शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

कोपर खाडीतील कांदळवन कुठे?

By admin | Updated: March 17, 2017 06:03 IST

बेकायदा बांधकामे, बेसुमार रेतीउपसा यामुळे कोपर खाडीतील कांदळवन पूर्णपणे नष्ट झाले आहे. कोपर आणि आयरे परिसरातील कांदळवन गेले कुठे

डोंबिवली : बेकायदा बांधकामे, बेसुमार रेतीउपसा यामुळे कोपर खाडीतील कांदळवन पूर्णपणे नष्ट झाले आहे. कोपर आणि आयरे परिसरातील कांदळवन गेले कुठे, अशी विचारणा करणारी कायदेशीर नोटीस माहिती अधिकाराचे कार्यकर्ते कौस्तुभ गोखले आणि भाजपा नगरसेवक राजन सामंत यांनी संबंधित विभागांना बजावली आहे. कांदळवनाची कत्तल करणारे पुरावेच त्यांनी छायाचित्रांसह सादर केले आहेत. महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अ‍ॅथॉरिटी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, ठाणे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांना त्यांनी ही नोटीस बजावली आहे. कोपर व आयरे परिसरांतील कांदळवन नष्ट झाले आहे. कोपर येथे १ लाख ३५ हजार ५३८ चौरस मीटर जागेवर कांदळवन होते. बेकायदेशीर रेतीउपसा व बेकायदा बांधकामांनी कांदळवनाचा बळी घेतला आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे. खाडी व समुद्रकिनारी असलेली कांदळवने ही माशांची सूतिकागृहे समजली जातात. यामुळे खाडीतील जैवविविधता जोपासली जाते. खाडीला जाऊन मिसळणारे प्रदूषित पाणी, खाडीत सोडले जाणारे मलमूत्रमिश्रित पाणी, यामुळे खाडी प्रचंड प्रदूषित झाली आहे. बेकायदा रेतीउपशामुळे कांदळवनाची मुळे तग धरत नाहीत. तसेच बेकायदा बांधकामांसाठी कांदळवनाची कत्तल करून मातीचे भराव टाकून तेथे बेकायदा बांधकामे उभारण्यात येत आहेत.कल्याण-डोंबिवली महापालिकेचा आधारवाडी डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सध्या राष्ट्रीय हरित लवादापुढे न्यायप्रविष्ट आहे. हे डम्पिंग बंद करून तेथे घनकचऱ्यावर प्रक्रिया करणारा शास्त्रोक्त प्रकल्प उभारण्यात दिरंगाई का झाली, याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी सादर करावा, असे लवादाकडून सूचित केले होते. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मुदतवाढ मागून घेतली.घनकचरा प्रकरणातही गोखले हेच याचिकाकर्ते आहेत. आधारवाडी डम्पिंग आहे. तेथील कांदळवन नष्ट झाल्याने कल्याण-डोंबिवली, कोपर, आयरे रोड येथे पूरसदृश परिस्थिती उद्भवू शकते. लवादापुढे हा मुद्दा उपस्थित करून संबंधित अधिकाऱ्यांनी कांदळवन जोपासण्यासाठी काय कार्यवाही केली, त्याची विचारणा करावी, अन्यथा नोटीस दिलेल्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करावेत, असे गोखले यांनी नमूद केले. कांदळवनप्रकरणी ‘दी बॉम्बे एन्व्हायर्नमेंट अ‍ॅक्शन ग्रुप’ व इतर यांनी उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर ६ आॅक्टोबर २००५ ला सुनावणी झाली आहे. त्यानुसार, राज्य सरकारने एक अध्यादेश त्यावेळी काढला होता. नागपूरच्या रिमोट सेन्सरिंग अ‍ॅप्लिकेशन सेंटरद्वारे कांदळवनाच्यादूर संवेदन उपग्रह इमेज काढाव्यात. कांदळवनाच्या जागेवर बांधकामांना बंदी घालावी. कोणत्याही विकास प्राधिकरणास कांदळवन क्षेत्रात बांधकामाची परवानगी देऊ नये. सरकारी जमिनीवरील कांदळवनास संरक्षित वने व खाजगी जमिनीवरील कांदळवनास ‘वने’ असे घोषित करावे. कांदळवनात बेकायदा बांधकाम करणाऱ्या किती जणांविरोधात गुन्हे दाखल केले, गुन्हेगारांची संख्या किती, काय कार्यवाही केली, याचा अहवाल चार आठवड्यांत तयार करून तो सरकारला सादर करावा, असे सूचित केले होते. हा आदेश देऊन ११ वर्षे उलटून गेली. त्यावर, अद्याप काहीच कार्यवाही झालेली नाही. (प्रतिनिधी)