शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

मिठागर भाडेपट्टे नूतनीकरण का नाही?

By admin | Updated: November 10, 2015 23:40 IST

पालघर जिल्ह्यातील खाजण जमिनी विविध सहकारी संस्थांना मिठागरासाठी भाडेपट्ट्याने देण्यात आल्या आहेत. त्यांनी भाडेपट्टा नूतनीकरणासाठी (लीज) विहीत मुदतीत अर्ज करूनही नूतनीकरण का झाले नाही

पालघर : पालघर जिल्ह्यातील खाजण जमिनी विविध सहकारी संस्थांना मिठागरासाठी भाडेपट्ट्याने देण्यात आल्या आहेत. त्यांनी भाडेपट्टा नूतनीकरणासाठी (लीज) विहीत मुदतीत अर्ज करूनही नूतनीकरण का झाले नाही, याचा खुलासा विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्यामार्फत शासनास सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पालघर यांना देण्यात आले आहेत.पालघर तालुक्यात ४० ते ५० वर्षांपासून खारेकुरण भागात मिठागरे असून त्या गावाच्या चोहोबाजूने समुद्राच्या खाऱ्या पाण्याने वेढल्याने पाणी शेतात घुसून भूगर्भातील पाणीसाठाही खारट झाल्याने या गावाला खारेकुरण नाव पडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, मिठागरामुळे पाणीस्रोत्र खारट झाल्याचा काही ग्रामस्थांचा दावा आहे. परंतु, गावापासून मिठागरे ३ ते ४ कि.मी. लांब असल्याने गावातील पाणीसाठा खारट होण्याचा काहीएक संबंध नसल्याचे मीठ उत्पादकांचे म्हणणे आहे. तर त्यासाठी भूजल सर्वेक्षण यंत्रणेची नियुक्ती करावी, असे पालघर-डहाणू तालुका मीठ उत्पादक संघाचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी पत्रकारांना सांगितले. शासकीय परिपत्रकानुसार मिठागराचा भाडेपट्टा (लीज) संपण्याआधी एक वर्षाआधीच भाडेपट्टा वाढवून मिळण्याचा अर्ज करावा, असे नमूद करताना व पालघर तालुक्यातील मीठ उत्पादक सहकारी संस्थांनी अनेक वेळा मुदतीमध्ये लीज वाढवून मिळण्याची मागणी केली असतानाही शासनाने लीज वाढवूनच दिलेली नाही. त्यामुळे पालघरमधील चार सहकारी संस्थांनी शासनाविरोधात उच्च न्यायालयात २५ जानेवारी २०१० रोजी याचिका दाखल केली असून त्याला ५ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत.न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करण्याऐवजी काही लोक उपोषण, आंदोलनाचे अस्त्र उगारून शासनावर दबाव वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे अशोक नाईक यांनी सांगितले. हा सरळसरळ न्यायालयाचा अवमान असल्याचेही त्यांनी सांगितले. पालघर जिल्ह्यात ५०० हेक्टर क्षेत्रफळावर मिठागरे असून सुमारे ५० हजार कामगारांना या व्यवसायातून रोजगार मिळत असल्याचे खारेकुरण संस्थेचे चेअरमन प्रशांत नाईक यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर महसूल व वन विभागाने पालघर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून भाडेपट्ट्याचे नूतनीकरण विहीत मुदतीत का करण्यात आले नाही, याचा खुलासा मागणारे पत्र पाठविले आहे.