शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

पाटी-पेन्सिल धरणारे हात भीक मागू लागतात तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:48 IST

स्टार ११३९ अनिकेत घमंडी लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील अनेक शहरांतील सिग्नल, रेल्वे व बसस्थानक परिसर, स्कायवॉक ...

स्टार ११३९

अनिकेत घमंडी

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील अनेक शहरांतील सिग्नल, रेल्वे व बसस्थानक परिसर, स्कायवॉक तसेच लोकलमध्ये लहान मुले भीक मागताना दिसतात. पण या मुलांच्या भवितव्यासाठी, बालहक्कसंदर्भात कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्थांना मात्र सरकारी पातळीवरून आवश्यक ते सहकार्य मिळत नाही. त्यामुळे हा तिढा अधिकाधिक गुंतागुंतीचा होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

नोकरी, व्यवसायाच्या अपेक्षेने मुंबई, ठाणे परिसरात अनेकजण देशभरातून येतात. त्यात गोरगरीब, मजूर यांची संख्या मोठी आहे. हाताला काम न मिळाल्यास अनेकजण मुलांसह भीक मागताना पहायला मिळतात. घरातून पळून आलेली मुलेही त्यात असतात. लहान मुलांना भीक मागू नका, त्याऐवजी महापालिका, जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेण्याचा सल्ला दिल्यास ही मुले सर्वप्रथम झिडकारून पळ काढतात, रडतात, ओरडतात. त्यामुळे अनेकदा नागरिक सामाजिक कार्यकर्त्यांना हटकतात. त्यामुळे या मुलांचे पुनर्वसन व पालकांची भेट घडवण्याच्या कामात अडथळे येतात.

काही मुले अमलीपदार्थांचे सेवनही करतात. भिकाऱ्यांच्या टोळीतील मोठी मंडळी त्यांच्या बालकांना, बाळांना अफू देतात. त्यामुळे मुले तासन्तास झोपलेली असतात. मग दया येऊन येऊन नागरिक भीक देतात. बऱ्याचदा भीक म्हणून अन्नपदार्थ नको असतात तर केवळ पैसे हवे असतात.

--------------

मिळेल तेथे आसरा

- काही भीक मागणारी मुले पालकांसमवेत झोपडपट्ट्या, उड्डाणपुलांखाली जागेत, बस, रेल्वेस्थानक, प्लॅटफॉर्म येथे राहतात. परंतु, पळून आलेली मुले असतील तर ती जिथे आसरा, आडोसा मिळेल तिथे राहतात. अनेकदा पालकच मुलांना पुढे करून भीक मागतात. पळून आलेली मुले त्यांच्या मर्जीने वागतात.

- अनेकांना वेळेवर अन्न मिळत नाही. पण हाती पैसे आल्यामुळे व्यसन लागण्याची शक्यता असते. बऱ्याचदा गैरसोय असल्याचा आव आणून तसेच मळकट कपडे, अंघोळ न करणे असे राहून भीक जास्त मिळते का, याकडे त्यांचा कल असतो.

- नशेबाज मुले अफू, व्हाइटनरचे सोल्युशन हुंगून नशा करतात तर काही अन्य व्यसनांच्या मागे लागतात. दिवस कसाबसा ढकलायचा आणि रात्री मजा करून कुठे तरी झोपायचे, असेच त्यांचे आयुष्य असते.

-----------------

बालहक्क संदर्भात काम करताना सुरक्षा यंत्रणांकडून आवश्यक सहकार्य मिळत नाही. सिग्नलवर किंवा स्टेशनवरील भीक मागणाऱ्या मुलांना समज देण्याचे काम जेव्हा सामाजिक संस्था करतात, त्यावेळी अनेकदा नागरिक, सुरक्षा यंत्रणा कार्यकर्त्यांना हटकते. तसे व्हायला नको. सगळ्यांनी मिळून जर ही समस्या सोडवली तरच सुटेल, अन्यथा त्यात वाढ होईल आणि हा प्रश्न गंभीर बनेल. पोलिसांनी सामाजिक संस्थांना सोबत घेऊन काम केले तर त्याला वेग येईल.

- विजय जाधव, संस्थापक अध्यक्ष, समतोल फाउंडेशन.

---

ठाण्यात १३ ठिकाणी १५० लहान मुले भीक मागताना दिसतात. बालहक्क आयोग, त्याबाबतचे कायदे हे कागदावर असून, उपयोग नाही. त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हायला हवी. अन्यथा अशा घटना थांबणार नाहीत. अशा मुलांचे, नागरिकांचे स्थलांतर थांबवावे. भटके विमुक्त समाजातील ही मंडळी असतात, त्यांच्यावर काम व्हायला हवे. त्यांच्यासाठीही कायदे आहेत; पण त्यांची अंमलबजावणी पूर्ण क्षमतेने व्हायला हवी.

- बटू सावंत, समर्थ भारत व्यासपीठ, संस्थापक, सिग्नल शाळा उपक्रम

-------------