शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

आमच्या हक्काचे पाणी मुरतेय कुठे? हे शोधा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 03:29 IST

महिलांचा सवाल : डोंबिवलीमधील म्हात्रेनगरमध्ये पाणीप्रश्न बनला गंभीर

अनिकेत घमंडीडोंबिवली : लघुपाटबंधारे विभागाच्या आदेशानुसार केडीएमसीने सप्टेंबरपासून पाणीकपात लागू केली आहे. मात्र, २० वर्षे आमचे पाणी नेमके कुठे मुरतेय, याचा शोध घ्या. भरमसाट मालमत्ताकर, पाणीबिले घेता तरीही आमच्या तोंडचे पाणी पळवले आहे. त्याला जबाबदार कोण, असा सवाल म्हात्रेनगर प्रभागातील त्रस्त महिलांनी ‘लोकमत’कडे केला. महापालिका अधिकाऱ्यांनी आधी पाणी द्यावे, मग बुस्टरवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

म्हात्रेनगरमध्ये १९९९ पासून पाणीसमस्या भेडसावत आहे. या प्रभागातील मारुती, आकृती, जागृती, बिंगो प्रसाद, कचरू भवन, सद्गुरू सेवासदन, सुदामा, अमरीश, अरुण, ओमधारा, अवंतिका, गणेश कृपा, बसवेश्वर, अमोलदीप आदी सोसायट्यांतील रहिवासी पाणी मिळत नसल्याने हैराण झाले आहेत. पाण्याचा दाब अत्यंत कमी असतो. जमिनीपासून फुटावर नळ असतानाही बादली भरत नाही. काही इमारतींत जेमतेम अर्धा तास पाणी येते. त्यातही तिसºया-चौथ्या मजल्यावर पाणीच येत नाही. त्यामुळे अनेकदा टँकर मागवावा लागतो. एका टँकरसाठी दोन हजार रुपये लागतात. महागाईमुळे टँकर मागवणेही परवडत नाही. टँकरमुळे कुटुंबाचे आर्थिक नियोजन कोलमडत आहे. लोकप्रतिनिधी, महापालिकेचे अधिकारी येतात-जातात, पण हा प्रश्न काही सुटत नाही. मग कर का भरायचे, असा प्रश्न रसिका जोशी, मेघा पाटील, मेघा चोरगे, सुमंगला नायर, वैशाली भोसले, मीनल टीकम, मानसी चोरगे, रश्मी खेंगरे आदी महिलांनी विचारला.पाण्याअभावी नातेवाइकांना घरी बोलावता येत नाही. तर घरांत कलहही वाढले आहेत. शेजाºयांशीही खटके उडतात. पाणी वापरताना काटकसर करावी लागत आहे. अनेकदा कागदी प्लेट, ग्लासचा वापर करावा लागत आहे, अशी व्यथा महिलांनी मांडली. २०१२ पासून पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. २०१६ मधील दुष्काळाच्या वेळी आठवडाआठवडा पाणी मिळाले नव्हते. यंदाही तशी स्थिती उद्भवण्याची शक्यता असल्याचे महिला म्हणाल्या.आयरे येथील दोनपैकी एका जलकुंभातून थेट पाणीपुरवठा केला जात असल्याचा महापालिकेच्या अधिकाºयांचा दावा आहे. त्यासाठी एक एमएलडीची तरतूद आहे. पण, प्रत्यक्षात पाणी मिळत नाही. ते मुरतंय कुठे? पाणी चोरणाºयांचा शोध घेण्याची आमची मागणी आहे. मात्र, महापालिका तो घेत नाही, अशी टीका महिलांनी केली.म्हात्रेनगर प्रभागात १७ लाख रुपये खर्चून नवी पाण्याची लाइन टाकण्याची वर्कआॅर्डर मंजूर झाली आहे. पण, ती टाकून काही उपयोग नाही. त्यासाठी आधी तीन तास चांगल्या दाबाने पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे.- मुकुंद पेडणेकर, नगरसेवकम्हात्रेनगरमध्ये काही ठिकाणी पाणीसमस्या आहे. ती लवकरच सुटण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी काही तांत्रिक बदल, क्रॉस कनेक्शन करणे आवश्यक आहे. त्यावर अभ्यास सुरू आहे. कनिष्ठ अभियंत्यांना तशा सूचना दिल्या आहेत. एका जलकुंभातून तेथे सुरळीतपणे पाणीपुरवठा होत आहे.- राजीव पाठक, अभियंता,पाणीपुरवठा विभाग, केडीएमसी 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाthaneठाणे