शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अनधिकृत बांधकामे कधी हटणार?

By admin | Updated: September 11, 2015 01:04 IST

मंत्रालयापर्यंत गाजलेल्या ठाणे तालुक्यातील मौजे खारीगाव व पारसिक या गावांच्या मिळून ७८ मिळकतींवर शासनाचे नाव असल्याचे जाहीर झाल्यानंतरही तेथील अनधिकृत बांधकामे

ठाणे : मंत्रालयापर्यंत गाजलेल्या ठाणे तालुक्यातील मौजे खारीगाव व पारसिक या गावांच्या मिळून ७८ मिळकतींवर शासनाचे नाव असल्याचे जाहीर झाल्यानंतरही तेथील अनधिकृत बांधकामे हटविण्याबाबत ठाणे जिल्हा प्रशासन विभाग हाताची घडी घालून बसले आहे. सुरुवातीला कारवाईचा फतवा काढणाऱ्या ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना आता शासनाची जमीन मोकळी करण्यासाठी मुहूर्त कधी मिळणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.मुंब्रा रेतीबंदर खाडीतील अवैधरीत्या रेतीउपसा कारवाईदरम्यान ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी सीआरझेड परिसरातील कळवा खाडीकिनाऱ्याच्या पारसिक व खारीगाव येथील अतिक्रमणे लक्षात घेऊन तत्काळ त्या भूखंडांचे सर्वेक्षण करून ते खाली करण्याबाबत नोटिसाही बजावल्या होत्या. त्यामुळे हा प्रश्न स्थानिक पातळीसह चक्क मुख्यमंत्री दरबारी चांगलाच गाजला होता. (प्रतिनिधी)स्थानिकांची उच्च न्यायालयात धावठाणे महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने संयुक्तरीत्या तेथील बांधकामांवर कारवाई करण्याचा निर्णय घेऊन कारवाईचे जवळपास नियोजनही केले होते. मात्र, स्थानिकांनी याबाबत विरोधाची भूमिका घेऊन थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या वेळी ७८ मिळकतींवर मालकीबाबत दावा करणारी याचिका न्यायालयात दाखल झाली होती. मात्र, ती फेटाळल्याने सुमारे १ लाख ४२ हजार ३९२.११ चौमी क्षेत्रावर राज्य शासनाचे नाव लावण्यावर शिक्कामोर्तब झाले. या निर्णयाला जवळपास एक महिना होऊनही कारवाईबाबत कोणत्याच हालचाली अथवा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. भविष्यातील पर्यटन विकासाच्या दृष्टीने तेथील बांधकामधारकांना नोटिसा बजावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना ती शासकीय जमीन मोकळी करण्यासाठी एक ते दोन दिवस लागणार नाहीत. ठाण्यातील पर्यटनाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत, याबाबतचे गूढ वाढू लागले आहे. याबाबत, त्यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.