शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

भिवंडीतील राजीव गांधी उड्डाणपुलाचे 7 कोटी 13 लाख गेले कुठे?; राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 16:13 IST

- नितिन पंडीत भिवंडी :  शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे शहराची वाताहात झाली असून खड्डेमय रस्त्यातून प्रवास करतांना प्रवाशांसह वाहन ...

- नितिन पंडीत

भिवंडी:  शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे शहराची वाताहात झाली असून खड्डेमय रस्त्यातून प्रवास करतांना प्रवाशांसह वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे शहरात असलेल्या धामणकरनाका , कल्याणरोड , तसेच वंजारपट्टी नाका या ठिकाणी असलेल्या उड्डाणपुलांवर देखील खड्डे पडले असल्याने उड्डाणपुलावरून प्रवास करणे देखील धोक्याचे झाले आहेत.

सर्वात महत्वाचे म्हणजे भिवंडी शहराच्या मुख्य रस्त्यावर 2006 मध्ये बनविण्यात आलेल्या अडीच किलोमीटर लांबीच्या स्वर्गीय राजीव गांधी उड्डाणपुलाची दुरवस्था होऊन तब्बल तीन वर्षे हा उड्डाणपूल अवजड वाहनां साठी बंद करून शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष भगवान टावरे यांनी दिला आहे. गुरुवारी राष्ट्रवादीच्या शहरातील मुख्य कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत टावरे बोलत होते. 

 स्वर्गीय राजीव गांधी उड्डाणपूल २००६ मध्ये जे कुमार या ठेकेदार कंपनीने बनवीत असताना या उड्डाणपुला वरील जाडी ही निवदा मध्ये नमूद मोजमापा पेक्षा सहा इंच कमी केली ज्यामुळे या उड्डाणपुलावर भगदाड पडून दुरवस्था झाली .त्यानंतर या उड्डाणपुलाच्या दुरुस्ती साठी  या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूने बेरिकेटिंग करून अवजड वाहतुकीस बंद केला .ही बाब आय आय टी मुंबई यांनी केलेल्या स्ट्रक्चर ऑडीट मध्ये उघडकीस आली परंतु त्यावर कारवाई न करता शासनाने या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी ७ कोटी १३ लाख ७४ हजार ७९ रुपयांची हर्क्युलस स्ट्रक्चर सिस्टीम या ठेकेदार कंपनीची निविदा २० सप्टेंबर २०१९ मध्ये मंजूर करून १२० दिवसात हे काम पूर्ण करण्याचे कार्यदेश दिले आहेत.

 परंतु आज ही या उड्डाणपुलाची दुरुस्ती काम सुरू न केल्याने शहरातील नागरीक वाहनचालक यांना मनस्ताप सहन करावा लागत असून ,या निविदेची मुदत संपून ही काम न करणाऱ्या ठेकेदारास निलंबित करून त्यास पाठीशी घळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून, शहरातील नागरीकांच्या मनस्तापाचा अंत न पाहता महानगरपालिका प्रशासनाने उड्डाणपुलाची दुरुस्ती तात्काळ करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष भगवान टावरे यांनी केली आहे. त्यासंदर्भातील लेखी पत्र देखील टावरे यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे . या प्रसंगी सरचिटणीस अँड सुनील पाटील ,जब्बार काझी , युसूफ सोलापूरकर ,रसूल खान, नुमान बाऊहुद्दीन आदी पदाधिकारी उपस्थित होते .

टॅग्स :bhiwandiभिवंडीroad transportरस्ते वाहतूक