शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

मिठागर भाडेपट्टे नूतनीकरण का नाही?

By admin | Updated: November 10, 2015 23:40 IST

पालघर जिल्ह्यातील खाजण जमिनी विविध सहकारी संस्थांना मिठागरासाठी भाडेपट्ट्याने देण्यात आल्या आहेत. त्यांनी भाडेपट्टा नूतनीकरणासाठी (लीज) विहीत मुदतीत अर्ज करूनही नूतनीकरण का झाले नाही

पालघर : पालघर जिल्ह्यातील खाजण जमिनी विविध सहकारी संस्थांना मिठागरासाठी भाडेपट्ट्याने देण्यात आल्या आहेत. त्यांनी भाडेपट्टा नूतनीकरणासाठी (लीज) विहीत मुदतीत अर्ज करूनही नूतनीकरण का झाले नाही, याचा खुलासा विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्यामार्फत शासनास सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पालघर यांना देण्यात आले आहेत.पालघर तालुक्यात ४० ते ५० वर्षांपासून खारेकुरण भागात मिठागरे असून त्या गावाच्या चोहोबाजूने समुद्राच्या खाऱ्या पाण्याने वेढल्याने पाणी शेतात घुसून भूगर्भातील पाणीसाठाही खारट झाल्याने या गावाला खारेकुरण नाव पडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, मिठागरामुळे पाणीस्रोत्र खारट झाल्याचा काही ग्रामस्थांचा दावा आहे. परंतु, गावापासून मिठागरे ३ ते ४ कि.मी. लांब असल्याने गावातील पाणीसाठा खारट होण्याचा काहीएक संबंध नसल्याचे मीठ उत्पादकांचे म्हणणे आहे. तर त्यासाठी भूजल सर्वेक्षण यंत्रणेची नियुक्ती करावी, असे पालघर-डहाणू तालुका मीठ उत्पादक संघाचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी पत्रकारांना सांगितले. शासकीय परिपत्रकानुसार मिठागराचा भाडेपट्टा (लीज) संपण्याआधी एक वर्षाआधीच भाडेपट्टा वाढवून मिळण्याचा अर्ज करावा, असे नमूद करताना व पालघर तालुक्यातील मीठ उत्पादक सहकारी संस्थांनी अनेक वेळा मुदतीमध्ये लीज वाढवून मिळण्याची मागणी केली असतानाही शासनाने लीज वाढवूनच दिलेली नाही. त्यामुळे पालघरमधील चार सहकारी संस्थांनी शासनाविरोधात उच्च न्यायालयात २५ जानेवारी २०१० रोजी याचिका दाखल केली असून त्याला ५ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत.न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करण्याऐवजी काही लोक उपोषण, आंदोलनाचे अस्त्र उगारून शासनावर दबाव वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे अशोक नाईक यांनी सांगितले. हा सरळसरळ न्यायालयाचा अवमान असल्याचेही त्यांनी सांगितले. पालघर जिल्ह्यात ५०० हेक्टर क्षेत्रफळावर मिठागरे असून सुमारे ५० हजार कामगारांना या व्यवसायातून रोजगार मिळत असल्याचे खारेकुरण संस्थेचे चेअरमन प्रशांत नाईक यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर महसूल व वन विभागाने पालघर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून भाडेपट्ट्याचे नूतनीकरण विहीत मुदतीत का करण्यात आले नाही, याचा खुलासा मागणारे पत्र पाठविले आहे.