शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ही खाबूगिरी थांबणार कधी?

By admin | Updated: July 3, 2017 06:27 IST

शनिवारच्या लाचखोरीच्या प्रकरणाने कल्याण-डोंबिवली पालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कोणत्या ना कोणत्या कारणांनी लाच

प्र्शांत माने/ लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : शनिवारच्या लाचखोरीच्या प्रकरणाने कल्याण-डोंबिवली पालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कोणत्या ना कोणत्या कारणांनी लाच मागण्याची प्रवृत्ती काही केल्या कमी होत नसल्याचे दिसून आले. गेल्या काही वर्षांमध्ये अधिकारी, कर्मचारी असे २१ जण लाच घेताना पकडल्यानंतरही हे प्रमाण कमी झालेले नाही आणि खाबूगिरीत महिलाही मागे नाहीत, हे स्वाती गरूड यांच्यानिमित्ताने समोर आले. प्रभाग अधिकारी सातत्याने लाचप्रकरणात अडकत आहेत, हेही यातून पुढे आले. या सततच्या घटनांनी केडीएमसी पुरती बदनाम होत असून अधिकाऱ्यांची ही खाबूगिरी थांबणार तरी कधी? असा सवाल उपस्थित झाला आहे.लाचखोरांना कडक शिक्षा करण्याऐवजी त्यांना पाठिशी घालण्याचे काम लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या संगनमताने होत असल्याची उदाहरणे याआधी दिसली आहेत. या ‘अभय’ देण्याच्या प्रवृत्तीमुळेच आज लाचखोरीच्या प्रकरणातील बहुतांश अधिकारी महापालिका सेवेत कार्यकारी पदावर कार्यरत आहेत. अनधिकृत बांधकाम असो अथवा नूतनीकरण, कामाचे कार्यादेश देणे असो अथवा ठेकेदारांची बिले मंजूर करणे अशा विविध कारणांनी लाच मागून अमाप काळी माया जमा करणाऱ्यांनी महापालिकेच्या विकासाऐवजी स्वत:चाच विकासात धन्यता मानली आहे. ‘जे’ प्रभागाच्या प्रभाग अधिकारी स्वाती गरूड यांच्या अटकेमुळे पुन्हा एकदा पालिकेची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी लाचखोरीच्या जाळयात अडकल्याच्या घटना मोठया प्रमाणावर याआधी घडल्या असूनही दोन नगरसेवकसुध्दा लाचप्रकरणात अडकले आहेत. १७ एप्रिल २०१४ ला तत्कालीन ब प्रभाग क्षेत्र अधिकारी दत्तात्रय मस्तूद यांना अटक झाली. यापाठोपाठ ५ नोव्हेंबर २०१६ ला तत्कालीन ह प्रभागक्षेत्र अधिकारी गणेश बोराडे यांनाही लाचप्रकरणात अटक झाली. १ फेब्रुवारी २०१४ मध्ये क प्रभाग अधिकारी असतानाही बोराडे यांना लाचप्रकरणातच अटक झाली. आता घरदुरूस्तीच्या प्रकरणातच लाच घेतल्याच्या आरोपाखाली महिला अधिकारी गरूड यांना अटक झाल्याने अशा बांधकामांच्या मोबदल्यात केडीएमसीतील भ्रष्टाचार कसा शिगेला पोहोचला आहे, याची प्रचिती आली. हा देखील शनिवारचगणेश बोराडे यांना ५ नोव्हेंबर २०१६ ला लाचप्रकरणात अटक झाली. तेव्हा शनिवार होता. आधी त्यांना १ फेब्रुवारीला अटक झाली तो दिवसही शनिवारच होता आणि आता प्रभाग अधिकारी स्वाती गरूड यांना अटक झाली, तो देखील शनिवारच. मूळ अधीक्षक पदावर असलेल्या गरूड यांची महिन्यापूर्वी ‘जे’ प्रभागात बदली झाली. सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रभाग अधिकारीपद देण्याऐवजी सुरूवातीपासूनच प्रशासनाने दुय्यम पदावर कार्यरत अधीक्षक असो अथवा लेखापाल यांनाच नेहमीच या प्रभाग अधिकारीपदाची प्रभारी जबाबदारी सोपविली. त्यांची क्षमता नसताना ही जबाबदारी दिल्याने झटपट मिळणाऱ्या पैशांना ते बळी पडतात त्यातून अशी प्रकरणे घडतात.कायदे ठरताहेत तकलादूलाचखोरीसंदर्भातले कायदे एक प्रकारे तकलादू ठरत असल्याने अशा अधिकाऱ्याचे चांगलेच फावते. त्यांचा पुन्हा सेवेतील प्रवेश सुकर होतो. या नियमांच्या आधारे ते पुन्हा पालिका सेवेत रूजू होत असले तरी ‘जाऊ तिथे खाऊ’ही वृत्ती कायम आहे. वारंवार बदलणारे सरकारी निर्णय हे लाचखोरांच्या हिताचेच असल्याने यातच भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचेच काम होत आहे. एकीकडे भ्रष्टाचाराला आळा घालण्यासंदर्भात विविध उपाययोजना करायच्या आणि दुसरीकडे नियम शिथील करून भ्रष्टाचार करणाऱ्यांना अभय देण्याची दुटप्पी भूमिकाही यातून दिसून येते. राज्य सरकारच्या निलंबित सरकारी सेवकांच्या २०११ च्या निर्देशानुसार जिथे भ्रष्टाचाराला वाव आहे, अशा कार्यकारीपदापासून त्यांना दूर ठेवण्याचे आदेश असताना याकडे मात्र केडीएमसी प्रशासनाने पुरता कानाडोळा केल्याचेही पहावयास मिळते. न्यायालयीन कोठडीत रवानगीशनिवारी अटक करण्यात आलेल्या गरूड यांना रविवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहीती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक बाळा कुंभार यांनी दिली.