शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
3
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
4
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
5
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
6
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
7
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
8
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
9
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
10
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
11
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
12
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
13
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
14
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
15
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
16
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
17
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
18
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
19
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
20
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल

रेतीचे परवाने दिले कुणी?

By admin | Updated: August 9, 2016 02:13 IST

वसईच्या तहसीलदारांनी ५ मंडळ अधिकारी, १५ तलाठी १ पोलीस निरिक्षक, १ सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यासह मोठा फौजफाटा घेऊन वैतरणा रेल्वे पुलाजवळ चालणाऱ्या रेती

पारोळ/वसई: वसईच्या तहसीलदारांनी ५ मंडळ अधिकारी, १५ तलाठी १ पोलीस निरिक्षक, १ सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यासह मोठा फौजफाटा घेऊन वैतरणा रेल्वे पुलाजवळ चालणाऱ्या रेती उत्खनांनवर कारवाई करून २२ बोटी, ३ पंप, ३ डिझेल इंजिन व अनधीकृत झोपडयांवर कारवाई करून त्या नष्ट करण्यात आल्या. मोठा गवगवा करून महाड अपघाताच्या पार्श्वभूमीवर कारवाईची हौस भागवून घेतली प्रशासनाने वैतरणा परिसरात कारवाई केली असली तरी मागील वर्षी वैतरणेसाठी डुबीचे रेती परवाने शासनाने मंजूर केले. हे परवाने डुबीचे असले तरी उपसा मात्र सक्शन पंपाने केला. तो ही रेल्वे पुलाजवळून या परवान्यामुळे या परिसरात मोठा रेती उपसा झाला. त्यामुळे या पुलाला धोका निर्माण झाला या गंभीर बाबींकडे प्रशासनाने आधी लक्ष का दिले नाही या कारवाईमध्ये भाग घेणाऱ्या यंत्रणा झोपल्या होत्या का. हा प्रश्न परिसरातील नागरीकांना पडला आहे. रेल्वे प्रशासनाने २०१२ ला या भागात रेती उत्खनन करू नये अन्यथा रेल्वे पुलाला धोका आहे असे प्रशासनाला कळवले असतांनाही महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला हाताशी धरून नदीची खोली ८० फूट असताना ती ती ४ ते ५ फूट दाखवून बनावट जागेचा सर्व्हे देऊन या भागाती रेती व्यवसायीकांनी डुबी रेतीचे परवाने आणले. पण उपसा मात्र सक्शनपंपाने केला यामुळे नदीची खोली ८० ते ९० फूट होऊन पुलाला धोका झाला. त्यामुळे कळत नकळत का होईना या नदीच्या खोलीत प्रशासनाचेही हात अडक ले असल्याची चर्चा या परिसरात रंगली आहे. (वार्ताहर)