शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

पूरग्रस्तांना आर्थिक मदत मिळणार तरी कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 00:20 IST

भाजप गटनेत्याचा सवाल : साडेतीन कोटींचा निधी दोन दिवसांत तहसील कार्यालयास मिळणार

कल्याण : पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, अनेकांनी मदतीचे अर्ज करूनही त्यांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे या पूरग्रस्तांना सरकारी मदत मिळणार कधी, असा सवाल केडीएमसीतील भाजप गटनेते विकास म्हात्रे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांना निवेदन दिले आहे.

कल्याण-डोंबिवलीसह कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागाला पुराचा फटका बसला होता. २६ जुलै, ४ आॅगस्टला झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरात तीन ते चार दिवस पाणी होते. सरकारने सुरुवातीला ज्यांच्या घरात किमान दोन दिवस पुराचे पाणी होते, तसेच ज्यांची घरे अधिकृत आहेत, अशा पूरग्रस्तांना किमान पाच हजारांची मदत दिली जाईल, असे परिपत्रक काढले होते. मात्र, पूरग्रस्तांनी सरकारच्या या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. लोकप्रतिनिधींनीही सरसकट मदत देण्याची मागणी केली. त्यानंतर ही अट शिथिल केली गेली.कल्याणच्या तहसीलदारांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे १६ कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार, हा निधी कल्याण तहसील कार्यालयास मिळाला. पूरग्रस्तांच्या थेट खात्यात भरपाईची रक्कम जमा केली गेली. मात्र, ज्यांना ही मदत मिळाली नाही, त्यांच्यासाठी विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी तहसील कार्यालयाने आणखी १० कोटींची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती. परंतु, ही रक्कम अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेली नसल्याने अनेकांना मदत मिळालेली नाही, याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे अगोदर आलेली मदत किती जणांना दिली गेली आहे, अजून किती जणांना वाटप होणे बाकी आहे, असा सर्व तपशील त्यांनी तहसील कार्यालयाकडून मागितला आहे.याप्रकरणी आकडे यांना विचारले असता ते म्हणाले की, १६ कोटी रुपयांची मदत पूरग्रस्तांना देण्यात आली आहे. भरपाई न मिळालेल्यांसाठी १० कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागितला आहे. त्यापैकी साडेतीन कोटी रुपयांची रक्कम दोन दिवसांत तहसील कार्यालयास मिळणार आहे. त्यानंतर निधीचे वाटप केले जाईल.कल्याण पूर्वेतील नागरिकही मदतीपासून वंचितच्कल्याण : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत सरकारकडून पंचनामे झाले, अर्जही भरून घेण्यात आले पण अद्याप कल्याण पूर्वेतील काहींना धनादेशाचे वाटप झालेले नाही. ती मदत तत्काळ मिळावी, यासंदर्भात माजी नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश तरे यांनीही कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांना निवेदन दिले आहे.च्जुलै, आॅगस्टमधील अतिवृष्टीचा कल्याण पूर्व भागालाही मोठा फटका बसला होता. यात नागरिकांच्या घरातील सामानांसह शेतकऱ्यांचे भातशेतीचे मोठे नुकसान झाले होते. सरकारतर्फे पूरग्रस्तांसाठी १५ हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. यानिमित्ताने नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे केले. नागरिक व शेतकºयांकडून अर्जही भरून घेण्यात आले. परंतु, खडेगोळवली, काटेमानिवली, शिवाजीनगर आणि वालधुनी भागातील काहींना अद्यापही १५ हजार रुपयांची मदत मिळालेली नसल्याचे तरे यांनी तहसीलदारांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

टॅग्स :thaneठाणेfloodपूर