शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

लाभार्थ्यांची यादी आहे कुठे?

By admin | Updated: May 11, 2017 01:51 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेने केंद्र सरकारच्या बीएसयूपी योजनेतून शहरातील गरिबांसाठी अडीच हजार घरे बांधली आहेत.

मुरलीधर भवार । लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने केंद्र सरकारच्या बीएसयूपी योजनेतून शहरातील गरिबांसाठी अडीच हजार घरे बांधली आहेत. मात्र, लाभार्थ्यांची यादी अजूनही महापालिकेने निश्चित न केल्याने ही घरे पडून आहेत. त्यामुळे घरे शहरातील गरिबांना मिळणार का, असा प्रश्न केला जात आहे. बीएसयूपी योजनेतून महापालिकेने चार प्रकल्प अहवाल तयार केले होते. त्यानुसार, किमान १७ ठिकाणी ही योजना उभारण्याचे काम हाती घेतले. महापालिकेचे सुरुवातीला १३ हजार घरे बांधण्याचे लक्ष्य होते. मात्र, काम संथगतीने सुरू असल्याने प्रत्यक्षात आठ हजार १८१ घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले. या योजनेच्या अंमलबजावणीचा कालावधी ३१ मार्च २०१७ ला संपला आहे. योजनेच्या लाभार्थ्यांची यादी तयार करण्यासाठी महापालिकेने सुभाष पाटील सनिमंत्रक सल्लागार कंपनीची नेमणूक केली होती. या कंपनीने महापालिका हद्दीतील ७३ झोपडपट्ट्यांमध्ये सर्वेक्षण केले होते. त्या वेळी ३१ हजार शहरी गरिबांचे सर्वेक्षण करण्यात आले. महापालिकेने सर्वेक्षण केल्यावर केंद्र सरकारने दिलेल्या निकषांच्या आधारे लाभार्थी निश्चित करणे आवश्यक होते. योजनेचे काम हाती घेतल्यापासून महापालिकेने लाभार्थी निश्चित करण्याची जबाबदारी तत्कालीन शहर अभियंता पी.के. उगले व कार्यकारी अभियंता रवींद्र पुराणिक यांच्यावर सोपवली होती. पाच वर्षांत या दोन्ही अधिकाऱ्यांनी फारसे समाधानकारक काम केले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांची यादी रखडली.परिणामी, सरकारने महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्या अध्यक्षतेखाली लाभार्थी यादी निश्चित करण्यासाठी आॅगस्ट २०१५ मध्ये एक समिती नेमली. या समितीकडूनही लाभार्थी निश्चित करण्याचे काम अजूनही झालेले नाही. या समितीने केवळ एक हजार ५०० लाभार्थी निश्चित केले. सल्लागार कंपनीने केलेल्या ३१ हजारांच्या सर्वेक्षणातून केवळ आठ हजार लाभार्थीचा शोध घेणेही समितीला जमले नाही, अशी टीका लाभापासून वंचित असलेल्या गरिबांकडून व्यक्त केली जात आहे.अतिरिक्त आयुक्तांच्या समितीने आयुक्त ई. रवींद्रन यांना एक अहवाल सादर केला आहे. हे काम समितीला शक्य नसून त्याची जबाबदारी पुन्हा शहर अभियंत्यांकडेच सोपवावी, अशी मागणी केली. त्यामुळे पुन्हा लाभार्थी निश्चित करावे लागणार आहेत. समितीच्या अहवालावर रवींद्रन यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. प्रशासकीय कामाच्या प्रशिक्षणासाठी आयुक्त महिनाभरापासून परराज्यात आहेत. त्यांच्या परतीनंतरच समितीच्या अहवालावर निर्णय होणे अपेक्षित आहे. दरम्यान, अतिरिक्त आयुक्त घरत यांनी सांगितले की, एकच पुनर्वसन समिती असावी, असे आमचे मत आहे. केंद्राच्या निकषानुसार लाभार्थी ठरवणे कठीण आहे. जे लाभार्थी निकषांमध्ये बसत नाही, त्यांना लाभ कसा काय देणार. रस्ते विकास प्रकल्पात बाधित झालेले प्रकल्पग्रस्त, धोकादायक इमारतींत राहणाऱ्यांना बीएसयूपी योजनेत पर्यायी भाडेतत्त्वावर घरे देण्याचा प्रस्ताव सरकारदरबारी पाठवला आहे. त्यावर निर्णय अपेक्षित आहे.