शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

ऑनलाइन स्कूल, वर्क फ्रॉम होम सांभाळताना पालकांचे मानसिक संतुलन लागले बिघडायला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांसोबतच पालकांचेही मानसिक आरोग्य बिघडले आहे. पालकांना वर्क ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांसोबतच पालकांचेही मानसिक आरोग्य बिघडले आहे. पालकांना वर्क फ्रॉम होम करायचे असते, त्यातच मुलांनादेखील सांभाळायचे असते. त्यात त्यांच्या शिक्षणाच्या संदर्भातदेखील ते आग्रही असतात; पण घरातच शाळा आल्याने घर आणि शाळा यांची सांगड घालताना पालकांची कोंडी होताना दिसते. त्यामुळे अनेक घरांतील पालकांचे मानसिक संतुलन बिघडल्याच्याही केसेस काही प्रमाणात येत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितले.

स्क्रीनिंग फ्री म्हणजे कोणतीही स्क्रीन बघू नये, असे अनेकदा सांगूनही पालक, पाल्य हे नाइलाजाने मोबाइल, टीव्ही, लॅपटॉप, संगणक बघत असतात. तासनतास ते स्क्रीनवर व्यस्त असल्याने शारीरिक हालचाली मंदावल्याने समस्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. मानसिक संतुलन राखणे हे पालक आणि पाल्य तसेच शिक्षकांना आव्हान आहे. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढून शांत बसण्याची गरज प्रत्येकाला असून स्वतःला वेळ देण्यासाठी धडपड करायला हवी, असे आवाहन जाणकार वैद्य करत आहेत.

-----------------

वर्गनिहाय विद्यार्थी

पहिली - शारीरिक हालचाली नाहीत

दुसरी - शारीरिक हालचाली नाहीत

तिसरी - शिक्षक काय शिकवतात ते कळत नाही

चौथी - पालकांना, मुलांना कसं समजावायचं हा प्रश्न

पाचवी- अभ्यासक्रम वाढलेला असल्याने तणाव

सहावी - पालक, शिक्षक आणि पाल्य यांचा समन्वय

सातवी- अभ्यासक्रम वाढलेला असल्याने समजत नसल्याच्या तक्रारी

आठवी- विषय वाढल्याने नव्या विषयाचे काय करायचे ही समस्या

नववी- पाया कच्चा असल्यास मोठी अडचण

दहावी- परीक्षा झाल्या नसल्या तरी तणाव कायम

मुलांच्या समस्या

वेळच्या वेळी ऑनलाइन लेक्चर अटेंड न केल्याने काही कळत नाही

डोळ्यांची समस्या

शारीरिक हालचाल नाही

कंटाळा, चालढकलपणा वाढलाय

एकटेपणाची भावना

-/-/-///-/-////////--

पालकांच्या समस्या

पालकांना वर्क फ्रॉम होम सांभाळून मुलांचे ऑनलाइन शिक्षण ही दुहेरी समस्या

इंटरनेटच्या तांत्रिक समस्या

झोप पूर्ण न होणे

कामाचा ताण, त्यात पाल्यांना समजावायचे कसे?

घर, ऑफिस, मुलांचा अभ्यास करताना कसरत

दुसऱ्याला येते पण आपल्या मुलाला का नाही, अशी मानसिक स्पर्धा

यामुळे मानसिक संतुलन अस्थिर

----/////---------

कोविड काळात पालक, पाल्यांच्या नानाविध मानसिक आजाराच्या तक्रारी वाढल्या आहेत. आपल्या मुलाला का येत नाही, या चिंतेने पालक बेचैन असतात. त्यात पाल्य मात्र मित्र नाही, खेळ नाही, यामुळे एकलकोंडा झालेला आहे. शाळा तातडीने सुरू व्हायला हव्यात. आठवड्यातून एक दिवस तसेच रोज नो स्क्रीनिंग ठरवून बाहेर फिरायला जाणे. मित्र-मैत्रिणींना भेटणे आणि मन मोकळे करण्याची गरज आहे.

-डॉ. विजय चिंचोले, मानसोपचारतज्ज्ञ, डोंबिवली