शहरं
Join us  
Trending Stories
1
Corona Virus : धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
2
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
3
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा
4
कोरोनाचा भयावह वेग! ब्रिटनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या एका आठवड्यात झाली दुप्पट
5
तीन दिवसांच्या घसरणीला 'ब्रेक'! सेन्सेक्स-निफ्टी उसळले, 'या' शेअर्सनी दिला बंपर फायदा!
6
IPL 2025: वैभव सूर्यवंशी अन् त्याला आलेले ५०० 'मिस्ड कॉल'; राहुल द्रविडसमोर झाली 'पोलखोल'
7
Luck Sign: देवपूजा करताना 'या' गोष्टींचे घडणे, म्हणजे साक्षात ईश्वरीकृपेचे शुभसंकेत!
8
Nala Sopara: नालासोपाऱ्यात अडीच कोटींचे अंमली पदार्थ जप्त, नायजेरियन आरोपीला अटक
9
CPEC चा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत होणार, पाकिस्तानच्या सहकार्याने चीनचा नवी खेळी
10
धक्कादायक! चक्क ग्रामपंचायत कार्यालयच २० लाख रुपयांना ठेवलं गहाण, सरपंच बरखास्त, एफआयआर दाखल 
11
अमेरिकेला 'धक्का' देणारी मूडीज भारतावर 'फिदा'! अर्थव्यवस्था मजबूत, पाकिस्तानला मात्र 'झटका'
12
ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर...
13
“शिष्टमंडळ पाठवून काही फायदा नाही, चीन, श्रीलंका, तुर्कस्थानात कुणाला पाठवले का?”: संजय राऊत
14
'कपिल शर्मा शो'मधील सर्वांच्या लाडक्या व्यक्तीचं झालं निधन, कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
15
चेक बाउन्स झाला तर आता काही खरं नाही! सरकारचे नवे नियम, दुप्पट दंड ते तुरुंगापर्यंतची शिक्षा!
16
कधीकाळी पाकिस्तानात राहत होते ज्योती मल्होत्राचे कुटुंब?; तपासात समोर आली नवी माहिती
17
IPL 2025: सीएसकेच्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू संजय बांगर धोनीवर भडकले, म्हणाले...
18
"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?
19
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
20
मल्टीबॅगर शेअर, 75 देशांमध्ये Tejas चा व्यवसाय; आता मिळाली ₹1526 कोटींची ऑर्डर

सभेचे ठिकाण बदलण्याचे आदेश कोणासाठी?, गणेश नाईकांच्या भूमिकेमुळे तर्कवितर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:32 IST

राष्ट्रवादीची परिवर्तन संकल्प यात्रेची सभा पुर्वेकडील चक्कीनाका परिसरातील मैदानात १४ जानेवारी रोजी पार पडली.

कल्याण : राष्ट्रवादीची परिवर्तन संकल्प यात्रेची सभा पुर्वेकडील चक्कीनाका परिसरातील मैदानात १४ जानेवारी रोजी पार पडली. या सभेचे ठिकाण बदलण्याचे आदेश ठाणे जिल्हा प्रभारी गणेश नाईक यांनी ऐनवेळी दिल्याचे समोर आले आहे. दोन दिवस बाकी असताना सभेचे ठिकाण बदलण्याचे आदेश अचानक देण्यामागचे गौडबंगाल काय, असा सवाल आता उपस्थित झाला आहे. नाईक यांच्या आदेशानंतरही सभेचे ठिकाण बदलले गेले नसले तरी, हनुमंते यांच्या राजीनामापत्रात याचा उल्लेख झाल्याने तर्कवितर्क काढणे सुरु आहे.राष्ट्रवादीचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांनी त्यांचा राजीनामा सोमवारी पाठविला. पक्षाच्या सभेला पुरेशी गर्दी जमवू शकलो नसल्याने नैतिक जबाबदारी म्हणून आणि पक्षांतर्गत असहकार्याला कंटाळल्याचे कारण त्यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे. राजीनामा पत्रात त्यांनी गणेश नाईक यांनी सभेचे ठिकाण बदलण्याचे आदेश दोन दिवस आधी दिले होते; परंतू ऐनवेळी मी ते आदेश पाळू शकलो नाही असेही म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, पुर्वेतील मैदानाची निवड का करण्यात आली, त्याचीही कारणे त्यांनी नमूद केल्याने हनुमंते यांना नाईकांचा आदेश रूचला नसावा, अशी शंका उपस्थित होते.>राष्ट्रवादीची सभा पार पडली, ते ठिकाण कल्याण पूर्व मतदारसंघात येते. येथील स्थानिक आमदार भाजपाचे गणपत गायकवाड हे पूर्वी राष्ट्रवादीचे सहयोगी अपक्ष आमदार होते. त्यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे नाईकांनी सभेचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला तर नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे. दुसरीकडे मैदानाबाबत काही वाद असल्याने हे आदेश दिले असावेत, अशीही चर्चा आहे. नाईक यांच्याशी संपर्क साधला असता ते व्यस्त असल्याचे समजले.