शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
5
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
6
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
7
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
8
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
9
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
10
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
11
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
12
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
13
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
14
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
15
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
16
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
17
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
18
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
19
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
20
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड

भिवंडीतील राजीव गांधी उड्डाणपुलाचे 7 कोटी 13 लाख गेले कुठे?; राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 16:13 IST

- नितिन पंडीत भिवंडी :  शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे शहराची वाताहात झाली असून खड्डेमय रस्त्यातून प्रवास करतांना प्रवाशांसह वाहन ...

- नितिन पंडीत

भिवंडी:  शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे शहराची वाताहात झाली असून खड्डेमय रस्त्यातून प्रवास करतांना प्रवाशांसह वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे शहरात असलेल्या धामणकरनाका , कल्याणरोड , तसेच वंजारपट्टी नाका या ठिकाणी असलेल्या उड्डाणपुलांवर देखील खड्डे पडले असल्याने उड्डाणपुलावरून प्रवास करणे देखील धोक्याचे झाले आहेत.

सर्वात महत्वाचे म्हणजे भिवंडी शहराच्या मुख्य रस्त्यावर 2006 मध्ये बनविण्यात आलेल्या अडीच किलोमीटर लांबीच्या स्वर्गीय राजीव गांधी उड्डाणपुलाची दुरवस्था होऊन तब्बल तीन वर्षे हा उड्डाणपूल अवजड वाहनां साठी बंद करून शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष भगवान टावरे यांनी दिला आहे. गुरुवारी राष्ट्रवादीच्या शहरातील मुख्य कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत टावरे बोलत होते. 

 स्वर्गीय राजीव गांधी उड्डाणपूल २००६ मध्ये जे कुमार या ठेकेदार कंपनीने बनवीत असताना या उड्डाणपुला वरील जाडी ही निवदा मध्ये नमूद मोजमापा पेक्षा सहा इंच कमी केली ज्यामुळे या उड्डाणपुलावर भगदाड पडून दुरवस्था झाली .त्यानंतर या उड्डाणपुलाच्या दुरुस्ती साठी  या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूने बेरिकेटिंग करून अवजड वाहतुकीस बंद केला .ही बाब आय आय टी मुंबई यांनी केलेल्या स्ट्रक्चर ऑडीट मध्ये उघडकीस आली परंतु त्यावर कारवाई न करता शासनाने या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी ७ कोटी १३ लाख ७४ हजार ७९ रुपयांची हर्क्युलस स्ट्रक्चर सिस्टीम या ठेकेदार कंपनीची निविदा २० सप्टेंबर २०१९ मध्ये मंजूर करून १२० दिवसात हे काम पूर्ण करण्याचे कार्यदेश दिले आहेत.

 परंतु आज ही या उड्डाणपुलाची दुरुस्ती काम सुरू न केल्याने शहरातील नागरीक वाहनचालक यांना मनस्ताप सहन करावा लागत असून ,या निविदेची मुदत संपून ही काम न करणाऱ्या ठेकेदारास निलंबित करून त्यास पाठीशी घळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून, शहरातील नागरीकांच्या मनस्तापाचा अंत न पाहता महानगरपालिका प्रशासनाने उड्डाणपुलाची दुरुस्ती तात्काळ करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष भगवान टावरे यांनी केली आहे. त्यासंदर्भातील लेखी पत्र देखील टावरे यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे . या प्रसंगी सरचिटणीस अँड सुनील पाटील ,जब्बार काझी , युसूफ सोलापूरकर ,रसूल खान, नुमान बाऊहुद्दीन आदी पदाधिकारी उपस्थित होते .

टॅग्स :bhiwandiभिवंडीroad transportरस्ते वाहतूक