शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

अनधिकृत बांधकामाबाबत अधिकाऱ्यांवर कारवाई कधी?

By admin | Updated: November 11, 2015 00:01 IST

अनधिकृत बांधकाम प्रकरणात तीन नगरसेवकांचे पद आयुक्तांनी रद्द केल्यानंतर आणखी ११ नगरसेवकांवर पद गमावण्याची टांगती तलावर आहे.

अनधिकृत बांधकाम प्रकरणात तीन नगरसेवकांचे पद आयुक्तांनी रद्द केल्यानंतर आणखी ११ नगरसेवकांवर पद गमावण्याची टांगती तलावर आहे. अशा प्रकारे पहिल्यांदाच ठाणे महापालिकेत अनधिकृत बांधकामासंदर्भात नगरसेवकांवर कारवाई झाल्याने इतर नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे आता अनधिकृत बांधकामात राहणाऱ्या नगरसेवकांबरोबर याकामांत सहकार्य करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्याची चिन्हे आहेत. या अनधिकृत बांधकामांमध्ये काही नगरसेवकांच्या सहभागाची चर्चा सुरु झाली असतानाच त्यांना खतपाणी घालणाऱ्या आणि जाणूनबुजून दुर्लक्ष करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अनधिकृत बांधकामात सहकार्य, अनधिकृत बांधकाम करणे आणि अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी गेलेल्या पालिका अधिकाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणी मनसेचे नगरसेवक शैलेश पाटील, राष्ट्रवादीचे मनोहर साळवी आणि शिवसेनेचे राम एगडे यांचे नगरसेवक पद्द केले. परंतु,आजच्या घडीला सुमारे ७० टक्के नगरसेवक हे अनधिकृत बांधकामात राहत असल्याची माहिती या निमित्ताने समोर आली आहे. त्यामुळे या सर्वांवरच कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे. दुसरीकडे पालिका आयुक्तांनी अशा प्रकारे धाडसी पाऊल उचलून जी कारवाई केली आहे, त्याचे ठाणेकरांकडून कौतुक होत आहे. अशा प्रकारे यापूर्वीच जर कारवाईचा बडगा उगारला गेला असता तर शहरात आज अनधिकृत बांधकामे वाढलीच नसती असा सूर ठाणेकर व्यक्त करीत आहेत. या अनधिकृत बांधकामामध्ये यापूर्वी केवळ संबंधित विकासक, त्याठिकाणी राहणारा रहिवासी यांच्यावरच कारवाई केली जात होती. परंतु, आपल्या प्रभागात अशा प्रकारे अनधिकृत बांधकामांना खतपाणी घालणाऱ्या किंबहुना स्वत: अनधिकृत बांधकामे उभारणाऱ्या नगरसेवकांना पाठीशी घातले जात होते. मागील दोन वर्षापासून काही नगरसेवकांच्या बाबतीत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर काही प्रकरणे न्यायालयात गेली तर काहींवर महासभेने निर्णय घ्यावे असे निश्चित झाले. त्यानुसार पालिकेने अनेकवेळा, या नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द करण्याचे प्रकरण महासभेच्या पटलावर ठेवले होते. परंतु पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीय सदस्यांनी हे प्रस्ताव फेटाळून लावत या नगरसेवकांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. अखेर आयुक्तांनीच त्यांना दणका देऊन त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या नगरसेवकांनीही चपराक लगावली आहे.शहरात आजच्या घडीला २ लाख २४ हजारांच्यावर अनधिकृत बांधकामे असून त्यात ५४४३ अनधिकृत इमारतींचा समावेश आहे. मागील २५ वर्षात ती शहरात उभी राहीली आहेत. ही बांधकामे केवळ विकासक, अथवा जमीन मालक यांच्यामुळे उभी राहली आहेत, का? तर याचे उत्तर नाही असे आहे. याला नगरसेवकही जबाबदार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यांच्या बरोबरच ती उभी राहीपर्यंत त्याकडे दुर्लक्ष करणारे पालिका अधिकारीही यात तितकेच दोषी आहेत. या अनधिकृत बांधकामांना नळ, वीज आणि इतर सुविधा पुरविणारे पालिका अधिकारीही यात दोषी ठरत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.