शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या अर्थकारणाला थेट धक्का; जगातील सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला!
2
मुंबई एअरपोर्टवर १९ कोटींचे ड्रग्ज जप्त; दोन दिवसांत दोन मोठे गुन्हे उघड, कस्टम्सच्या कारवाईत तिघांना अटक!
3
Rohit Sharma Record: हिटमॅन रोहितनं वेळ घेतला; मग पुल शॉटसह बॅक टू बॅक सिक्सरसह सेट केला महारेकॉर्ड
4
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! १५० रुपयांची कार्बाइड गन बेतली जीवावर, १२५ जणांनी गमावली दृष्टी
5
वालूरात दोन ठिकाणी दरोडेखोरांचा हल्ला; एका घटनेत आजी गभीर जखमी, नातू ठार, दुसऱ्या घटनेत वृद्ध दांपत्य जखमी
6
भारतासाठी बांगलादेशमधून खुशखबर! निवडणुकीपूर्वी हंगामी युनूस सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय
7
"बंदुकीचा धाक दाखवून रशियासाठी युद्ध लढण्यास..."; भारतीय तरुणाचा धक्कादायक Video
8
केवळ ₹५०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; १५ वर्षांत बनवाल मोठा रिटायरमेंट फंड, जबरदस्त आहे सरकारी स्कीम
9
Virat Kohli : पहिल्यांदाच आली ही वेळ! चाहत्यांचे आभार मानत कोहलीनं ॲडलेडला केलं अलविदा? (VIDEO)
10
टाटा ट्रस्टमधील वाद थांबेनात! आता ट्रस्टी मेहली मिस्त्रींनी ठेवली नवी अट, काय होणार बदल?
11
"फटाका इन्व्हर्टरवर पडला, संपूर्ण इमारतीची राख..."; इंदिरापुरममध्ये भीषण आग, नेमकं काय घडलं?
12
दिल्लीत 'कॉन्ट्रॅक्ट किलर' गँगचा थरारक शेवट; एन्काऊंटरमध्ये ४ ठार, बिहार निवडणुकीसाठी रचला होता कट
13
पतीच्या हातात ब्रेसलेट पाहून नाराज, मंगळसूत्र न मिळाल्याने हेल्थ ऑफिसरने मारली नदीत उडी
14
"SDM हूँ, पहले दूसरे की गाडी में...?"; CNG पंप कर्मचाऱ्यानं रुबाब दाखवणाऱ्या 'साहेबां'च्या 'कानफटात' लगावली, फ्रीस्टाइल VIDEO Viral
15
काँग्रेसची माघार! अंतर्गत तणावानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सहमती; गहलोत-लालू भेटीने जुळले समीकरण
16
Gold Silver Price Review: आणखी स्वस्त होणार का सोनं? आता खरेदी करण्याची संधी की अजून थोडी वाट पाहावी...
17
केरळच्या गुरुवायुर मंदिरातून लाखोंचे सोने-चांदी गायब; २५ कोटींच्या वस्तूंची नोंदच नाही!
18
Stock Market Today: शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex मध्ये ५०० अंकांची तेजी; Nifty २६ हजारांच्या पार
19
IND vs AUS 2nd ODI : हिटमॅन रोहितनं रचला इतिहास; ऑस्ट्रेलियात असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
20
केवळ ₹२७ लाखांना पडेल ₹५० लाखांचं घर; Home Loan घेताना फक्त ही छोटी ट्रिक वापरा आणि जादू पाहा

पूरग्रस्तांना आर्थिक मदत मिळणार तरी कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 00:20 IST

भाजप गटनेत्याचा सवाल : साडेतीन कोटींचा निधी दोन दिवसांत तहसील कार्यालयास मिळणार

कल्याण : पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, अनेकांनी मदतीचे अर्ज करूनही त्यांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे या पूरग्रस्तांना सरकारी मदत मिळणार कधी, असा सवाल केडीएमसीतील भाजप गटनेते विकास म्हात्रे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांना निवेदन दिले आहे.

कल्याण-डोंबिवलीसह कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागाला पुराचा फटका बसला होता. २६ जुलै, ४ आॅगस्टला झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरात तीन ते चार दिवस पाणी होते. सरकारने सुरुवातीला ज्यांच्या घरात किमान दोन दिवस पुराचे पाणी होते, तसेच ज्यांची घरे अधिकृत आहेत, अशा पूरग्रस्तांना किमान पाच हजारांची मदत दिली जाईल, असे परिपत्रक काढले होते. मात्र, पूरग्रस्तांनी सरकारच्या या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. लोकप्रतिनिधींनीही सरसकट मदत देण्याची मागणी केली. त्यानंतर ही अट शिथिल केली गेली.कल्याणच्या तहसीलदारांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे १६ कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार, हा निधी कल्याण तहसील कार्यालयास मिळाला. पूरग्रस्तांच्या थेट खात्यात भरपाईची रक्कम जमा केली गेली. मात्र, ज्यांना ही मदत मिळाली नाही, त्यांच्यासाठी विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी तहसील कार्यालयाने आणखी १० कोटींची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती. परंतु, ही रक्कम अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेली नसल्याने अनेकांना मदत मिळालेली नाही, याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे अगोदर आलेली मदत किती जणांना दिली गेली आहे, अजून किती जणांना वाटप होणे बाकी आहे, असा सर्व तपशील त्यांनी तहसील कार्यालयाकडून मागितला आहे.याप्रकरणी आकडे यांना विचारले असता ते म्हणाले की, १६ कोटी रुपयांची मदत पूरग्रस्तांना देण्यात आली आहे. भरपाई न मिळालेल्यांसाठी १० कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागितला आहे. त्यापैकी साडेतीन कोटी रुपयांची रक्कम दोन दिवसांत तहसील कार्यालयास मिळणार आहे. त्यानंतर निधीचे वाटप केले जाईल.कल्याण पूर्वेतील नागरिकही मदतीपासून वंचितच्कल्याण : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत सरकारकडून पंचनामे झाले, अर्जही भरून घेण्यात आले पण अद्याप कल्याण पूर्वेतील काहींना धनादेशाचे वाटप झालेले नाही. ती मदत तत्काळ मिळावी, यासंदर्भात माजी नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश तरे यांनीही कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांना निवेदन दिले आहे.च्जुलै, आॅगस्टमधील अतिवृष्टीचा कल्याण पूर्व भागालाही मोठा फटका बसला होता. यात नागरिकांच्या घरातील सामानांसह शेतकऱ्यांचे भातशेतीचे मोठे नुकसान झाले होते. सरकारतर्फे पूरग्रस्तांसाठी १५ हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. यानिमित्ताने नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे केले. नागरिक व शेतकºयांकडून अर्जही भरून घेण्यात आले. परंतु, खडेगोळवली, काटेमानिवली, शिवाजीनगर आणि वालधुनी भागातील काहींना अद्यापही १५ हजार रुपयांची मदत मिळालेली नसल्याचे तरे यांनी तहसीलदारांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

टॅग्स :thaneठाणेfloodपूर