाविद्यालयांचे कटऑफ वाढणार आणि प्रवेशाची चुरस अधिक वाढणार हे नक्की.

---------

आधी आम्ही परीक्षेच्या अनुषंगाने अभ्यास केला. मात्र नंतर अंतर्गत मूल्यमापन करून दिले. नंतर सीईटीच्या दृष्टीने अभ्यास केला; तर आता त्याच गुणांच्या आधारे प्रवेश देणार असे स्पष्ट केले. शासनाने योग्य वेळी एकच ठाम निर्णय घेतला नाही. त्यात आमचे नुकसान झाले. आता आम्हाला मिळेल त्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागेल.

- राखी बांडे, विद्यार्थिनी

----------

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीची परीक्षा रद्द केली योग्य; पण आता सीईटी ऑनलाईन घेता आली असती. आम्हाला यंदा अभ्यास करून निकालासाठी उपयोग झाला नाही. गेल्या वर्षी थोडा कमी अभ्यास झाला होता; पण तेच गुण ग्राह्य धरल्याने त्याचा परिणाम आता आमच्या महाविद्यालयीन प्रवेशावर होईल.

- सोहम महाडेश्वर, विद्यार्थी

--------

आता १४ ऑगस्टपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे; पण अनेक विद्यार्थी चांगले कॉलेज मिळेल की नाही या भीतीत आहेत. राज्य सरकार सीईटीच्या तयारीत होते; मात्र हायकोर्टाने निर्णय रद्द केल्याने तशा पद्धतीने नियोजित प्रवेश प्रक्रिया बारगळली, असे मत एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी व्यक्त केले.