शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

डोंबिवलीतील ‘त्या’ चाळींवर कारवाई का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:47 IST

मनसेच्या नेत्यांचा सवाल : पाणी भरल्याने रहिवाशांवर टांगती तलवार कायम

डोंबिवली : मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमधील गोरगरिबांची घरे पाण्याखाली गेली. आयुष्याची पुंजी साठवून घर घेणाऱ्या तळागळातील नागरिकांचे संसार रस्त्यावर आले असून, याला जबाबदार कोण? कोणाच्या आशीर्वादाने शहरात चाळी उभ्या राहत आहेत. एकीकडे महापालिका चाळींमधली घर घेऊ नका, असे आवाहन करत असताना रातोरात उभ्या राहणाºया चाळी प्रशासनाला दिसत नाहीत का? असा सवाल मनसे नेते राजू पाटील यांनी केला आहे.

पाटील यांनी टिष्ट्वट करत यासंदर्भात महापालिका प्रशासन, सत्ताधारी यांच्यावर झोड उठवून नाराजी व्यक्त केली. संसार उघड्यावर आले त्यात रहिवाशांचा दोष काय? परवडणारी घरे घेतानाही त्यांची फसवणूक होत आहे. बांधणारे चाळी बांधून पैसा कमवून निघून जातात, पण रहिवाशांवर टांगती तलवार कायम असते. त्याचे काय? राज्य व केंद्र सरकारच्या परवडणाºया दरांत घरे या घोषणेचे काय झाले? की अनेक घोषणांप्रमाणे ही योजनाही कागदावरच राहिली का?, असा सवालही त्यांनी केला. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, असे ते म्हणाले.दुसरीकडे, पश्चिमेतील स्थिती पाहावत नाही का, अशी टीका माजी नगरसेवक रणजीत जोशी यांनी केली. खाडीकिनारी बांधलेल्या चाळींमध्ये पावसाचे पाणी गेले. त्यामुळे तेथील गोरगरिबांचे आतोनात नुकसान झाले आहे. आता त्यांना सरकार, महापालिकेकडून मदत मिळेल, पण त्यांनी वर्षांनुवर्षे अशाच दडपणाखालीच राहायचे का? असा सवाल त्यांनी केला.ते पुढे म्हणाले की, महापालिका प्रशासन झोपले आहे का? की झोपेचे सोंग घेत आहे? ज्या अधिकाऱ्यांच्या कालावधीत अशी बांधकामे उभी राहिली त्यांच्यावर तातडीने कारवाई होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी कोणतीही चौकशी समिती वैगरे नेमून वेळ दवडण्यापेक्षा राजरोसपणे खारफुटीच्या नियमांचे उल्लंघन करून जी काम झाली आहेत, ती कोणाच्या आर्शीवादाने झाली हे बघावे. आजी-माजी अधिकारी कोणीही असोत त्यांना त्याचा जाब विचारावा.आयुक्तांनी पाहणी करून कारवाई करावीपश्चिमेतील बेकायदा बांधकामांसंदर्भात आयुक्त गोविंद बोडके यांना वेळोवेळी पत्र देऊनही ते पाहणीही करायला येत नसल्याचे जोशी म्हणाले. गेल्या आठवड्यातही येथील अनेकांचे संसार पाण्याखाली असतानाही बोडके पाहणी करायला आले नाहीत, ही नागरिकांची शोकांतिका आहे, असे जोशी म्हणाले. बोडके यांनी पाहणी करून काही गैर आढळल्यास तातडीने संबंधित अधिकाºयांवर हलगर्जी, दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून कारवाई करावी, असेही ते म्हणाले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthaneठाणे