शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

बहुउद्देशीय नाट्यगृहाची उभारणी कधी होणार?

By admin | Updated: January 23, 2017 05:17 IST

अंबरनाथ असो वा बदलापूर, या दोन्ही शहरांत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. वाढत्या नागरीकरणामुळे या दोन्ही शहरांसाठी

अंबरनाथ असो वा बदलापूर, या दोन्ही शहरांत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. वाढत्या नागरीकरणामुळे या दोन्ही शहरांसाठी स्वतंत्र नाट्यगृहांचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. राज्य शासनाने त्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे. मात्र, या दोन्ही शहरांना केवळ नाट्यगृहाची नव्हे, तर बहुउद्देशीय नाट्यगृहाची गरज आहे. नाटकांसोबत इतर कार्यक्रमांसाठी हे नाट्यगृह वापरण्याची सुविधा मिळाल्यास येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचे केंद्र बनवणे शक्य होईल. अंबरनाथ आणि बदलापूर ही जुळी शहरे असली तरी लोकसंख्येच्या दृष्टीने पाहिल्यास अंबरनाथ शहर बहुभाषिक म्हणून ओळखले जाते. तरीही मराठमोळ्या संस्कृतीला साजेशा कार्यक्रमांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेक कलाकार अंबरनाथमधून घडले आहेत. बदलापूर शहराचा विचार केल्यास या शहराने आजही गावपण जपलेले आहे. त्यातच मुंबई, ठाणे आणि डोंबिवली-कल्याण भागांतील मराठी भाषिक मोठ्या संख्येने या शहरांत वास्तव्यास आले आहेत. कला आणि सांस्कृतिक कार्यात बदलापूरने नावलौकिक प्राप्त केला आहे. मुंबई, ठाणे आणि डोंबिवलीनंतर मराठमोळी संस्कृती आणि तिच्याशी निगडित कार्यक्रमांची संख्या सर्वाधिक येथेच आहे.सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजकांना मात्र या शहरांत कार्यक्रम आयोजित करताना मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो. कार्यक्रमांसाठी खाजगी सभागृहाची व्यवस्था करावी लागते. शहरे वाढत असली व त्यांची सांस्कृतिक ओळख दृढ होत असतानाही दोन्ही शहरांतील पालिकांकडे आपले सभागृह नाही. नाट्यरसिकांसाठी शहरांत नाट्यगृह उभारणे हे जसे गरजेचे आहे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी बंदिस्त सभागृह असणे गरजेचे आहे. बदलापूर पालिकेने कात्रप चौकात खाजगी बांधकाम व्यावसायिकाला आरक्षण विकासाच्या नावावर भूखंड दिला असला, तरी त्या मोबदल्यात पालिकेला तळ मजल्यावर जे सभागृह बांधून देणे गरजेचे होते, तेच सभागृह बांधकाम व्यावसायिकाने तिसऱ्या मजल्यावर तयार करून दिले आहे. तिसऱ्या मजल्यावर सभागृह मिळाल्याने त्याचा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी हवा तसा वापर करणे अवघड आहे. लिफ्ट बंद ठेवल्यामुळे रसिकांना जिने चढून सभागृहात जावे लागते. मोक्याच्या भूखंडाच्या मोबदल्यात पालिकेला हक्काचे सभागृह तळ मजल्यावर न मिळाल्याने रसिक प्रेक्षकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातही, हे सभागृह खाजगी संस्थेला चालवण्यासाठी दिल्याने त्याचे दर लहान कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना परवडणारे नाहीत. रसिकांसाठी पालिकेने स्वत: सभागृह उभे करण्याची तयारी ठेवली आहे. नाट्यगृहासाठी निधी येऊन पडला असला, तरी नाट्यगृहाची जागा अपुरी पडत असल्याने हे कामदेखील रखडलेल्या अवस्थेत आहे. शहराला नाट्यगृहाची गरज असली, तरी इतर शहरांनी जी नाट्यगृहे उभारली आहेत, त्यांची देखभालीअभावी झालेली दुरवस्था पाहता अंबरनाथ आणि बदलापुरातील नाट्यगृह नीटनेटके ठेवणे पालिकेला अवघड जाणार आहे, हे स्पष्ट दिसत आहे. सध्या नाशिकमधील नाट्यगृहाच्या अस्वच्छतेचा मुद्दा सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी ऐरणीवर आणला आहे. डोंबिवलीमधील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाची स्थिती तशीच आहे. नाटकांना शनिवार आणि रविवारव्यतिरिक्त गर्दी होत नसल्याने इतर दिवशी नाट्यगृह बंद ठेवण्याची वेळ येते. अशा परिस्थितीत शहरात केवळ नाट्यगृहाऐवजी बहुउद्देशीय नाट्यगृहाची सर्वाधिक गरज आहे. नाटकांच्या प्रयोगासोबत इतर कार्यक्रमांसाठी सभागृह मिळाल्यास त्याच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च निघेल. अंबरनाथमध्येही बहुउद्देशीय नाट्यगृहाचीच गरज आहे. शिवाजी चौकात सुरू असलेल्या खुल्या नाट्यगृहाचे काम आजही अपूर्णावस्थेत आहे. किमान ते तरी रसिकांसाठी खुले करून देणे गरजेचे आहे. केवळ नाट्यगृहाची भपकेबाज वास्तू तयार न करता सर्व छोट्यामोठ्या कार्यक्रमांसाठी कमीतकमी दरात नेटके सभागृह उपलब्ध झाले, तर लोकांची सांस्कृतिक भूक भागेल.