शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

ठाणे, कल्याण, भिवंडीचा खासदार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 23:51 IST

मतदारराजाचा फायनल कौल कळणार । सकाळी ८ पासून सुरू होणार मतमोजणी । कोणाच्या विजयाचा होणार जल्लोष

ठाणे : ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांत मतदान झाल्यानंतर आता मतदारांचा कौल आज (गुरुवारी) स्पष्ट होणार आहे. ठाणे कुणाच्या वाट्याला जाणार, कल्याणचा गड शिवसेना राखणार का? आणि भिवंडीत कोणाची होणार सरशी, याकडे आता ठाणे जिल्ह्यातील मतदारांच्या नजरा खिळल्या आहेत.

२९ एप्रिलला या मतदारसंघांत मतदान झाले. ठाणे मतदारसंघात ४९.२३ टक्के मतदान झाले होते. तर, कल्याणमध्ये ४५.२८ टक्के आणि भिवंडीत ५३.०८ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर, आता आज सकाळी तीनही मतदारसंघांत मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी सुरू होणार आहे. ठाण्यात शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांच्याविरुद्ध राष्टÑवादीचे आनंद परांजपे यांच्यात मुख्य लढत झाली. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक अखेरच्या क्षणी ‘काँटे की टक्कर’ ठरली होती. त्यामुळे ठाण्याचा खासदार कोण होणार, याबाबत उत्सुकता आहे. दुसरीकडे कल्याणमध्ये राष्टÑवादीचे बाबाजी पाटील विरुद्ध शिवसेनेचे विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यात लढत झाली. परंतु, राष्टÑवादीने येथे कमकुवत उमेदवार दिल्याची चर्चा आजही असल्याने निकालाचा कौल हा शिवसेनेच्या बाजूने झुकण्याची शक्यता आहे. भिवंडीत भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील विरुद्ध काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांच्यात अटीतटीची लढत झाली असल्याने या लढतीत कोणाचे पारडे जड होणार आणि मतदारांचा कौल कोणाचे तोंड गोड करणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरले आहे.

या उमेदवारांच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्षराजन विचारे । शिवसेना : शिवसेनेकडून राजन विचारे हे पुन्हा एकदा निवडणूक लढवत असून त्यांच्या विजयाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. नगरसेवक, महापौर, आमदार आणि खासदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे. परंतु, या निवडणुकीत काँटे की टक्कर झाल्याने त्यांच्या निकालाकडे लक्ष लागले आहे.डॉ. श्रीकांत शिंदे । शिवसेना : शिवसेनेकडून डॉ. श्रीकांत शिंदे हे दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते पुत्र असल्याने त्यांच्या विजयाचे महत्त्व आणखी वाढले आहे. राष्टÑवादीकडून कमकुवत उमेदवार देण्यात आल्याने शिंदे किती मताधिक्याने निवडून येतात, यावर पैजा लागल्या असून त्यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मतमोजणीही होणार रंगीबेरंगीठाणे लोकसभा मतदारसंघात प्रचाराच्या वेळेस निवडणूक विभागाने ज्या पद्धतीने रंगसंगतीचा अवलंब केला होता, तो यशस्वी झाल्याने आता स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या मतपेट्या या त्यात्या विधानसभा क्षेत्राच्या खोल्यांमध्ये मोजणीसाठी नेताना शिपायांकडून गडबड होऊ नये, म्हणून त्यांना खास पोशाख देण्यात आले आहे.

टॅग्स :thane-pcठाणेkalyan-pcकल्याणbhiwandi-pcभिवंडी