शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

रिक्षाचालकांच्या गुंडगिरीला लगाम घालणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:27 IST

प्रशांत माने लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : रिक्षाचालक छेडछाड करत असल्याने तरुणीने धावत्या रिक्षातून उडी मारल्याची घटना नुकतीच औरंगाबाद ...

प्रशांत माने

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : रिक्षाचालक छेडछाड करत असल्याने तरुणीने धावत्या रिक्षातून उडी मारल्याची घटना नुकतीच औरंगाबाद जिल्ह्यातील जालना रोडवर घडली. रिक्षाचालकांच्या गुन्हेगारीचा प्रत्यय सर्वच ठिकाणी प्रवाशांना येत असताना कल्याण-डोंबिवलीतील चित्रही फारसे वेगळे नाही. त्यात आता रिक्षाचे स्टेअरिंग अल्पवयीन टवाळखोरांच्या हाती गेल्याने प्रवासही धोक्याचा झाला आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही त्याकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत आहे.

रिक्षाचालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना आणि बॅच असणे बंधनकारक आहे; परंतु काही रिक्षाचालक बॅच आणि परवाना नसलेल्यांनाही रिक्षा चालवायला देत आहेत. यात १५ ते १६ वर्षांची मुलेही सरार्सपणे रिक्षा चालविताना दिसत आहेत. ते गणवेश न घालता बरमुडा, हाफ पॅन्ट अशा पेहरावात रिक्षा चालवतात. तसेच स्टॅण्ड सोडून भाडे घेतात. तोंडात गुटखा, मावा भरलेला असतो. अनेक जण रात्रीच्या वेळेस मद्यपान, चरस व गांजाचे व्यसनही करतात. उद्धट, उर्मट वागणूक, मनमानी भाडेआकारणी, असे चित्र कल्याण-डोंबिवलीत बहुतांश ठिकाणी पाहायला मिळते.

दरम्यान, त्यांच्या अशा वर्तवणुकीमुळे सर्वसामान्य प्रामाणिक रिक्षाचालक भरडला जात असून, यात रिक्षा व्यवसायही एक प्रकारे बदनाम होत आहे. एकट्या-दुकट्या प्रवाशाला अज्ञात स्थळी नेऊन लुटणे, विनयभंग, पोलिसांशी हुज्जत घालणे, फरपटत नेणे, असे प्रकार घडले आहेत. प्रवाशांचा मोबाइल, रोकड तसेच सोने-चांदीचे दागिने लुबाडण्याच्या घटनाही सहप्रवाशांकडून घडल्या आहेत. या गुन्ह्यांत रिक्षाचालकांचाही सहभाग दिसून आला आहे.

-------------------------------------------

या घटनांना जबाबदार कोण?

रिक्षाचालकाने काढली तरुणीची छेड

कल्याण पूर्वेतील एका तरुणीची रिक्षाचालकाने छेड काढल्याने तिने तिच्या मित्रांना बोलावले, तर रिक्षाचालकाने त्याच्या साथीदारांना बोलावून घेतले. रिक्षाचालकाच्या साथीदारांनी तरुणी व तिच्या दोन मित्रांना पट्ट्याने बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ही घटना जुलैमध्ये घडली होती. या घटनेच्या नऊ तासांनंतर कोळसेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.

--------------------------

कोरोना नियमाचा आग्रह, प्रवाशाला चोप

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिक्षातून चालकासह दोन जणांनाच प्रवास करण्याची मुभा जुलैमध्ये होती; परंतु एका रिक्षाचालकाकडून हे नियम धाब्यावर बसविले जात असताना नियमांचे पालन करण्याचा आग्रह धरणाऱ्या प्रवाशाला रिक्षाचालकाने मारहाण केली होती. ही घटना विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा स्टॅण्डजवळ जुलैच्या मध्यात घडली होती. याप्रकरणीही कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

-------------------------------------------

विनापरवाना रिक्षाचालक एक डोकेदुखी

विनापरवाना रिक्षा चालविणाऱ्या मुलांविरोधात वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने भविष्यात कोणती दुर्घटना घडली तर आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही, असा पवित्रा आधीच येथील रिक्षाचालक-मालक असोसिएशनने घेतला आहे. रिक्षांची वाढती संख्या पाहता परवान्यांचे वाटप थांबवा, अशीही त्यांची मागणी आहे.

------------------------------------------

केवळ कारवाईचे दावे

वाहतूक पोलीस व आरटीओ यांच्याकडून कारवाईचे दावे केले जात असले, तरी आजही कल्याण व डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरातील स्टॅण्डवरील चित्र पाहता बिनधास्तपणे अल्पवयीन रिक्षाचालक रिक्षा लावून भाडे घेत आहेत. मुजोरी, वादावादी असे प्रकार वारंवार त्यांच्याकडून घडत असतात. गेल्या काही दिवसांपासून कल्याणमध्ये बेकायदा रिक्षाचालकांविरोधात कारवाईची मोहीम उघडण्यात आली आहे; पण यात कितपत सातत्य राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

-----------------------