शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

धोकादायक इमारतीत नवीन वायरिंग कशासाठी?

By admin | Updated: November 14, 2015 23:39 IST

जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या तळ मजल्यावर शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत इमारतीतील विद्युतपुरवठ्याची संपूर्ण वायरिंग जळाली.

सुरेश लोखंडे, ठाणेठाणे : जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या तळ मजल्यावर शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत इमारतीतील विद्युतपुरवठ्याची संपूर्ण वायरिंग जळाली. ती पूर्ववत करण्यासाठी दोन दिवसांपासून यंत्रणा राबत आहे. पण, धोकादायक म्हणून घोषित असणारी ही इमारत काही महिन्यांनंतर खाली करावीच लागणार. त्यापेक्षा त्यावरील संभाव्य खर्च टाळणेच हिताचे आहे.शुक्रवारच्या आगीत ‘व्हीडी कॉन्फरन्स’ हॉलचीही संपूर्ण वायरिंग जळाली असून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींशी आॅनलाइन संपर्क असलेल्या संग्राम कक्षाचीदेखील हीच परिस्थिती आहे. यासह लेखा विभाग, मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासाठी विद्युत व टेलिफोन कनेक्शनचे काम दोन दिवसांपासून सुरू आहे. पण, अल्प कालावधीसाठी होणारा हा खर्च व काही महिन्यांपूर्वीचा खर्च निष्फळच ठरणार आहे. त्यापेक्षा ही दोन दालने अन्यत्र हलविणेच योग्य ठरणार आहे.पदाधिकाऱ्यांच्या ‘प्रगती’ या नव्या इमारतीमध्ये या अधिकाऱ्यांची व्यवस्था करणे शक्य आहे. या इमारतीमध्ये गेस्ट रूमचा मोठा हॉल आहे. याशिवाय अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती निवासस्थानेही मोठमोठी आहेत. तसेही पदाधिकारी येथे राहण्यास फारसे इच्छुक नसतातच. त्यांना मिळालेल्या वाहनातून ते सतत मतदारसंघ व जिल्ह्याच्या दौऱ्यावरच असतात. तसेही या इमारतीआधी कोणाचीही येथे निवास व्यवस्थादेखील नव्हतीच. वर्ष-दीड वर्षात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नवीन इमारत झाल्यानंतर सर्व कार्यालये त्यात समाविष्ट होतीलच. त्यामुळे या इमारतीवरील संभाव्य खर्च वेळीच थांबवणे शहाणपणाचेच आहे. नाहीतर, या इमारतीच्या चारपैकी तीन मजले पाडण्याचा सल्ला मिळालेला आहेच. ठाणे जिल्हा परिषदेची स्थापना झाल्यानंतर १९६२ मध्ये मुख्यालयाची ही इमारत बांधली आहे. आता तब्बल सुमारे ५३ वर्षे झाली आहेत. प्रारंभी ती एक मजली होती.