शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

अनधिकृत बांधकामे कधी हटणार?

By admin | Updated: September 11, 2015 01:04 IST

मंत्रालयापर्यंत गाजलेल्या ठाणे तालुक्यातील मौजे खारीगाव व पारसिक या गावांच्या मिळून ७८ मिळकतींवर शासनाचे नाव असल्याचे जाहीर झाल्यानंतरही तेथील अनधिकृत बांधकामे

ठाणे : मंत्रालयापर्यंत गाजलेल्या ठाणे तालुक्यातील मौजे खारीगाव व पारसिक या गावांच्या मिळून ७८ मिळकतींवर शासनाचे नाव असल्याचे जाहीर झाल्यानंतरही तेथील अनधिकृत बांधकामे हटविण्याबाबत ठाणे जिल्हा प्रशासन विभाग हाताची घडी घालून बसले आहे. सुरुवातीला कारवाईचा फतवा काढणाऱ्या ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना आता शासनाची जमीन मोकळी करण्यासाठी मुहूर्त कधी मिळणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.मुंब्रा रेतीबंदर खाडीतील अवैधरीत्या रेतीउपसा कारवाईदरम्यान ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी सीआरझेड परिसरातील कळवा खाडीकिनाऱ्याच्या पारसिक व खारीगाव येथील अतिक्रमणे लक्षात घेऊन तत्काळ त्या भूखंडांचे सर्वेक्षण करून ते खाली करण्याबाबत नोटिसाही बजावल्या होत्या. त्यामुळे हा प्रश्न स्थानिक पातळीसह चक्क मुख्यमंत्री दरबारी चांगलाच गाजला होता. (प्रतिनिधी)स्थानिकांची उच्च न्यायालयात धावठाणे महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने संयुक्तरीत्या तेथील बांधकामांवर कारवाई करण्याचा निर्णय घेऊन कारवाईचे जवळपास नियोजनही केले होते. मात्र, स्थानिकांनी याबाबत विरोधाची भूमिका घेऊन थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या वेळी ७८ मिळकतींवर मालकीबाबत दावा करणारी याचिका न्यायालयात दाखल झाली होती. मात्र, ती फेटाळल्याने सुमारे १ लाख ४२ हजार ३९२.११ चौमी क्षेत्रावर राज्य शासनाचे नाव लावण्यावर शिक्कामोर्तब झाले. या निर्णयाला जवळपास एक महिना होऊनही कारवाईबाबत कोणत्याच हालचाली अथवा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. भविष्यातील पर्यटन विकासाच्या दृष्टीने तेथील बांधकामधारकांना नोटिसा बजावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना ती शासकीय जमीन मोकळी करण्यासाठी एक ते दोन दिवस लागणार नाहीत. ठाण्यातील पर्यटनाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत, याबाबतचे गूढ वाढू लागले आहे. याबाबत, त्यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.