शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

वांगणी परिसरातील बिबट्या गेला कुणीकडे?; सतर्क राहण्याचे केले आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 23:44 IST

संडे अँकर । नागरिकांमध्ये भीती : वनविभागाने केल्या विविध उपाययोजना 

बदलापूर : सुमारे पंधरवड्यापूर्वी वांगणीतील कडवपाडा परिसरात बिबट्या आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मात्र, काही दिवसांपासून हा बिबट्या दिसत नसल्याने तो गेला तरी कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बिबट्या आजूबाजूच्या गावांत शिरू नये, यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.

बिबट्या दिसल्याची माहिती स्थानिकांनी वनविभागाला दिली होती. त्यानंतर पथकाने जाऊन पाहणी केली होती. त्याचप्रमाणे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. मात्र, अद्याप या बिबट्याचा थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाने ठिकठिकाणी ट्रेसिंग कॅमेरे बसविणे, पिंजरे बसविणे तसेच २४ तास रेंजरची गस्त ठेवून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेनेचे मुरबाड विधानसभा संपर्कप्रमुख नरेंद्र शेलार यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर बदलापूरचे वनक्षेत्रपाल प्रमोद ठाकर यांच्याशी संपर्क साधला असता वनविभागाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या असल्याचे स्पष्ट केले. ज्या ठिकाणी बिबट्या आढळला होता, तो परिसर घनदाट जंगलाचा असून अनेकदा बिबट्या दिसल्याचे परिसरातील नागरिक सांगतात.

१५ दिवसांपूर्वी या परिसरात बिबट्या आढळून आल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितल्यानंतर नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत जनजागृती करण्यात आली आहे. या परिसरात हॅलोजन लाइट्स बसविण्यात आले असून वनविभागाचे पथक सातत्याने गस्त घालत आहे. त्याशिवाय, इतर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, आतापर्यंत या परिसरात बिबट्या आढळला नसल्याची माहिती ठाकर यांनी दिली.बिबट्याने मार्ग बदलला?बिबट्याची वास घेण्याची क्षमता प्रचंड असते. त्यामुळे तो डोंगरावर असला, तरी डोंगर पायथ्याजवळ कोंबड्या, मेंढ्या आदी खाद्य असल्यास त्याला ते समजते. तो भक्षाच्या जवळ येतो. भक्ष मिळाल्यास तो दोन ते चार दिवस त्या भागात थांबतो. नाहीतर, तो आपला मार्ग बदलतो. गेल्या १५ दिवसांपासून या भागात बिबट्या आढळून आला नसल्याने त्याने आपला मार्ग बदलला असावा, असा आमचा अंदाज असल्याचेही प्रमोद ठाकर यांनी स्पष्ट केले.बिबट्याचा वावर वाढलावांगणीजवळ काही महिन्यांपूर्वी मृतावस्थेत बिबट्या सापडला होता. मात्र, त्याचा मृत्यू कशामुळे झाला, हे आजही स्पष्ट झालेले नाही. तसेच बदलापूरजवळील आंबेशीव गावात बिबट्याने एका वासराची शिकार केल्याचे उघड झाल्याने या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे.