शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

दोन मृत्यू दाखल्याने पत्नी वारसा हक्कापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 03:01 IST

मलंगगडाजवळ असलेल्या कुशिवली गावात राहणारे मंगल जानू चिडा लग्नानंतर काही वर्षांनी दहिवली ग्रामपंचायत हद्दीतील सावरोली येथील आपल्या सासुरवाडीला येऊन स्थायिक झाले.

बदलापूर :  एकाच व्यक्तीचा एकाच तालुक्यात दोन ग्रामपंचायतींमध्ये वेगवेगळ्या वेळी मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. दोन्ही ठिकाणी मृत्यूची नोंद झाल्यामुळे मृत व्यक्तीची पत्नी वारसा हक्कापासून वंचित राहिल्याची घटना समोर आली आहे. पतीच्या निधनाची दोन ठिकाणी नोंद झाल्याने अंबरनाथ तालुक्यातील ही आदिवासी महिला आपल्याला वारसा हक्क मिळावा, यासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे. हक्क नोंदीपासून तब्बल एक तप वंचित राहिली आहे. 

मलंगगडाजवळ असलेल्या कुशिवली गावात राहणारे मंगल जानू चिडा लग्नानंतर काही वर्षांनी दहिवली ग्रामपंचायत हद्दीतील सावरोली येथील आपल्या सासुरवाडीला येऊन स्थायिक झाले. मंगल चिडा यांचे भाऊबंद मात्र कुशिवली गावात आहेत. त्यांची वडिलोपार्जित काही एकर जमीन कुशिवली गावात आहे. मंगल यांचे २७ मे २००८ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूूची नोंद अंबरनाथ तालुक्यातील दहिवली ग्रामपंचायतीत करण्यात आली आहे. पतीच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीमधील वाटा कायद्याने पत्नी आणि मुलीला मिळणे अपेक्षित आहे. त्याप्रमाणे त्या संपत्तीमध्ये वाटा मिळण्यासाठी सातबारा उताऱ्यावर त्यांच्या नावांची नोंद होणे गरजेचे आहे.

मंगीबाई मंगल चिडा असे पत्नीचे नाव आहे. तहसील कार्यालयात त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांचे पती मंगल यांचे २७ मे २००८ रोजी निधन झाले असून त्यांच्या मृत्यूूची नोंद अंबरनाथ तालुक्यातील दहिवली ग्रामपंचायतीत झाली आहे. प्रतिज्ञापत्रासोबत त्यांनी तो दाखलाही जोडला आहे. मात्र, संबंधित तलाठ्यांनी या प्रकरणी चौकशी केली असता याच तालुक्यातील श्री मलंगपट्ट्यातील कुशिवली ग्रामपंचायत हद्दीत याच व्यक्तीच्या नावे आणखी एक मृत्यू दाखला असल्याचे आढळले. त्या दाखल्यावरील मृत्यूची तारीख मात्र ३ एप्रिल २००८ अशी आहे. मंगल यांच्या मृत्यूच्या दोन ठिकाणी वेगवेगळ्या नोंदी आढळल्याने पत्नी मंगीबाई आणि मुलगी मीना बांगारे यांची वारसा हक्क नोंद रखडली आहे. एकुलत्या एक मुलीचे लग्न झाले आहे. माझा वारसा हक्क नोंद होऊन मला माझा हिस्सा मिळाला पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली .

‘त्या’ व्यक्तीचा मृत्यू झाला हे निश्चित असल्याने त्यांचा वारस तपासून वारसदार महिला आणि त्यांच्या मुलीचे नाव वारस नोंद करण्यात कोणतीही अडचण दिसत नाही. संबंधित विभागाला त्यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. - जयराज देशमुख, तहसीलदार   

टॅग्स :thaneठाणे