शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

ठाण्याच्या मेट्रोचा नारळ केव्हा फुटणार!

By admin | Updated: June 8, 2015 03:54 IST

मुंबईतील मेट्रो रुळांवर आल्यानंतरही ठाण्यातील मेट्रो रेल्वे अडथळ्यांच्या शर्यतीत अडकली होती. मात्र, त्यातूनही मार्ग काढून वडाळा-घोडबंदर (कासारवडवली) मेट्रोला अखेर गेल्या वर्षी मंजुरी मिळाली.

अजित मांडके/ पंकज रोडेकर, ठाणे मुंबईतील मेट्रो रुळांवर आल्यानंतरही ठाण्यातील मेट्रो रेल्वे अडथळ्यांच्या शर्यतीत अडकली होती. मात्र, त्यातूनही मार्ग काढून वडाळा-घोडबंदर (कासारवडवली) मेट्रोला अखेर गेल्या वर्षी मंजुरी मिळाली. मात्र, ठाणे मेट्रोच्या भूमिपूजनाला अद्यापही मुहूर्त लागत नसल्याचे दिसत आहे. दुसरीकडे इतर शहरांमध्ये मेट्रोच्या प्रकल्पाला वेग येत असताना ठाण्यावरच अन्याय का, असा सवालही उपस्थित होत आहे.कासारवडवली येथे मेट्रोच्या कारशेडसाठी सुरू केलेल्या सर्वेक्षणाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला होता. याच दरम्यान, या प्रकल्पामुळे जमिनींच्या किमतींमध्ये वाढच होणार असल्याने शेतकऱ्यांना दुप्पट फायदा तसेच भूमिपुत्रांना रोजगारही मिळणार आहे. या कारशेडसाठीही शेतकऱ्यांची समजूत काढण्यात पालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना यश आले आहे. त्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात येणार असल्याने या शेतकऱ्यांनी कारशेडसाठी आपल्या जमिनी देण्यास हिरवा कंदील दर्शविल्यावर मेट्रोच्या कारशेडच्या ४० हेक्टर जागेचा सर्व्हे पूर्ण झाला. त्यानंतर, आता तांत्रिक डिझाइन तयार करण्याचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू झाले होते. डिझाइनचे काम पूर्ण झाल्यावर पुढील प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे.वडाळा ते घोडबंदर-कासारवडवली या महत्त्वाकांक्षी मेट्रोच्या या मार्गासाठी १९ हजार कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला असून ३२ किमीच्या या मार्गामध्ये ३० स्थानके असणार आहेत. त्यातील २४ स्थानके भुयारी असणार आहेत. सहा स्थानके ही वरील बाजूस असणार आहेत, तर ठाण्यात एकूण १३ स्थानके असणार आहेत. ही सर्व स्थानके भुयारीच असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.च्तीनहात नाका ते ओवळा कारशेडपर्यंत १३ स्थानके प्रस्तावित आहेत. यामध्ये तीनहात नाका, आरटीओ, वागळे, कॅडबरी, गोल्डन डाइज, कापूरबावडी, मानपाडा, पातलीपाडा, टिकुजिनीवाडी, आनंदनगर, वाघबीळ, कासारवडवली आणि ओवळा (कारशेड) अशी स्थानके आहेत. कारशेडच्या मुद्द्यावर श्रेय घेण्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपली होती. त्या वेळी आरोप-प्रत्यारोपांचे राजकीय युद्ध रंगल्याने मेट्रोचे कारशेडच आता कारशेडला लागण्याची चिन्हे निर्माण झाली होती.च्ठाण्याच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या या प्रकल्पाबाबत आपण त्वरित निर्णय घेऊन एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना या प्रकल्पाच्या कामास सुरुवात करण्याचे निर्देश द्यावेत व आपल्या हस्ते होणाऱ्या या प्रकल्पाच्या भूमिपूजनाची तारीखही निश्चित करावी, अशी मागणी ठाणेकरांकडून होत आहे. कारशेडसाठी ओवळा-भाईंदरपाडा येथील शॅलो वॉटर पार्ककरिता आरक्षित असलेल्या ६०० एकर जागेवर बाधितांना स्थलांतरित केले जाईल. कासारवडवलीतील २० ते २५ शेतकरी बाधित होणार आहेत.