शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
3
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
4
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
5
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
6
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
7
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
8
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
9
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
10
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
11
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
12
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
13
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
14
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
15
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
16
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
17
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
18
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
19
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
20
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

पुरोगामी महाराष्ट्राचा टेंभा का व कशाला मिरवायचा?

By संदीप प्रधान | Updated: March 11, 2024 09:13 IST

मुंबईलगत असलेल्या ठाणे जिल्ह्यात गेली आठ ते पंधरा दिवसांत घडलेल्या दोन घटना अत्यंत धक्कादायक आहेत.

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक

मुंबईलगत असलेल्या ठाणे जिल्ह्यात गेली आठ ते पंधरा दिवसांत घडलेल्या दोन घटना अत्यंत धक्कादायक आहेत. यातील एक घटना ठाणे शहरातील राबोडीतील आहे. पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून तब्बल १७ तरुणी व महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली. 

दुसरी घटना ही ग्रामीण भागातील आहे. मुरबाड तालुक्यातील करवळे या गावातील वयोवृद्ध नागरिक लक्ष्मण भावार्थे यांना मध्यरात्री घरातून उचलून नेले व जादूटोणा करीत असल्याच्या संशयामुळे विस्तवावरून चालण्यास भाग पाडले. महाराष्ट्र सरकारने जादूटोणाविरोधी कायदा केल्याने आपण चमत्कार करतो, असा दावा करायला बुवा, बाबा धजावत नाहीत. परंतु, लोकांच्या अंधश्रद्धांचा गैरफायदा घेऊन त्यांचे आर्थिक व शारीरिक शोषण करण्याच्या घटना कमी झालेल्या नाहीत. कायदा करून प्रश्न सुटत नाहीत. कायद्याला जनजागृतीची जोड द्यावी लागते.

राबोडीतील घटना अत्यंत धक्कादायक आहे. पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून फसवणूक, हत्या केल्याच्या असंख्य घटना यापूर्वी घडल्या आहेत. मात्र, तरीही आर्थिक विपन्नतेचा सामना करणाऱ्यांचा अशा भूलथापांवर विश्वास बसतो हेच दुर्दैवी आहे. पाच-सहा जणांच्या टोळीने महिला, मुली यांना हेरून पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवले. पैशांचा पाऊस पडेल तेव्हा विवस्त्र असले पाहिजे, असे या अनोळखी पुरुषांनी सांगितल्यावरही आपली फसवणूक होत आहे, आपली अब्रू लुटण्याचे हे कारस्थान आहे हे विशी-चाळिशीच्या मुली, महिलांच्या लक्षात येत नसेल तर पैशांची हाव किती पराकोटीची आहे व अंधश्रद्धेचा पगडा किती खोलवर आहे, याचा अंदाज येऊ शकतो. एक मुलगी बेपत्ता झाल्याच्या तक्रारीमुळे हे प्रकरण उजेडात आले. १७ जणींना या टोळीने लक्ष्य केले आहे. कदाचित संख्या जास्त असू शकते. मुरबाडमधील घटनेत कोण कुठला आसनगावचा देवा म्हसकर नावाचा मांत्रिक वृद्ध लक्ष्मण भावार्थे हे जादूटोणा करतात, असे सांगतो आणि संपूर्ण गाव त्यांच्या जिवावर उठते हेही भयंकर आहे.

जादूटोणाविरोधी कायदा झाल्यापासून आतापर्यंत एक हजारांपेक्षा जास्त गुन्हे राज्यात दाखल झाले. काही गुन्ह्यांत सात वर्षांपर्यंत शिक्षा झाली. मात्र, जोपर्यंत सरकार जगजागृती करीत नाही आणि पोलिस कठोर कारवाई करीत नाही, तोपर्यंत असे प्रकार घडत राहणार. अंधश्रद्धांच्या बाबतीत शहरी व ग्रामीण भाग यामध्ये फारसा फरक नाही, हेही राबोडी व मुरबाडमधील घटनांमुळे स्पष्ट झाले. शहरातील अनेक सुशिक्षित मंडळी वास्तुशास्त्राच्या नावे अंधश्रद्धा जोपासतात व आपल्या या अंधश्रद्धांना इंटेरियर डेकोरेशनचा मुलामा देतात. ग्रामीण भागात आजही जादूटोणा, डाकीण, मांत्रिक वगैरे गोष्टींचा पगडा आहे. 

गावामधील भावकीतील वाद, जमिनीचे, वहिवाटीचे संघर्ष यातूनही विरोधकाला धडा शिकविण्याकरिता अंधश्रद्धांचा आधार घेतला जातो. राज्यातील जनतेने अंधश्रद्धांच्या आहारी जाऊ नये, असे वाटत असेल तर राजकीय नेतृत्वाने आपल्या कृतीतून तसा संदेश द्यायला हवा. मात्र, गेल्या दोन-चार वर्षांत राजकीय नेते इतके अस्थिर झाले आहेत की, त्यांनाच बुवा, बाबा, गंडे-दोरे यांची प्रकर्षाने गरज वाटू लागली आहे. अंधश्रद्धांना विरोध करणाऱ्या पुरोगामी कार्यकर्त्यांना धर्मविरोधी ठरवून लक्ष्य केले जाते. पुरोगामी महाराष्ट्राची मान खाली घालणाऱ्या या घटना आहेत. 

टॅग्स :thaneठाणे