शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

टार्गेट नेमके कोण; आयुक्त की अधिकारी?  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 05:51 IST

शहरातील विकासकामे हवी तशी मार्गी लागत नसल्याने एकीकडे आयुक्त आणि अधिकारी नगरसेवकांच्या टार्गेटवर असतानाच ‘नगरसेवक नाटक करतात,’ या वक्तव्यावारून महासभेत सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाचे नगरासेवक त्यांना कोंडीत पकडणार असल्याने यावेळी महासभा गाजण्याची चिन्हे आहेत.

उल्हासनगर : शहरातील विकासकामे हवी तशी मार्गी लागत नसल्याने एकीकडे आयुक्त आणि अधिकारी नगरसेवकांच्या टार्गेटवर असतानाच ‘नगरसेवक नाटक करतात,’ या वक्तव्यावारून महासभेत सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाचे नगरासेवक त्यांना कोंडीत पकडणार असल्याने यावेळी महासभा गाजण्याची चिन्हे आहेत. पालिका अधिकारी युवराज भदाणे यांच्या अभिनंदनाचा ठराव महासभेत भाजपाने दाखल केला आहे, तर त्यांच्याच निलंबनाचा प्रस्ताव सेनेने दिल्याने तोही चर्चेचा विषय आहे.शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याने नगरसेवक संतप्त आहेत. बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली असून आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या बोटचेप्या धोरणामुळे विकासकामे ठप्प झाल्याचा सेनेचा आरोप आहे. त्यांच्या हकालपट्टीची मागणी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांकडे शिवसेनेने केली आहे. एकूणच आयुक्त सतत वादात सापडत असून महासभेत आयुक्त विरूद्ध नगरसेवक असा सामना रंगण्याची शक्यता आहे.मनपा जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी मालमत्ता कर विभागात चांगले काम केल्याबाबत भाजपा नगरसेवक राजा वानखडे यांनी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव आणला, तर सेनेचे शहरप्रमुख व नगरसेवक राजेंद्र चौधरी, रिपाइंचे गटनेते तसेच शहरजिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी भदाणेंच्या निलंबनाचा ठराव आणला. मालमत्ता करविभागाच्या प्रभारी कर निर्धारकपदी असताना त्यांनी एका मालमत्तेचे करनिर्धारण ७० लाख केले, तर उपायुक्त दादा पाटील यांनी त्याचेच करनिर्धारण १० लाख केल्यानेही वाद आहे. कर कमी झाल्याचे भदाणे यांनी आयुक्तांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी उपायुक्त दादा पाटील व नगरसेवक भगवान भालेराव यांना नोटिसा देऊन आठ दिवसात म्हणणे मांडण्याचे आदेश दिले होते. पण कराच्या प्रस्तावावर आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांचीच सही असल्याचे उघड झाले.महासभा गाजणार?आयुक्तांनी अचानक युवराज भदाणे यांची करनिर्धारण पदावरून उचलबांगडी केली. या मालमत्ता कर आकारणी प्रकरणी पुढे काय कारवाई झाली, असा प्रश्न सत्ताधारी आणि विरोधक सभागृहात उपस्थित करणार असून हे प्रकरण शांत का झाले, हा सवालही उपस्थित होतो आहे.