शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ही खाबूगिरी थांबणार कधी?

By admin | Updated: July 3, 2017 06:27 IST

शनिवारच्या लाचखोरीच्या प्रकरणाने कल्याण-डोंबिवली पालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कोणत्या ना कोणत्या कारणांनी लाच

प्र्शांत माने/ लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : शनिवारच्या लाचखोरीच्या प्रकरणाने कल्याण-डोंबिवली पालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कोणत्या ना कोणत्या कारणांनी लाच मागण्याची प्रवृत्ती काही केल्या कमी होत नसल्याचे दिसून आले. गेल्या काही वर्षांमध्ये अधिकारी, कर्मचारी असे २१ जण लाच घेताना पकडल्यानंतरही हे प्रमाण कमी झालेले नाही आणि खाबूगिरीत महिलाही मागे नाहीत, हे स्वाती गरूड यांच्यानिमित्ताने समोर आले. प्रभाग अधिकारी सातत्याने लाचप्रकरणात अडकत आहेत, हेही यातून पुढे आले. या सततच्या घटनांनी केडीएमसी पुरती बदनाम होत असून अधिकाऱ्यांची ही खाबूगिरी थांबणार तरी कधी? असा सवाल उपस्थित झाला आहे.लाचखोरांना कडक शिक्षा करण्याऐवजी त्यांना पाठिशी घालण्याचे काम लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या संगनमताने होत असल्याची उदाहरणे याआधी दिसली आहेत. या ‘अभय’ देण्याच्या प्रवृत्तीमुळेच आज लाचखोरीच्या प्रकरणातील बहुतांश अधिकारी महापालिका सेवेत कार्यकारी पदावर कार्यरत आहेत. अनधिकृत बांधकाम असो अथवा नूतनीकरण, कामाचे कार्यादेश देणे असो अथवा ठेकेदारांची बिले मंजूर करणे अशा विविध कारणांनी लाच मागून अमाप काळी माया जमा करणाऱ्यांनी महापालिकेच्या विकासाऐवजी स्वत:चाच विकासात धन्यता मानली आहे. ‘जे’ प्रभागाच्या प्रभाग अधिकारी स्वाती गरूड यांच्या अटकेमुळे पुन्हा एकदा पालिकेची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी लाचखोरीच्या जाळयात अडकल्याच्या घटना मोठया प्रमाणावर याआधी घडल्या असूनही दोन नगरसेवकसुध्दा लाचप्रकरणात अडकले आहेत. १७ एप्रिल २०१४ ला तत्कालीन ब प्रभाग क्षेत्र अधिकारी दत्तात्रय मस्तूद यांना अटक झाली. यापाठोपाठ ५ नोव्हेंबर २०१६ ला तत्कालीन ह प्रभागक्षेत्र अधिकारी गणेश बोराडे यांनाही लाचप्रकरणात अटक झाली. १ फेब्रुवारी २०१४ मध्ये क प्रभाग अधिकारी असतानाही बोराडे यांना लाचप्रकरणातच अटक झाली. आता घरदुरूस्तीच्या प्रकरणातच लाच घेतल्याच्या आरोपाखाली महिला अधिकारी गरूड यांना अटक झाल्याने अशा बांधकामांच्या मोबदल्यात केडीएमसीतील भ्रष्टाचार कसा शिगेला पोहोचला आहे, याची प्रचिती आली. हा देखील शनिवारचगणेश बोराडे यांना ५ नोव्हेंबर २०१६ ला लाचप्रकरणात अटक झाली. तेव्हा शनिवार होता. आधी त्यांना १ फेब्रुवारीला अटक झाली तो दिवसही शनिवारच होता आणि आता प्रभाग अधिकारी स्वाती गरूड यांना अटक झाली, तो देखील शनिवारच. मूळ अधीक्षक पदावर असलेल्या गरूड यांची महिन्यापूर्वी ‘जे’ प्रभागात बदली झाली. सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रभाग अधिकारीपद देण्याऐवजी सुरूवातीपासूनच प्रशासनाने दुय्यम पदावर कार्यरत अधीक्षक असो अथवा लेखापाल यांनाच नेहमीच या प्रभाग अधिकारीपदाची प्रभारी जबाबदारी सोपविली. त्यांची क्षमता नसताना ही जबाबदारी दिल्याने झटपट मिळणाऱ्या पैशांना ते बळी पडतात त्यातून अशी प्रकरणे घडतात.कायदे ठरताहेत तकलादूलाचखोरीसंदर्भातले कायदे एक प्रकारे तकलादू ठरत असल्याने अशा अधिकाऱ्याचे चांगलेच फावते. त्यांचा पुन्हा सेवेतील प्रवेश सुकर होतो. या नियमांच्या आधारे ते पुन्हा पालिका सेवेत रूजू होत असले तरी ‘जाऊ तिथे खाऊ’ही वृत्ती कायम आहे. वारंवार बदलणारे सरकारी निर्णय हे लाचखोरांच्या हिताचेच असल्याने यातच भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचेच काम होत आहे. एकीकडे भ्रष्टाचाराला आळा घालण्यासंदर्भात विविध उपाययोजना करायच्या आणि दुसरीकडे नियम शिथील करून भ्रष्टाचार करणाऱ्यांना अभय देण्याची दुटप्पी भूमिकाही यातून दिसून येते. राज्य सरकारच्या निलंबित सरकारी सेवकांच्या २०११ च्या निर्देशानुसार जिथे भ्रष्टाचाराला वाव आहे, अशा कार्यकारीपदापासून त्यांना दूर ठेवण्याचे आदेश असताना याकडे मात्र केडीएमसी प्रशासनाने पुरता कानाडोळा केल्याचेही पहावयास मिळते. न्यायालयीन कोठडीत रवानगीशनिवारी अटक करण्यात आलेल्या गरूड यांना रविवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहीती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक बाळा कुंभार यांनी दिली.