शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

झेंडा कोणाचा? ६५ टक्के मतदान, काल्हेरमध्ये हाणामारी, मुसईचा बहिष्कार मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 02:59 IST

जवळपास साडेतीन वर्षांनी होत असलेल्या ठाणे जिल्हा परिषद आणि भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण, अंबरनाथ या पाच पंचायत समित्यांसाठी ६५ टक्के मतदान झाले.

ठाणे : जवळपास साडेतीन वर्षांनी होत असलेल्या ठाणे जिल्हा परिषद आणि भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण, अंबरनाथ या पाच पंचायत समित्यांसाठी ६५ टक्के मतदान झाले. भिवंडीतून सर्वाधिक सदस्य निवडून जाणार असल्याने तेथे भाजपाच्या खासदारांना झालेला विरोध, नंतर काल्हेरमध्ये शिवसेना-काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत झालेली मारामारी, पोलिसांना करावा लागलेला लाठीमार, ठिकठिकाणी होत असलेली बाचाबाची यामुळे ही निवडणूक गाजली. उरलेल्या भागात मतदान शांततेत आणि उत्साहात पार पडले.खोणीत काँग्रसेचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे, तर दोन गणांत मतपत्रिका चुकीच्या पद्धतीने वाटल्याने फेरमतदान घ्यावे लागणार असल्याने शेलार आणि कोलीवली या गणातील मतमोजणी निवडणूक आयोगाने थांबवली आहे. त्यामुळे उरलेले ५२ गट व १०४ गणांचीच मोजणी गुरूवारी होणार आहे.आजवर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसचा वरचष्मा असलेल्या जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी भाजपानेही कंबर कसल्याने यावेळची निवडणूक अटीतटीची झाली. श्रमजीवी संघटनेला फोडून भाजपाने शिवसेनेला धक्का दिल्याने आदिवासी मतदार नेमके कोणाला मतदान करतात त्याकडे दोन्ही पक्षांचे लक्ष आहे. वेगवेगळ््या पक्षातील प्रबळ उमेदवार फोडण्याच्या भाजपाच्या खेळीला प्रत्त्युत्तर देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने परस्परांना सहकार्य केले. काही ठिकाणी त्यात काँग्रेसही राष्ट्रवादीसोबत आली. या राजकीय समीकरणांतून नेमके काय साध्य होते, त्याला मतदार कसा प्रतिसाद देतात ते निकालातून स्पष्ट होईल.

टॅग्स :Electionनिवडणूक