शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

अनधिकृत बांधकामे कधी हटणार?

By admin | Updated: September 11, 2015 01:04 IST

मंत्रालयापर्यंत गाजलेल्या ठाणे तालुक्यातील मौजे खारीगाव व पारसिक या गावांच्या मिळून ७८ मिळकतींवर शासनाचे नाव असल्याचे जाहीर झाल्यानंतरही तेथील अनधिकृत बांधकामे

ठाणे : मंत्रालयापर्यंत गाजलेल्या ठाणे तालुक्यातील मौजे खारीगाव व पारसिक या गावांच्या मिळून ७८ मिळकतींवर शासनाचे नाव असल्याचे जाहीर झाल्यानंतरही तेथील अनधिकृत बांधकामे हटविण्याबाबत ठाणे जिल्हा प्रशासन विभाग हाताची घडी घालून बसले आहे. सुरुवातीला कारवाईचा फतवा काढणाऱ्या ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना आता शासनाची जमीन मोकळी करण्यासाठी मुहूर्त कधी मिळणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.मुंब्रा रेतीबंदर खाडीतील अवैधरीत्या रेतीउपसा कारवाईदरम्यान ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी सीआरझेड परिसरातील कळवा खाडीकिनाऱ्याच्या पारसिक व खारीगाव येथील अतिक्रमणे लक्षात घेऊन तत्काळ त्या भूखंडांचे सर्वेक्षण करून ते खाली करण्याबाबत नोटिसाही बजावल्या होत्या. त्यामुळे हा प्रश्न स्थानिक पातळीसह चक्क मुख्यमंत्री दरबारी चांगलाच गाजला होता. (प्रतिनिधी)स्थानिकांची उच्च न्यायालयात धावठाणे महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने संयुक्तरीत्या तेथील बांधकामांवर कारवाई करण्याचा निर्णय घेऊन कारवाईचे जवळपास नियोजनही केले होते. मात्र, स्थानिकांनी याबाबत विरोधाची भूमिका घेऊन थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या वेळी ७८ मिळकतींवर मालकीबाबत दावा करणारी याचिका न्यायालयात दाखल झाली होती. मात्र, ती फेटाळल्याने सुमारे १ लाख ४२ हजार ३९२.११ चौमी क्षेत्रावर राज्य शासनाचे नाव लावण्यावर शिक्कामोर्तब झाले. या निर्णयाला जवळपास एक महिना होऊनही कारवाईबाबत कोणत्याच हालचाली अथवा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. भविष्यातील पर्यटन विकासाच्या दृष्टीने तेथील बांधकामधारकांना नोटिसा बजावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना ती शासकीय जमीन मोकळी करण्यासाठी एक ते दोन दिवस लागणार नाहीत. ठाण्यातील पर्यटनाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत, याबाबतचे गूढ वाढू लागले आहे. याबाबत, त्यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.