शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

भिवंडीतील राजीव गांधी उड्डाणपुलाचे 7 कोटी 13 लाख गेले कुठे?; राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 16:13 IST

- नितिन पंडीत भिवंडी :  शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे शहराची वाताहात झाली असून खड्डेमय रस्त्यातून प्रवास करतांना प्रवाशांसह वाहन ...

- नितिन पंडीत

भिवंडी:  शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे शहराची वाताहात झाली असून खड्डेमय रस्त्यातून प्रवास करतांना प्रवाशांसह वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे शहरात असलेल्या धामणकरनाका , कल्याणरोड , तसेच वंजारपट्टी नाका या ठिकाणी असलेल्या उड्डाणपुलांवर देखील खड्डे पडले असल्याने उड्डाणपुलावरून प्रवास करणे देखील धोक्याचे झाले आहेत.

सर्वात महत्वाचे म्हणजे भिवंडी शहराच्या मुख्य रस्त्यावर 2006 मध्ये बनविण्यात आलेल्या अडीच किलोमीटर लांबीच्या स्वर्गीय राजीव गांधी उड्डाणपुलाची दुरवस्था होऊन तब्बल तीन वर्षे हा उड्डाणपूल अवजड वाहनां साठी बंद करून शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष भगवान टावरे यांनी दिला आहे. गुरुवारी राष्ट्रवादीच्या शहरातील मुख्य कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत टावरे बोलत होते. 

 स्वर्गीय राजीव गांधी उड्डाणपूल २००६ मध्ये जे कुमार या ठेकेदार कंपनीने बनवीत असताना या उड्डाणपुला वरील जाडी ही निवदा मध्ये नमूद मोजमापा पेक्षा सहा इंच कमी केली ज्यामुळे या उड्डाणपुलावर भगदाड पडून दुरवस्था झाली .त्यानंतर या उड्डाणपुलाच्या दुरुस्ती साठी  या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूने बेरिकेटिंग करून अवजड वाहतुकीस बंद केला .ही बाब आय आय टी मुंबई यांनी केलेल्या स्ट्रक्चर ऑडीट मध्ये उघडकीस आली परंतु त्यावर कारवाई न करता शासनाने या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी ७ कोटी १३ लाख ७४ हजार ७९ रुपयांची हर्क्युलस स्ट्रक्चर सिस्टीम या ठेकेदार कंपनीची निविदा २० सप्टेंबर २०१९ मध्ये मंजूर करून १२० दिवसात हे काम पूर्ण करण्याचे कार्यदेश दिले आहेत.

 परंतु आज ही या उड्डाणपुलाची दुरुस्ती काम सुरू न केल्याने शहरातील नागरीक वाहनचालक यांना मनस्ताप सहन करावा लागत असून ,या निविदेची मुदत संपून ही काम न करणाऱ्या ठेकेदारास निलंबित करून त्यास पाठीशी घळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून, शहरातील नागरीकांच्या मनस्तापाचा अंत न पाहता महानगरपालिका प्रशासनाने उड्डाणपुलाची दुरुस्ती तात्काळ करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष भगवान टावरे यांनी केली आहे. त्यासंदर्भातील लेखी पत्र देखील टावरे यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे . या प्रसंगी सरचिटणीस अँड सुनील पाटील ,जब्बार काझी , युसूफ सोलापूरकर ,रसूल खान, नुमान बाऊहुद्दीन आदी पदाधिकारी उपस्थित होते .

टॅग्स :bhiwandiभिवंडीroad transportरस्ते वाहतूक