शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

हॉटेलमध्ये सर्रास गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : शहरात कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत असल्याने दुसरीकडे सरकारने घातलेल्या निर्बंधांना सर्रास पायदळी तुडवले जात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : शहरात कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत असल्याने दुसरीकडे सरकारने घातलेल्या निर्बंधांना सर्रास पायदळी तुडवले जात आहे. गेल्या आठवड्यापासून शहरातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून महापालिका प्रशासनाने सरकारच्या निर्बंधांची अंमलबजावणी सुरू केली. दोन दिवसांपूर्वी कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला शंभरीपार झाल्याने, महापालिकेची चिंता वाढली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने घातलेल्या निर्बंधांचे पालन केले जाते की नाही, याची शहानिशा महापौर लीलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप पगारे स्वतः करीत आहेत. अंत्यसंस्काराच्या वेळी २० तर लग्नसमारंभाला ५० नागरिकांची मर्यादा ठरविली असतानाही त्याचे सर्रास उल्लंघन होऊनही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

शहरातील हॉटेलमध्ये ५० टक्के उपस्थिती ठेवण्याच्या आदेशाला सर्रासपणे पायदळी तुडविले जात असून उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. हॉटेलमध्ये कोणत्याही निर्बंधांविना नागरिकांना प्रवेश दिले जात असून हॅण्डवॉश, सॅनिटायझरचा वापर, मास्क न लावणे, थर्मल स्क्रीनिंग केले जात नसल्याची टीका होत आहे. महापालिका पथक व पोलीस विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करीत आहेत. तर दुसरीकडे महापालिका प्रवेशद्वार येथील हॅण्डवॉश बंद केले असून थर्मल स्क्रीनिंगची मशीन गेली कुठे, असा प्रश्न नगरिकांकडून व्यक्त होत आहे. महापालिका आयुक्तांनी नागरिकांनी स्वतःहून सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.