शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

अनधिकृत बांधकामाबाबत अधिकाऱ्यांवर कारवाई कधी?

By admin | Updated: November 11, 2015 00:01 IST

अनधिकृत बांधकाम प्रकरणात तीन नगरसेवकांचे पद आयुक्तांनी रद्द केल्यानंतर आणखी ११ नगरसेवकांवर पद गमावण्याची टांगती तलावर आहे.

अनधिकृत बांधकाम प्रकरणात तीन नगरसेवकांचे पद आयुक्तांनी रद्द केल्यानंतर आणखी ११ नगरसेवकांवर पद गमावण्याची टांगती तलावर आहे. अशा प्रकारे पहिल्यांदाच ठाणे महापालिकेत अनधिकृत बांधकामासंदर्भात नगरसेवकांवर कारवाई झाल्याने इतर नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे आता अनधिकृत बांधकामात राहणाऱ्या नगरसेवकांबरोबर याकामांत सहकार्य करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्याची चिन्हे आहेत. या अनधिकृत बांधकामांमध्ये काही नगरसेवकांच्या सहभागाची चर्चा सुरु झाली असतानाच त्यांना खतपाणी घालणाऱ्या आणि जाणूनबुजून दुर्लक्ष करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अनधिकृत बांधकामात सहकार्य, अनधिकृत बांधकाम करणे आणि अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी गेलेल्या पालिका अधिकाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणी मनसेचे नगरसेवक शैलेश पाटील, राष्ट्रवादीचे मनोहर साळवी आणि शिवसेनेचे राम एगडे यांचे नगरसेवक पद्द केले. परंतु,आजच्या घडीला सुमारे ७० टक्के नगरसेवक हे अनधिकृत बांधकामात राहत असल्याची माहिती या निमित्ताने समोर आली आहे. त्यामुळे या सर्वांवरच कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे. दुसरीकडे पालिका आयुक्तांनी अशा प्रकारे धाडसी पाऊल उचलून जी कारवाई केली आहे, त्याचे ठाणेकरांकडून कौतुक होत आहे. अशा प्रकारे यापूर्वीच जर कारवाईचा बडगा उगारला गेला असता तर शहरात आज अनधिकृत बांधकामे वाढलीच नसती असा सूर ठाणेकर व्यक्त करीत आहेत. या अनधिकृत बांधकामामध्ये यापूर्वी केवळ संबंधित विकासक, त्याठिकाणी राहणारा रहिवासी यांच्यावरच कारवाई केली जात होती. परंतु, आपल्या प्रभागात अशा प्रकारे अनधिकृत बांधकामांना खतपाणी घालणाऱ्या किंबहुना स्वत: अनधिकृत बांधकामे उभारणाऱ्या नगरसेवकांना पाठीशी घातले जात होते. मागील दोन वर्षापासून काही नगरसेवकांच्या बाबतीत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर काही प्रकरणे न्यायालयात गेली तर काहींवर महासभेने निर्णय घ्यावे असे निश्चित झाले. त्यानुसार पालिकेने अनेकवेळा, या नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द करण्याचे प्रकरण महासभेच्या पटलावर ठेवले होते. परंतु पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीय सदस्यांनी हे प्रस्ताव फेटाळून लावत या नगरसेवकांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. अखेर आयुक्तांनीच त्यांना दणका देऊन त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या नगरसेवकांनीही चपराक लगावली आहे.शहरात आजच्या घडीला २ लाख २४ हजारांच्यावर अनधिकृत बांधकामे असून त्यात ५४४३ अनधिकृत इमारतींचा समावेश आहे. मागील २५ वर्षात ती शहरात उभी राहीली आहेत. ही बांधकामे केवळ विकासक, अथवा जमीन मालक यांच्यामुळे उभी राहली आहेत, का? तर याचे उत्तर नाही असे आहे. याला नगरसेवकही जबाबदार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यांच्या बरोबरच ती उभी राहीपर्यंत त्याकडे दुर्लक्ष करणारे पालिका अधिकारीही यात तितकेच दोषी आहेत. या अनधिकृत बांधकामांना नळ, वीज आणि इतर सुविधा पुरविणारे पालिका अधिकारीही यात दोषी ठरत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.