शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
7
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
10
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
11
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
12
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
13
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
14
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
15
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
16
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
17
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
18
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
19
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
20
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?

कल्याणमधील तलावांचे वावडे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 02:10 IST

केडीएमसीच्या अर्थसंकल्पात डोंबिवलीतील एमआयडीसीतील गणपती विसर्जन तलावाच्या सुशोभीकरणासाठी २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे

कल्याण : केडीएमसीच्या अर्थसंकल्पात डोंबिवलीतील एमआयडीसीतील गणपती विसर्जन तलावाच्या सुशोभीकरणासाठी २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, तलावांचे शहर असलेल्या कल्याणमधील निम्याहून अधिक तलावांना कचरा कुंडीचे स्वरूप आले आहे. या तलावांच्या सुशोभीकरणाकडे महापालिका प्रशासनाने कानाडोळा केल्याचे स्पष्ट होत आहे. अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक असल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे फक्त डोंबिवलीतील एका तलावासाठी एवढ्या निधीची तरतूद का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.ठाणे जिल्हा हा तलावांचा जिल्हा. ठाण्यापाठोपाठ कल्याणला ही तलावांचे शहर संबोधले जाते. परंतु, कल्याणमधील अनेक तलाव सध्या कचऱ्याने भरलेले आहेत. पश्चिमेतील आधारवाडी तलाव असो अथवा पूर्वेतील वालधुनी पुलाशेजारील विठ्ठलवाडी तलाव ही त्याची ताजी उदाहरणे आहेत. या तलावांमध्ये कचºयाच्या प्लास्टिक पिशव्या भिरकावल्या जात असल्याने या तलावांचे डम्पिंगमध्ये रूपांतर झाले आहे. मात्र, त्याकडे केडीएमसीचे दुर्लक्ष झाले आहे. तलावांच्या विकासाकडे अर्थसंकल्पातही कानाडोळा करण्यात आला आहे. परंतु, डोंबिवली एमआयडीसीतील तलावाच्या सुशोभिकरणासाठी २५ लाखांची तरतूद केल्याने कल्याणमधील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एमआयडीसी तलावाचे सुशोभीकरण करताने तेथे आबालवृद्धांना करमणुकीची साधने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. हे योग्य असलेतरी कल्याणमधील अस्तित्व संपुष्टात आलेल्या तलावांना सापत्न वागणूक का?, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.नांदिवली तलाव, चिंचपाडा तलाव, हनुमाननगर तलाव यांची अवस्थाही दयनीय झाली आहे. या तलावांकडे वेळीच लक्ष न दिल्यास कल्याण हे तलावांचे शहर ही ओळख संपुष्टात येण्यास वेळ लागणार नाही, अशीही भावना नागरिकांनी व्यक्त केली. गणेशोत्सवाच्या वेळी या तलावांची साफसफाई केली जाते, पण उत्सव सरताच याचा वापर केवळ कचरा, निर्माल्य टाकण्यासाठीच होतो. विठ्ठलवाडी तलावाला कचºयामुळे गटाराचे स्वरूप आल्याने तेथे यंदाच्या गणेशोत्सवात गणपती विसर्जनास बंदी घालण्यात आली होती.स्मार्ट सिटी योजनेतून केवळ कल्याणच्या विकासाला प्राधान्य दिले गेले आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात डोंबिवलीत विकासकामे करण्यावर भर देण्यात आला आहे. असे असले तरी स्मार्ट सिटीच्या कामांना सुरुवातही झालेली नाही. त्यातच अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक असताना हा दुजाभाव का?, असाही सवाल केला जात आहे.तरतुदीची अंमलबजावणी व्हावीएमआयडीसीतील तलावाच्या सुशोभीकरणासाठी तरतूद केली गेली असलीतरी त्याची अंमलबजावणीही झाली पाहिजे. सध्या या तलावाकडे केडीएमसीचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. महापालिकेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अन्यथा हा तलावही नामशेष होण्यास विलंब लागणार नाही, असे डोंबिवली वेलफेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे म्हणाले. कल्याणला नेहमीच सापत्न वागणूकस्थायी समितीचे सभापतीपद आजवर बहुतांश वेळा डोंबिवलीला मिळाले आहे. त्यामुळे कल्याणला नेहमीच सापत्न वागणूक मिळाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डोंबिवली शहराला घाणेरडे शहर, अशी उपमा दिल्याने कदाचित यंदा केविलवाणा प्रयत्न झाला असेल. कल्याण शहरातील तलावांची निगा योग्य प्रकारे न राखल्याने अनेक तलाव बुजून गेले. त्यामुळे जे तलाव अस्तित्वात आहेत, त्यांच्या संवर्धनासाठी तरतूद ठेवणे आवश्यक होती. पण तसे झालेले नाही, असे केडीएमसीचे माजी विरोधीपक्षनेते व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे म्हणाले.