शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
3
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
4
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
5
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
6
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
7
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
8
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
9
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
10
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
11
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
12
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
13
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
14
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
15
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
16
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
19
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
20
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश

डोंबिवलीतील ‘त्या’ चाळींवर कारवाई का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:47 IST

मनसेच्या नेत्यांचा सवाल : पाणी भरल्याने रहिवाशांवर टांगती तलवार कायम

डोंबिवली : मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमधील गोरगरिबांची घरे पाण्याखाली गेली. आयुष्याची पुंजी साठवून घर घेणाऱ्या तळागळातील नागरिकांचे संसार रस्त्यावर आले असून, याला जबाबदार कोण? कोणाच्या आशीर्वादाने शहरात चाळी उभ्या राहत आहेत. एकीकडे महापालिका चाळींमधली घर घेऊ नका, असे आवाहन करत असताना रातोरात उभ्या राहणाºया चाळी प्रशासनाला दिसत नाहीत का? असा सवाल मनसे नेते राजू पाटील यांनी केला आहे.

पाटील यांनी टिष्ट्वट करत यासंदर्भात महापालिका प्रशासन, सत्ताधारी यांच्यावर झोड उठवून नाराजी व्यक्त केली. संसार उघड्यावर आले त्यात रहिवाशांचा दोष काय? परवडणारी घरे घेतानाही त्यांची फसवणूक होत आहे. बांधणारे चाळी बांधून पैसा कमवून निघून जातात, पण रहिवाशांवर टांगती तलवार कायम असते. त्याचे काय? राज्य व केंद्र सरकारच्या परवडणाºया दरांत घरे या घोषणेचे काय झाले? की अनेक घोषणांप्रमाणे ही योजनाही कागदावरच राहिली का?, असा सवालही त्यांनी केला. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, असे ते म्हणाले.दुसरीकडे, पश्चिमेतील स्थिती पाहावत नाही का, अशी टीका माजी नगरसेवक रणजीत जोशी यांनी केली. खाडीकिनारी बांधलेल्या चाळींमध्ये पावसाचे पाणी गेले. त्यामुळे तेथील गोरगरिबांचे आतोनात नुकसान झाले आहे. आता त्यांना सरकार, महापालिकेकडून मदत मिळेल, पण त्यांनी वर्षांनुवर्षे अशाच दडपणाखालीच राहायचे का? असा सवाल त्यांनी केला.ते पुढे म्हणाले की, महापालिका प्रशासन झोपले आहे का? की झोपेचे सोंग घेत आहे? ज्या अधिकाऱ्यांच्या कालावधीत अशी बांधकामे उभी राहिली त्यांच्यावर तातडीने कारवाई होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी कोणतीही चौकशी समिती वैगरे नेमून वेळ दवडण्यापेक्षा राजरोसपणे खारफुटीच्या नियमांचे उल्लंघन करून जी काम झाली आहेत, ती कोणाच्या आर्शीवादाने झाली हे बघावे. आजी-माजी अधिकारी कोणीही असोत त्यांना त्याचा जाब विचारावा.आयुक्तांनी पाहणी करून कारवाई करावीपश्चिमेतील बेकायदा बांधकामांसंदर्भात आयुक्त गोविंद बोडके यांना वेळोवेळी पत्र देऊनही ते पाहणीही करायला येत नसल्याचे जोशी म्हणाले. गेल्या आठवड्यातही येथील अनेकांचे संसार पाण्याखाली असतानाही बोडके पाहणी करायला आले नाहीत, ही नागरिकांची शोकांतिका आहे, असे जोशी म्हणाले. बोडके यांनी पाहणी करून काही गैर आढळल्यास तातडीने संबंधित अधिकाºयांवर हलगर्जी, दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून कारवाई करावी, असेही ते म्हणाले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthaneठाणे