शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

रखडलेल्या विकासकामांना मुहूर्त कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 00:25 IST

डोंबिवलीतील स्थिती; रस्ते, गटारे, मलवाहिन्यांची कामे अर्धवट स्थितीत

डोंबिवली : सध्या लॉकडाउनमध्ये बंद असलेल्या रेल्वे सेवेचा फायदा उठवित कल्याण-डोंबिवली शहरातील रखडलेली रेल्वे उड्डाणपुलांची कामे रेल्वे आणि केडीएमसीने सुरू केली आहेत. परंतु, कोरोनामुळे बहुतांश ठिकाणी मलवाहिनी, रस्ते काँक्रिटीकरण, गटार आणि छोट्या नाल्यांच्या बांधणीची ठप्प झालेली कामे मात्र सुरू झालेली नाहीत. येऊ घातलेला पावसाळा पाहता ही महत्त्वाची कामे तातडीने होणे गरजेचे आहे, अन्यथा परिस्थिती अधिकच बिकट होण्याची शक्यता आहे.मागील पावसाळ्यात खड्ड्यांनी बेजार केले होते. परंतु, पुढे हिवाळा व आता उन्हाळ्यातही खोदकामांची परंपरा सुरूच होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून अमृत योजनेंतर्गत मलवाहिनी टाकण्याची कामे सुरू होती. तर काही ठिकाणी काँक्रिटीकरणाची कामे चालू होती. मात्र, संथगतीने सुरू असलेल्या या कामांना कोरोनाचा फटका बसला आहे. सध्या ही कामे पूर्णपणे बंद आहेत. हे चित्र घरडा सर्कल ते खंबाळपाडा चौक, कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्ता आणि ९० फुटी रोडवर पहायला मिळते. ही कामे अर्धवट स्थितीत बंद पडल्याने आजही काही रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत. त्यामुळे वाहने विरुद्ध दिशेने चालविली जात आहेत.सध्या मलवाहिनीच्या कामांबरोबर काँक्रिटीकरणाची कामेही बंद आहेत. अर्धवट राहिलेली ही कामे पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. एमआयडीसीकडून निवासी भागात नवीन जलवाहिन्या टाकण्याची आणि गटार, छोटे नाले बांधण्याची कामे सुरू होती. दोन ते अडीच फूट व्यासाच्या जलवाहिन्या टाकण्याचे काम निवासी भागातील सर्व्हीस रोडवर सुरू होते. परंतु, ते कामही आता पूर्णपणे बंद आहे. दरम्यान, लॉकडाउनमध्ये रेल्वे आणि केडीएमसीने कोपर आणि पत्रीपुलाचे काम सुरू केले आहे.तर एमएमआरडीए आणि एमएसआरडीसीनेही कल्याण-शीळ मार्गावर विकासकामांना सुरुवात केली आहे. याप्रमाणेच केडीएमसी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून रखडलेल्या कामांना प्राधान्य दिले गेले पाहिजे अन्यथा अर्धवट राहिलेल्या कामांमुळे पावसाळ्यात खड्डेमय स्थिती राहण्याबरोबरच तसेच पाणी तुंबण्याची समस्या उद्भवण्याची चिन्हे आहेत.तातडीच्या कामांना प्राधान्य : महत्त्वाची आणि अत्यंत गरजेची असलेली उड्डाणपुलांची कामे सध्या हाती घेण्यात आली आहेत. तेथे काम करणाऱ्या कामगारांना नियमांचे पालन करायला सांगितले आहे. वेळोवेळी त्यांची वैद्यकीय तपासणीही होत आहे. बाकीच्या कामांचा ३ मेनंतर विचार केला जाणार आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचे नियमही पाळणे गरजेचे आहे. - सपना कोळी-देवनपल्ली, शहर अभियंता केडीएमसी